शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने ५४ हजार शेतकरी बाधित

By admin | Updated: April 12, 2015 02:36 IST

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात झालेल्या पीक हानीचा अहवाल ...

नागपूर: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात झालेल्या पीक हानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून सर्वाधिक हानी ही नागपूर जिल्ह्यात झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. यामुळे विभागातील ५४ हजार शेतकरी बाधित झाले असून एकूण २० हजार ८०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. नागपूर जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांचे १२ हजार हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. यात दोन हजार हेक्टरवर फळबाग तर ९७०० हेक्टरवरील रबी पिकांचा समावेश आहे. दरम्यान शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी प्रशासनाने ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर मदत वाटप सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विदर्भात अवकाळी पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची त्याच प्रमाणे फळबागांची मोठी हानी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये ५४ हजार ९०० शेतकऱ्यांच्या २० हजार ८०० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. यात रबी पिकांचे क्षेत्र १८,४०० हेक्टर आणि फळबागाचे क्षेत्र २३४० हे.चा समावेश आहे. सर्वाधिक हानी नागपूर जिल्ह्यात झाली. १८,६०७ शेतकऱ्यांच्या १२,०५० हे. पिकांची हानी झाली. यात रब्बी पिकांचे क्षेत्र ९७९४ हे. तर फळबागांचे क्षेत्र २२५६ हेक्टरचे आहे.दुसरा क्रमांक चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. या जिल्ह्यात २४,५७६ शेतकऱ्यांच्या ७१५५ हेक्टरवर पिकांची हानी झाली. भंडारा जिल्ह्यातील ११,७७७ शेतकऱ्यांच्या १६०० हेक्टरवरील पिकांची, चंद्रपूर जिल्ह्यात २४,५०० शेतकऱ्यांच्या ७१५५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पीकहानीचे प्रमाण नगण्य आहेशासनाच्या निकषानुसार ५० टक्केपेक्षा जास्त पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्यासाठी शासनाकडे ११.७० कोटी रुपयांची मागणी करण्यात आहे. यात नागपूर जिल्ह्यासाठी ७ कोटी ११ लाख. भंडारा जिल्ह्यासाठी १ कोटी ३४ लाख, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ३ कोटी २६ लाख रुपयांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)