शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

उंच महामार्गामुळे शेती आली पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:08 IST

भिवापूर : नवनिर्मित उमरेड-भिसी-चिमूर दुपदरी राष्ट्रीय मार्गाच्या उंचीमुळे मालेवाडा येथील शेतकऱ्यांना शेतजमिनी पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. उंच मार्गामुळे ...

भिवापूर : नवनिर्मित उमरेड-भिसी-चिमूर दुपदरी राष्ट्रीय मार्गाच्या उंचीमुळे मालेवाडा येथील शेतकऱ्यांना शेतजमिनी पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. उंच मार्गामुळे पावसाचे पाणी शेतात साचत आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसाने तर महामार्गालगतची शेते तलावसदृश झाली. याबाबत येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन देत पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नवनिर्मित उमरेड-चिमूर राष्ट्रीय मार्ग मांगरूळ, गरडापार, चिचाळा, पाहमी, मालेवाडा, जवळी परिसरातून गेला आहे. शेतापासून हा दुपदरी मार्ग कुठे चार तर कुठे पाच फूट उंच आहे. महामार्गाचे काम सुरू असतानाच परिसरातील शेतकऱ्यांनी भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येकडे कंत्राटदाराचे लक्ष वेधले होते. उंच मार्गामुळे पावसाचे पाणी शेतात साचण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. आता मात्र महामार्गाचे काम पूर्ण होताच, शेतकऱ्यांना जमिनी पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. एकीकडे महामार्ग उंच, तर दुसरीकडे पाणी वाहून जाण्याकरिता पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात शिरून पिके पाण्याखाली येत आहे. खरिपाच्या हंगामात दोन वेळा येथील शेते पाण्याखाली आली. त्यानंतर आता २१ सप्टेंबरच्या पावसाने तर दोन दिवस शेतात पाणी साचले होते. मालेवाडा येथील शेतकऱ्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशात दोन-तीन एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला उंच महामार्गामुळे वर्षभरात दोन-तीन वेळा नुकसान होत असेल तर त्यांनी जगायचे कसे? शेती करायची कशी? असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन दिले. प्रशासनाने तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची गावस्थळावर बैठक बोलावून परिस्थितीची पाहणी करावी. शिवाय तत्काळ कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नारायण इंगोले, प्रशांत इंगोले, मनोहर वानखेडे, प्रशांत बारेकर, रामू लाखे, आनंद सातपुते, गुंडेराव ढोरे, विनोद लाखे, कवडू सातपुते, धनराज सातपुते, माणिक सातपुते, अरुण चौधरी, सूर्यभान ढोरे, संजय कडू, हरीष ढोरे, हिरालाल आंभोरे, आदी शेतकरी उपस्थित होते.

240921\1923-img-20210924-wa0080.jpg

तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांना निवेदन देतांना मालेवाडा येथील शेतकरी