शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने ५४ हजार शेतकरी बाधित

By admin | Updated: April 12, 2015 02:36 IST

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात झालेल्या पीक हानीचा अहवाल ...

नागपूर: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात झालेल्या पीक हानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून सर्वाधिक हानी ही नागपूर जिल्ह्यात झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. यामुळे विभागातील ५४ हजार शेतकरी बाधित झाले असून एकूण २० हजार ८०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. नागपूर जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांचे १२ हजार हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. यात दोन हजार हेक्टरवर फळबाग तर ९७०० हेक्टरवरील रबी पिकांचा समावेश आहे. दरम्यान शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी प्रशासनाने ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर मदत वाटप सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विदर्भात अवकाळी पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची त्याच प्रमाणे फळबागांची मोठी हानी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये ५४ हजार ९०० शेतकऱ्यांच्या २० हजार ८०० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. यात रबी पिकांचे क्षेत्र १८,४०० हेक्टर आणि फळबागाचे क्षेत्र २३४० हे.चा समावेश आहे. सर्वाधिक हानी नागपूर जिल्ह्यात झाली. १८,६०७ शेतकऱ्यांच्या १२,०५० हे. पिकांची हानी झाली. यात रब्बी पिकांचे क्षेत्र ९७९४ हे. तर फळबागांचे क्षेत्र २२५६ हेक्टरचे आहे.दुसरा क्रमांक चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. या जिल्ह्यात २४,५७६ शेतकऱ्यांच्या ७१५५ हेक्टरवर पिकांची हानी झाली. भंडारा जिल्ह्यातील ११,७७७ शेतकऱ्यांच्या १६०० हेक्टरवरील पिकांची, चंद्रपूर जिल्ह्यात २४,५०० शेतकऱ्यांच्या ७१५५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पीकहानीचे प्रमाण नगण्य आहेशासनाच्या निकषानुसार ५० टक्केपेक्षा जास्त पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्यासाठी शासनाकडे ११.७० कोटी रुपयांची मागणी करण्यात आहे. यात नागपूर जिल्ह्यासाठी ७ कोटी ११ लाख. भंडारा जिल्ह्यासाठी १ कोटी ३४ लाख, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ३ कोटी २६ लाख रुपयांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)