शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

वृक्ष संरक्षण-संवर्धनाचे नियम अज्ञानामुळे धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:08 IST

नागपूर : महामार्ग, रस्ते तसेच प्रकल्पांसारख्या विकासात्मक कामासाठी राज्यात अनेक ठिकाणी वृक्षांची तोड केली जाते. वनविभागाच्या कक्षेत ही जागा ...

नागपूर : महामार्ग, रस्ते तसेच प्रकल्पांसारख्या विकासात्मक कामासाठी राज्यात अनेक ठिकाणी वृक्षांची तोड केली जाते. वनविभागाच्या कक्षेत ही जागा असेल तर तुटणाऱ्या वृक्षांच्या प्रतिपूर्तीसाठी काळजी घेतली जाते. मात्र अन्य ठिकाणच्या वृक्षतोडीसाठी परवानगी घेताना फारशी गंभीरता दाखविली जात नाही. यासाठी वृक्ष संवर्धन समिती स्थापन करून मार्ग काढण्याची तरतूद असली तरी अज्ञानामुळे वृक्ष संवर्धनाचे नियम धाब्यावर बसविले जातात, असेच चित्र अपवाद वगळता सर्वत्र आहे.

प्रारंभी राज्यातील प्रकल्पांची विकास कामे सुरू झाल्यावर त्यासाठी तोडल्या जाणाऱ्या वृक्षांबद्दल चिंता व्यक्त होत होती. यासाठी महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण आणि संरक्षण अधिनियम-१९७५ मध्ये तरतूद आहे. या अधिनियमातील कलम २२ च्या उपकलम १ नुसार राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती आदी स्तरावर २००९ मध्ये वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार प्राधिकरण स्थापन करून संबंधित गावांच्या किंवा शहरांच्या हद्दीतून मार्ग किंवा प्रकल्प जात असेल व त्यासाठी वृक्ष तोडावी लागत असतील, तर प्राधिकरणाची परवानगी घेण्याची तरतूद यात केली आहे. ग्रामपंचायत स्तरापासून तर शहर स्तरापर्यंत असे प्राधिकरण स्थानिक स्तरावर स्थापन करता येऊ शकते. मात्र अनेक ग्रामपंचायती, नगरपालिकांना याची कल्पना नसल्याने असे प्राधिकरण अस्तित्वातच आले नाही. गावातील एखादा वृक्ष तोडायचा असेल तरी गाव स्तरावर यासाठी प्राधिकरणाची परवानगी घेऊन त्या बदल्यात दुप्पट वृक्ष लावून देण्याची हमी द्यावी, अशी तरतूद आहे. मात्र गाव पातळीवर सर्रास वृक्ष तोडले जातात.

या प्राधिकरणावर अध्यक्ष म्हणून महानगर क्षेत्रामध्ये महानगरपालिका आयुक्त तर, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर संवर्ग विकास अधिकारी, ग्रामसेवक अध्यक्ष असण्याची तरतूद आहे. सदस्य म्हणून अशासकीय संस्थेचा प्रतिनिधी नेमण्याची तरतूद आहे. या प्राधिकरणाच्या ४५ दिवसांनी बैठका व्हाव्यात, वृक्ष तोडण्याची परवानगी आणि त्या बदल्यात किती वृक्ष लावणार, कुठे लावणार याचे हमीपत्र संबंधितांकडून भरून घेण्याचीही तरतूद आहे. परंतु असे प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात अनेक गावांना कल्पना नसल्याने या विषयाकडे दुर्लक्ष होत आले आहे.

...

कोट

अनेक ठिकाणी वृक्ष रुंदीकरणाच्या मोहिमेत परवानगी न घेता वृक्षांची तोड सुरू आहे. कुणाची परवानगी घेतली, असा प्रश्नही सातत्याने उपस्थित होतो. प्रत्यक्षात यासाठी वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे. संबंधित गावांनी त्याची स्थापना करून रीतसर परवानगी द्यावी. वृक्षप्रेमी संस्थांनीही यात लक्ष घालावे.

- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, इको-प्रो

...