शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

चालक-वाहकांची रात्र डासांसोबत एसटीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST

नागपूर : एसटीच्या चालक-वाहकांना बाहेरगावी मुक्कामी जावे लागते. परंतु, मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. त्यांना डासांसोबत एसटी ...

नागपूर : एसटीच्या चालक-वाहकांना बाहेरगावी मुक्कामी जावे लागते. परंतु, मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. त्यांना डासांसोबत एसटी बसमध्येच रात्र काढावी लागते. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एसटी प्रशासनाने याबाबत व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

रात्री मुक्कामी जाणाऱ्या बस १०७

मुक्कामी थांबणारे चालक १०७

वाहक १०७

सार्वजनिक शौचालयाचा अभाव

एसटी बस रात्री मुक्कामाला जातात. शहराच्या ठिकाणी एसटी महामंडळाचे विश्रामगृह असते. तेथे शौचालयाची व्यवस्था आहे. परंतु, स्वच्छता राहत नाही. ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालयाची वानवा असल्यामुळे चालक-वाहकांची गैरसोय होते. त्यांना उघड्यावर शौचासाठी जावे लागते. नागपूर विभागातील १०७ बस रात्री मुक्कामाला बाहेरगावी जातात. यापैकी जवळपास ४० ठिकाणी सार्वजनिक शौचालये नसल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे चालक-वाहकांची गैरसोय होत असून, एसटी प्रशासनाने चालक-वाहकांची योग्य व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

कोरोनामुळे मिळत नाही मदत

कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत बाहेरगावी मुक्कामी जाणाऱ्या चालक-वाहकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे सहसा त्यांना मदत येत नाही. ग्रामीण भागात शहरातून येणाऱ्या चालक-वाहकांना कोरोना तर नाही ना, या भीतीने नागरिक त्यांना मदत करीत नाहीत. त्यामुळे चालक-वाहकांचा नाईलाज होतो. कोरोनापूर्वी नागरिक चालक-वाहकांना मदत करीत होते. परंतु, कोरोनामुळे नागरिक मदत करण्यास धजावत नसल्याची माहिती चालक-वाहकांनी दिली.

ग्रामीण भागात व्यवस्थेबाबत पाठपुरावा करू

ग्रामीण भागात आणि अतिदुर्गम भागात काही प्रमाणात चालक-वाहकांची गैरसोय होते. अशा ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतींशी बोलून चालक-वाहकांची होत असलेली गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करू.

- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

प्रशासनाने योग्य व्यवस्था करावी

चालक-वाहकांच्या अव्यवस्थेमुळे कोरोनापासून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाहेरगावी जाणाऱ्या चालक-वाहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने बाहेरगावी जाणाऱ्या चालक-वाहकांची योग्य व्यवस्था करण्याची गरज आहे.

-अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना

मुक्कामाची व्यवस्था हवी

ग्रामीण भागात बस घेऊन गेल्यानंतर तेथे मुक्कामाची व्यवस्था राहत नाही. सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे गैरसोय होते. त्यामुळे ग्रामीण भागात चालक-वाहकांना सुविधा मिळण्याची गरज आहे.

-विनोद काळे, चालक

विश्राम कक्षात स्वच्छता हवी

चालक-वाहक नेहमीच बाहेरगावी जातात. शहरात चालक-वाहकांसाठी विश्राम कक्ष असतो. परंतु, तेथे स्वच्छता राहत नाही. शौचालयात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे विश्राम कक्षात स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करण्याची मागणी आहे.

- गणेश बागडे

..............