शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नशाखोरी आणि वाईट संगतीमुळे ‘त्यांनी’ रक्ताच्या नात्यालाही संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 07:00 IST

Nagpur News वाईट संगत किंवा नशा माणसाला हैवान बनवते. आपण काय करतो, याचे भान त्याला उरत नाही. तो प्रसंगी रक्ताच्या नात्यालाही संपवायला निघतो. नागपुरातही गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देव्यभिचार, नशाखोरीचे दुष्परिणाम गुन्ह्यांमध्ये होत आहे वाढ

नरेश डोंगरे

नागपूर : वाईट संगत किंवा नशा माणसाला हैवान बनवते. आपण काय करतो, याचे भान त्याला उरत नाही. तो प्रसंगी रक्ताच्या नात्यालाही संपवायला निघतो. अलीकडे अशा घटनांमध्ये सर्वत्र सारखी वाढ होत असून नागपुरातही गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. (Due to drug addiction and bad company, ‘they’ also ended the blood relationship)

एमआयडीसी पोलीस स्टेशन

सोळाव्या वर्षीच तिला मित्रांचा नाद लागला. अमली पदार्थांचे व्यसनही जडले. त्यातून तिने घर सोडले आणि मित्रांसोबत राहू लागली. व्यसनपूर्तीसाठी पैसे मिळेनासे झाल्यामुळे तिने आपल्या आजीचे घर गाठले. मित्राच्या मदतीने आजीची हत्या केली. तिचे सोने तसेच रोख रक्कम घेऊन ती पळून गेली. मात्र, पोलिसांनी तिच्या अखेर मुसक्या आवळल्या.

 वाडी पोलीस स्टेशन

वर्षभरापूर्वी तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले. अल्पवयातच तिने सर्व मर्यादा ओलांडल्या. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर ती प्रियकराला घरात बोलवून त्याच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करू लागली. एक दिवस अचानक बारा वर्षांचा भाऊ घरी धडकला. त्याने बहीण आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत बघितले. तो आता आई-वडिलांना सांगणार म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने छोट्या भावाची हत्या केली.

कपिल नगर पोलीस स्टेशन

दहावीत असलेला तो मित्राच्या वाईट संगतीमुळे मोठ्या माणसासारखा वागू लागला. आई, बहिणीला धमकावू लागला. घरात बहिणीचा मित्र येतो, ही बाब त्याला नेहमी खटकत होती. म्हणून त्याने बहिणीच्या मित्राशी वाद घातला आणि त्याची हत्या केली.

 हुडकेश्वर पोलीस स्टेशन

घरची आर्थिक स्थिती अतिशय चांगली. एकटा मुलगा म्हणून त्याचे लहानपणापासून कोडकौतुक होऊ लागले. त्याला जे पाहिजे ते करण्याची वडिलांनी मुभा दिली. तो जिममध्ये गेला आणि त्याने चांगले पीळदार शरीर कमाविले. नंतर मात्र त्याला व्यसन जडले. तो चक्क इंजेक्शन टोचून घेऊ लागला. व्यसन केल्यानंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडू लागले. एक दिवस त्याने स्वतःच्या वडिलांचीच निर्घृण हत्या केली.

 

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

व्यसनामुळे माणसाचे स्वतःवरचे संतुलन संपते.

अमली पदार्थांचे व्यसन जडल्यामुळे माणसाचा मेंदू चांगले काय, वाईट काय याबाबत फारसा विचार करत नाही. नशापूर्ती हेच एकमेव उद्दिष्ट त्याच्यासमोर असते आणि नशा चढली की त्याचे स्वतःवरचे नियंत्रण संपते. या अवस्थेत तो कोणाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही.

वाईट संगतीचा परिणाम वाईटच

आपण ज्यांच्यासोबत राहतो ते गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यापासून दूरच राहिले पाहिजे. अन्यथा आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते, याचे भान संबंधित व्यक्तीला उरत नाही. वाईट मित्रांच्या संगतीमुळे तो त्यांचे अनुकरण करतो आणि एखादा मोठा गुन्हा करून बसतो.

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी