शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दरोड्याचा कट रायपूरच्या कारागृहात ?

By admin | Updated: October 2, 2016 02:43 IST

मणप्पुरम गोल्ड फायनान्स लिमिटेड कंपनीत घालण्यात आलेल्या दरोड्याचा कट रायपूरच्या कारागृहात शिजला होता,

मणप्पुरम गोल्ड प्रकरणाचा धागा गवसला : ‘बिहारी टोळी’चा शोध नरेश डोंगरे नागपूरमणप्पुरम गोल्ड फायनान्स लिमिटेड कंपनीत घालण्यात आलेल्या दरोड्याचा कट रायपूरच्या कारागृहात शिजला होता, अशी खळबळजनक माहितीवजा चर्चा संबंधित वर्तुळातून पुढे आली आहे. दरोडेखोरांनी रायपूर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर लगेच दरोड्याचा कट पूर्णत्वास नेला, अशीही विश्वसनीय माहिती खास सूत्रांकडून पुढे आली आहे. पोलीस अधिकारी यासंदर्भात बोलायला तयार नसले तरी या माहितीच्या आधारेच दरोडेखोरांच्या मुसक्या बांधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती आहे. मणप्पुरम गोल्ड फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या दरोडा घालण्याच्या घटनेला ७२ तासांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, अद्याप एकही दरोडेखोर हाती लागला नाही. पोलिसांची १६ पथके परराज्यातनागपूर : दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी पोलिसांची १६ पथके परराज्यात तर, अन्य काही पथके उपराजधानीत परिश्रम घेत आहेत. दरोडेखोरांना पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निरंतर संपर्कात आहेत.मणप्पूरमच्या कार्यालयातील सीसीटीव्हीत दरोडेखोर कैद झाले. त्यांचे आणि रायपूरच्या कारागृहातून काही दिवसांपूर्वीच बाहेर पडलेल्या गुन्हेगारांचे छायाचित्र मिळतेजुळते आहे. या गुन्हेगारांमध्ये काही गुन्हेगार बिहारचे असून, एवढा मोठा (३१ किलो सोने) नसला तरी त्यांनी असाच लुटमारीचा गुन्हा यापूर्वी केला होता. छत्तीसगड पोलिसांनी त्यांना पकडून कारागृहात डांबले होते. या कारागृहात अन्य राज्यातील काही गुन्हेगार होते. तेथे मणप्पुरम गोल्डच्या नागपूर शाखेतील सुरक्षा व्यवस्था कशी तकलादू आहे, याची माहिती गुन्हेगारांच्या टोळीत चर्चेला आली होती अन् त्याचमुळे रायपूर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ‘बिहारी गँग’ने डाव साधल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे. शहर पोलिसांनी या गुन्हेगारांची छायाचित्रे छत्तीसगड पोलीस प्रशासनाकडून मागवून घेत मणप्पूरमच्या सीसीटीव्हीत कैद झालेल्यांशी ती जुळवून पाहिली. या गुन्हेगारांची आणि ‘त्या’ गुन्हेगारांपैकी काहींची छायाचित्रे तंतोतंत जुळत असल्याचीही माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, छत्तीसगडमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे रायपूर कारागृहातून सुटलेल्या ‘त्या’ गुन्हेगारांची बिहारमध्ये शोधाशोध केली असता ते ८-१५ दिवसांपासून घरून (गावातून) बेपत्ता असल्याचे समजते. यामुळे ‘बिहारी टोळी’नेच हा दरोडा घातल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली आहे. मात्र, जोपर्यंत संशयित हाती लागत नाही, तोपर्यंत या संशयाला अर्थ नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे मत आहे.दिल्ली-जबलपूरचेही कनेक्शन ?देशातील विविध भागात धाडसी घरफोड्या करणाऱ्या दिल्लीतील एका टोळीने मणप्पुरमच्या याच कार्यालयात सहा महिन्यांपूर्वी चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, अलार्म वाजल्यामुळे त्यावेळी दिल्लीचे चोरटे पळून गेले. नंतर ही टोळी नागपूर पोलिसांनी पकडली होती. या टोळीने उपराजधानीतील अनेक धाडसी घरफोड्यांची कबुली देतानाच मणप्पुरमच्या कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचीही कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मणप्पुरम प्रशासनाला सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले अन् नागपूरच्या आजवरच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याची घटना घडली. दरम्यान, या दरोड्यातील संशयित बिहारी टोळीला ‘नालंदा टोळी’ म्हणूनही गुन्हेगारी वर्तुळात ओळखले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्यासाठी ‘नालंदा’ जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातही जाळे विणण्यात आले आहे. या टोळीसोबत जबलपूरच्या कुख्यात पहेलवान टोळीचे कनेक्शन असल्याची चर्चा असून, नागपुरात पकडण्यात आलेल्या दिल्लीच्या टोळीचे काही संबंध आहेत काय, त्याचाही शोध घेतला जात आहे.