शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

अवकाळी पावसाने ५४ हजार शेतकरी बाधित

By admin | Updated: April 12, 2015 02:36 IST

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात झालेल्या पीक हानीचा अहवाल ...

नागपूर: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात झालेल्या पीक हानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून सर्वाधिक हानी ही नागपूर जिल्ह्यात झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. यामुळे विभागातील ५४ हजार शेतकरी बाधित झाले असून एकूण २० हजार ८०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. नागपूर जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांचे १२ हजार हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. यात दोन हजार हेक्टरवर फळबाग तर ९७०० हेक्टरवरील रबी पिकांचा समावेश आहे. दरम्यान शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी प्रशासनाने ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर मदत वाटप सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विदर्भात अवकाळी पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची त्याच प्रमाणे फळबागांची मोठी हानी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये ५४ हजार ९०० शेतकऱ्यांच्या २० हजार ८०० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. यात रबी पिकांचे क्षेत्र १८,४०० हेक्टर आणि फळबागाचे क्षेत्र २३४० हे.चा समावेश आहे. सर्वाधिक हानी नागपूर जिल्ह्यात झाली. १८,६०७ शेतकऱ्यांच्या १२,०५० हे. पिकांची हानी झाली. यात रब्बी पिकांचे क्षेत्र ९७९४ हे. तर फळबागांचे क्षेत्र २२५६ हेक्टरचे आहे.दुसरा क्रमांक चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. या जिल्ह्यात २४,५७६ शेतकऱ्यांच्या ७१५५ हेक्टरवर पिकांची हानी झाली. भंडारा जिल्ह्यातील ११,७७७ शेतकऱ्यांच्या १६०० हेक्टरवरील पिकांची, चंद्रपूर जिल्ह्यात २४,५०० शेतकऱ्यांच्या ७१५५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पीकहानीचे प्रमाण नगण्य आहेशासनाच्या निकषानुसार ५० टक्केपेक्षा जास्त पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्यासाठी शासनाकडे ११.७० कोटी रुपयांची मागणी करण्यात आहे. यात नागपूर जिल्ह्यासाठी ७ कोटी ११ लाख. भंडारा जिल्ह्यासाठी १ कोटी ३४ लाख, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ३ कोटी २६ लाख रुपयांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)