शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
5
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
6
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
7
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
8
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
9
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
10
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
11
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
12
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
13
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
14
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
15
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
16
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
17
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
18
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
19
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
20
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?

नागपूर जिल्ह्यात क्षारयुक्त पाण्यामुळे घरोघरी रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:15 AM

भिवापूर तालुक्यात बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना चार दिवसांतच हगवण, ओकारी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शहरात सध्या घरोघरी या आजाराचे रुग्ण बघावयास मिळत आहेत.

ठळक मुद्देपोटाचे आजार वाढले बोअरवेल्समधील पाण्याचा उपसा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर तालुक्यात बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना चार दिवसांतच हगवण, ओकारी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शहरात सध्या घरोघरी या आजाराचे रुग्ण बघावयास मिळत आहेत.भिवापूर व परिसरातील भूगर्भात मुबलक जलसाठा आहे. मात्र, त्या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्याने ते पिण्यायोग्य नाही. शहराला ११ योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, या सर्वच योजनांची दयनीय अवस्था आहे. मोखाळा, चिखली व मरूनदी या तीन प्रमुख्य पाणीपुरवठा योजनांपैकी मोखाळा योजना लोकप्रतिनिधीच्या ढिसाळ धोरणाची बळी ठरली. उर्वरित दोन योजना कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शहराला वर्षभर कृत्रिम पाणीटंचाईची झळ सोसावी लागते.ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने शहरातील विविध भागात एकूण ११० बोअरवेल्स तयार करण्यात केल्या असून, यातील ८५ बोअरवेल्समधील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी न करता ते नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. परिणामी, अवघ्या चार दिवसांत नागरिकांनी या बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने हगवण, उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या आजाराचे घरोघरी रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने या बोअरवेल्समधील पाणीपुरवठा बंद केला आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले.सध्या शहरातील माळीपुरा, धर्मापूर, आझाद चौक, कुंभारपुरा, धर्मापूर या भागात हगवण, उलट्या व पोटदुखीचे रुग्ण अधिक असल्याचे दिसून येते. यात लहान मुले आणि वयोवृद्धांची संख्या अधिक आहे. परिणामी, प्रशासनाचा पाणीटंचाईवर मात करण्याचा हाही प्रयत्न फसला आहे.

लाखो लिटर पाण्याची नासाडीरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्या बोअरवेल्समधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे प्रशासनाच्या व नागरिकांच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून प्रशासनाने त्या बोअरवेल्समधील पाण्याचा उपसा करायला सुरुवात केली. त्यासाठी बोअरवेल्समधील मोटरपंप ४८ तासांपासून सुरू आहे. परिणामी, बोअरवेल्समधील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असून, लाखो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. मात्र, क्षारयुक्त पाणी शुद्ध करण्याचा हा उपाय नाही, असे जाणकारांनी सांगितले.

कायमस्वरूपी तोडगा काढाभिवापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच योजनांचे बारा जले आहेत. काही योजना कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. उन्हाळा तोंडावर असतानाच शहराला पाणीटंचाई जाणवू लागली. ही समस्या फार जुनी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्याऐवजी आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे या पाणीसमस्येवर आतातरी कायमस्वरूपी तोडगा काढा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाणीसमस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्षशहराला होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे प्रभाग क्रमांक - १६ मध्ये ‘टायफाईड’ व ‘किडनी स्टोन’चे रुग्ण वाढले आहेत. याबाबत नागरिकांनी ६ आॅक्टोबर, १६ व १८ नोव्हेंबर २०१७ रोजी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या. दोन वर्षांपासून या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेविका वंदना जांभुळकर यांनी करीत नगरपंचायत प्रशासनाला नुकतेच निवेदन दिले. या निवेदनासोबत त्यांनी लोकमतमध्ये पाणीटंचाईबाबत २४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकाशित वृत्तही जोडले.

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Healthआरोग्य