शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

 नागपुरात वाहनांचे ‘ड्राय वॉशिंग’; २२ लाख लिटर पाणी वाचवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 10:46 IST

रविवार २१ जुलैपासून विदर्भातील सर्व ऑटोमोबाईल डीलर्सला ग्राहकांच्या वाहनांची धुलाई पाण्याऐवजी ‘ड्राय वॉशिंग’ तंत्रज्ञानाने करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ‘वादा’चे अध्यक्ष आशिष काळे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देरविवारपासून ‘वादा’च्या अभियानास होणार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा विदर्भात निर्माण झालेल्या भीषण जलसंकटाला तोंड देण्यासाठी ‘विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (वादा)’ने वाहनांच्या धुलाईसाठी नव्या तंत्राचा वापर करण्याची तयारी दर्शवली असून, रविवार २१ जुलैपासून विदर्भातील सर्व ऑटोमोबाईल डीलर्सला ग्राहकांच्या वाहनांची धुलाई पाण्याऐवजी ‘ड्राय वॉशिंग’ तंत्रज्ञानाने करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ‘वादा’चे अध्यक्ष आशिष काळे यांनी पत्रपरिषदेत दिली. या अभियानाला देशभरात पसरविण्याची तयारी राष्ट्रीय पातळीवरील असोसिएशनने दर्शवली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.शहरात ऑटोमोबाईल्सचे ५० वर्कशॉप्स असून, या वर्कशॉपमध्ये दरदिवसाला ६०० चारचाकी आणि तीन हजारावर दुचाकींची धुलाई केली जाते. साधारणत: प्रत्येक गाडीच्या धुलाईला १५० ते १६० लिटर पाणी खर्च होत असते. धुलाईसाठी वापरण्यात येणाऱ्या ७० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत असला तरी ३० टक्के पाणी वायाच जाते. संपूर्ण जून महिना पाण्याविना गेला आणि जुलैमध्ये सुद्धा पावसाचे चित्र दिसत नाही. अशा स्थितीत स्थानिक प्रशासनाला हातभार लावण्यासाठी आम्ही या अभियानाची सुरुवात करत असल्याचे काळे म्हणाले. ‘ड्राय वॉशिंग’मध्ये वाहनाच्या धुलाईस केवळ दोन ते तीन लिटर पाण्याचाच वापर होतो.मात्र, यात ३५ टक्के खर्च वाढतो. महिनाभर ग्राहकांकडून हा खर्च वसूल केला जाणार नाही. पाणी टंचाईच्या काळात महिनाभर हा उपक्रम राबविणार असून, त्यानंतर नागरिकांना स्वेच्छेने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.या अभियानातून महिनाभरात शहरातील २२ लाख लिटर पाण्याची बचत केली जाणार असल्याचे आशिष काळे म्हणाले. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन’चाही अध्यक्ष या नात्याने या उपक्रमास देशभरात घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी, ‘वादा’चे सचिव अनुज पांडे, उपाध्यक्ष आंचल गांधी व सहसचिव पंकज मल्होत्रा उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीकपात