शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

मतमोजणीमुळे कळमन्यात १०० कोटींच्या व्यवसायाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 20:51 IST

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे कळमन्यातील बाजारपेठा २१ मे रोजी सायंकाळी ७ पासून २४ मे दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मालाची आवक २० मेपासून बंद झाली आहे. बंदीच्या तारखेपासून आवक येण्यास आणखी दोन दिवस लागणार आहे. एकूण सात दिवसांत सर्व बाजारपेठांमध्ये १०० कोटींच्या व्यवसायाला फटका बसणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देमतमोजणी इतरत्र करण्याची मागणी : आवक दोन दिवसांपूर्वीच बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे कळमन्यातील बाजारपेठा २१ मे रोजी सायंकाळी ७ पासून २४ मे दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मालाची आवक २० मेपासून बंद झाली आहे. बंदीच्या तारखेपासून आवक येण्यास आणखी दोन दिवस लागणार आहे. एकूण सात दिवसांत सर्व बाजारपेठांमध्ये १०० कोटींच्या व्यवसायाला फटका बसणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.व्यवसाय बंद राहिल्यामुळे बाजार समितीला महसूल मिळणार नाही. व्यापारी, अडतिये, शेतकरी, मजूर, हमाल यांच्या दररोजच्या मिळकतीवर परिणाम होणारा निर्णय शासनाने घेऊ नये. विधानसभा वा लोकसभेची मतमोजणी कळमना बाजारात न करता शहरात इतरत्र करण्याची मागणी विविध असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.भाज्या आणि कांदे-बटाट्याचे दर वाढणारकळमन्यातील मुख्य भाजीपाला बाजारात दररोज ३०० पेक्षा जास्त ट्रकची आवक होते. स्थानिक आणि अन्य राज्यातून उत्पादक आणि व्यापारी कळमन्यात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजार बंद असल्यामुळे सर्वांनी आवक पूर्वीच बंद केली आहे. सात दिवसांत या बाजारात जवळपास १५ कोटींचा व्यवसाय ठप्प होणार आहे. याशिवाय कांदे-बटाटे बाजारात दररोज ५० ते ६० ट्रकची आवक होते. मतमोजणीच्या काळात जवळपास ३०० ट्रक येणार नाहीत. याशिवाय लसूण आणि अद्रक या कृषी उत्पादनाची आवक बंद राहील. त्यामुळे या दिवसांत स्वयंपाकघरात आवश्यक भाज्यांचे भाव वाढतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.फळे बाजारावर परिणामआंब्याच्या सिझनमध्ये स्थानिकांकडून आणि अन्य राज्यातील शेतकऱ्यांकडून आंब्याची आवक वाढली आहे. पण मतमोजणीमुळे शेतकऱ्यांनी आवक थांबविली आहे. आवक वाढल्यामुळे आंबे किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलो होते. पण जवळपास सात दिवस आवक बंद राहिल्याने भाव १०० रुपयांवर जाण्याची शक्यता फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी व्यक्त केली.धान्य बाजारात १५ कोटींचा व्यवसाय ठप्प होणारसंपूर्ण शहराला धान्य आणि कडधान्याचा पुरवठा करणाऱ्या धान्य बाजारात सहा ते सात दिवस शेतकरी माल आणणार नाही. या दिवसांत जवळपास १५ कोटींचा व्यवसाय ठप्प होणार आहे. शासनाने मतमोजणी मानकापूर येथील इंडोर स्टेडियममध्ये घेण्याची मागणी धान्य बाजार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अतुल सेनाड यांनी केली.

मतमोजणी न करण्याचे हायकोर्टात दिले होते आश्वासनकळमना बाजारात धान्य, मिरची, आलू-कांदे, फळे, भाजीपाला, न्यू ग्रेन मार्केट अशा सहा प्रमुख बाजारपेठा आहेत. या बाजारपेठांमध्ये दररोज कोट्यवधींचा व्यवसाय होतो. मतमोजणीमुळे व्यवसाय प्रभावित होत असल्याच्या कारणांवरून सर्वच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कळमन्यात मतमोजणी घेऊ नये, या आशयाची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील मतमोजणी कळमना बाजारात घेण्यात येणार नाही, असे हायकोर्टात लिहून दिले होते. त्यानंतरही होणारी मतमोजणी ही व्यापारी, अडतिये आणि शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे मत फ्रूट मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश छाब्रानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. सर्वच बाजारपेठा २४ मेपर्यंत बंद राहणार आहेत. बाजारात व्यवसाय सुरळीत होण्यासाठी बंदीनंतर तीन ते चार दिवस लागणार आहे. व्यवसायात होणाऱ्या तोट्याची शासनाने भरपाई करावी, अशी मागणी छाब्रानी यांनी केली. 

टॅग्स :Electionनिवडणूकbusinessव्यवसाय