शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वाहन चोरीची विलंबाने तक्रार नोंदविणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 11:51 IST

विमाकृत वाहन चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यास विलंब करणे एका ग्राहकाला नुकसानकारक ठरले. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने या ग्राहकाला विमा दाव्यासंदर्भात दिलासा देण्यास नकार दिला.

ठळक मुद्देग्राहक मंचने दिलासा नाकारला विमा दावा फेटाळण्याचा निर्णय कायम

आॅनलाईन लोकमतनागपूर : विमाकृत वाहन चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यास विलंब करणे एका ग्राहकाला नुकसानकारक ठरले. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने या ग्राहकाला विमा दाव्यासंदर्भात दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी विमा दावा फेटाळण्याचा विमा कंपनीचा निर्णय कायम राहिला. मंचाचे अध्यक्ष शेखर मुळे व सदस्या चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला.बलविंदर कौर निरंजन सिंह मुलतानी असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्याकडील ट्रकचा नॅशनल अ‍ॅश्युरन्स कंपनीमार्फत २६ जून २०१० रोजी विमा काढण्यात आला होता. विमा पॉलिसी २५ जून २०११ पर्यंत वैध होती. त्यांच्या ट्रकची २८ नोव्हेंबर २०१० रोजी चोरी झाली. परंतु, त्यांनी २७ डिसेंबर २०१० रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली व प्रादेशिक परिवहन कार्यालयाला चोरीची सूचना दिली. पोलिसांना ट्रक शोधण्यात अपयश आल्यानंतर मुलतानी यांनी कंपनीकडे विमा दावा दाखल केला. चोरीची सूचना विलंबाने देणे व ट्रक निष्काळजीपणे घटनास्थळी उभा ठेवणे या दोन कारणावरून दावा खारीज करण्यात आला. परिणामी मुलतानी यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करून ८ लाख ४० हजार रुपयांचा विमा दावा व त्यावर १२ टक्के व्याज देण्याची मागणी केली होती.मंचाने विविध बाबी लक्षात घेता मुलतानी यांना दिलासा देण्यास नकार दिला. पॉलिसीच्या पहिल्या अटीनुसार विमाकृत वाहनाचे नुकसान किंवा चोरी झाल्यास कंपनीला ताबडतोब लेखी सूचना देणे अनिवार्य असते. सदर प्रकरणात या अटीचा भंग झाला आहे. सबब, विमा दावा रद्द करण्याच्या निर्णयात काहीच चूक नाही. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी विविध प्रकरणात यासंदर्भात खुलासा केला आहे असे मंचाने निर्णयात स्पष्ट करून मुलतानी यांची तक्रार खारीज केली.अशी होती कंपनीची बाजूग्राहकाने ट्रक चोरीची सूचना बºयाच विलंबाने दिली. त्यामुळे पॉलिसीतील पहिल्या अटीचा भंग झाला. तसेच, ट्रकची चोरी होऊ नये यासाठी योग्य काळजी घेण्यात आली नाही. ग्राहकाने आवश्यक दस्तऐवजांची पूर्तताही केली नाही. त्यामुळे ग्राहक विमा दाव्यास पात्र नाही अशी बाजू कंपनीच्या वतीने मंचासमक्ष मांडण्यात आली होती.

टॅग्स :Courtन्यायालय