शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

अधिकाऱ्यांमुळे नागपुरातील स्वच्छता मोहीम बारगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 10:12 IST

नाग नदी आणि नाल्यांची सफाई एक महिन्यात करण्याचा दावा मनपाने केला होता. कामाच्या मुदतीला केवळ तीन दिवस उरले असून, केवळ ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देनाग नदी स्वच्छता मोहीम६५ टक्के काम, माती नदीच्या काठावर ‘जैसे थे’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाग नदी आणि नाल्यांची सफाई एक महिन्यात करण्याचा दावा मनपाने केला होता. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी साफसफाईची मुदत ५ जूनपर्यंत निश्चित केली होती. कामाच्या मुदतीला केवळ तीन दिवस उरले असून, केवळ ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.बांगर यांनी ४८.५० कि़मी. लांबीच्या नाग नदीला १० टप्प्यात विभाजित करून साफसफाईची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांकडे दिली होती. आतापर्यंत ६५ टक्के काम झाल्यामुळे कामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एवढेच नव्हे तर नदीतून काढलेली माती काठावर पडली आहे. थंडगतीने सुरू असलेल्या कामासाठी केवळ कार्यकारी अभियंता दोषी आहेत. कारण दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण केलेली नाही. शनिवारी तासभर असलेल्या मुसळधार पावसाने मनपा प्रशासनाची पोलखोल झाली. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. पाणी वाहून जाण्यास मार्ग नव्हता. नाल्यांची सफाई पूर्ण न झाल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली होती. नाग नदी १६.५० कि़मी., पिवळी नदी १६.५० कि़मी. आणि पोहरा नदीच्या १२.२० कि़मी. पात्राची स्वच्छता आणि सफाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता. नाग नदीला चार, पिवळी आणि पोहरा नदीला तीन भागात विभागले होते. नागनदी आणि पोहरा नदीची सफाई महत्त्वपूर्ण आहे. कारण नागनदी शहरामधून वाहते, तर गेल्यावर्षी पोहरा नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे वर्धा रोडवर पाणी आले होते.

बैठकीत नाराजीसाफसफाईच्या गतिसंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे आणि महापौर नंदा जिचकार यांनी नाराजी व्यक्त केली होती. कोणत्याही स्थितीत १० जूनपर्यंत सफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण सध्या कामाची गती पाहता साफसफाई पूर्ण होणार नाही. या ठिकाणी आहे कामाची गती संथपंचशील चौक ते अशोक चौकदरम्यान कामाची गती संथ आहे. बैद्यनाथ चौकाजवळ नागनदीतून माती काढून मातीचे ढीग काठावर लावण्यात आले आहेत. शनिवारी मुसळधार पावसामुळे बहुतांश माती पुन्हा नदीत वाहून गेली आहे. हा भाग कार्यकारी अभियंता अनिल नागदिवे यांच्या अंतर्गत आहे.अशोक चौक ते केडीके कॉलेजपर्यंतची स्थिती भयावह आहे. अशोक चौकाजवळ जवळपास १०० टिप्पर माती नदीच्या काठावर टाकली आहे. माती दोन आठवड्यापासून तशीच पडून आहे. हा भाग कार्यकारी अभियंता राजेंद्र राहाटे यांच्या अंतर्गत येतो.अंबाझरी ते पंचशील चौकादरम्यान नाग नदीची सफाई मोहीम संथ आहे. या ठिकाणी मान्सूनमध्ये कॅनल रोडवर नदीचे पाणी रस्त्यावर येते. या भागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर यांच्या अंतर्गत आहे.गोरेवाडा ते मानकापूरदरम्यान पिवळी नदीची सफाई योग्य पद्धतीने करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. मानकापूर पुलाजवळ गेल्यावर्षी पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. त्यानंतरही कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक याकडे लक्ष देत नाहीत.सोनेगाव पोलीस स्टेशनजवळ पोहरा नदीवरील पूल अत्यंत संवेदनशील आहे. या ठिकाणी सफाई न झाल्यामुळे गेल्यावर्षी नदीचे पाणी वर्धा रोडवर आले होते. यावर्षीसुद्धा अशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हा भाग कार्यकारी अभियंता अमीन अख्तर यांच्या अंतर्गत येतो.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका