शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वाहन चोरीची विलंबाने तक्रार नोंदविणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 11:51 IST

विमाकृत वाहन चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यास विलंब करणे एका ग्राहकाला नुकसानकारक ठरले. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने या ग्राहकाला विमा दाव्यासंदर्भात दिलासा देण्यास नकार दिला.

ठळक मुद्देग्राहक मंचने दिलासा नाकारला विमा दावा फेटाळण्याचा निर्णय कायम

आॅनलाईन लोकमतनागपूर : विमाकृत वाहन चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यास विलंब करणे एका ग्राहकाला नुकसानकारक ठरले. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने या ग्राहकाला विमा दाव्यासंदर्भात दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी विमा दावा फेटाळण्याचा विमा कंपनीचा निर्णय कायम राहिला. मंचाचे अध्यक्ष शेखर मुळे व सदस्या चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला.बलविंदर कौर निरंजन सिंह मुलतानी असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्याकडील ट्रकचा नॅशनल अ‍ॅश्युरन्स कंपनीमार्फत २६ जून २०१० रोजी विमा काढण्यात आला होता. विमा पॉलिसी २५ जून २०११ पर्यंत वैध होती. त्यांच्या ट्रकची २८ नोव्हेंबर २०१० रोजी चोरी झाली. परंतु, त्यांनी २७ डिसेंबर २०१० रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली व प्रादेशिक परिवहन कार्यालयाला चोरीची सूचना दिली. पोलिसांना ट्रक शोधण्यात अपयश आल्यानंतर मुलतानी यांनी कंपनीकडे विमा दावा दाखल केला. चोरीची सूचना विलंबाने देणे व ट्रक निष्काळजीपणे घटनास्थळी उभा ठेवणे या दोन कारणावरून दावा खारीज करण्यात आला. परिणामी मुलतानी यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करून ८ लाख ४० हजार रुपयांचा विमा दावा व त्यावर १२ टक्के व्याज देण्याची मागणी केली होती.मंचाने विविध बाबी लक्षात घेता मुलतानी यांना दिलासा देण्यास नकार दिला. पॉलिसीच्या पहिल्या अटीनुसार विमाकृत वाहनाचे नुकसान किंवा चोरी झाल्यास कंपनीला ताबडतोब लेखी सूचना देणे अनिवार्य असते. सदर प्रकरणात या अटीचा भंग झाला आहे. सबब, विमा दावा रद्द करण्याच्या निर्णयात काहीच चूक नाही. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी विविध प्रकरणात यासंदर्भात खुलासा केला आहे असे मंचाने निर्णयात स्पष्ट करून मुलतानी यांची तक्रार खारीज केली.अशी होती कंपनीची बाजूग्राहकाने ट्रक चोरीची सूचना बºयाच विलंबाने दिली. त्यामुळे पॉलिसीतील पहिल्या अटीचा भंग झाला. तसेच, ट्रकची चोरी होऊ नये यासाठी योग्य काळजी घेण्यात आली नाही. ग्राहकाने आवश्यक दस्तऐवजांची पूर्तताही केली नाही. त्यामुळे ग्राहक विमा दाव्यास पात्र नाही अशी बाजू कंपनीच्या वतीने मंचासमक्ष मांडण्यात आली होती.

टॅग्स :Courtन्यायालय