शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

डॉ. यशवंत मनोहर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार; आंबेडकराईट मुव्हमेंट वाड्मयीन पुरस्कारांची घोषणा 

By आनंद डेकाटे | Updated: February 9, 2024 20:04 IST

डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेने आणइ प्रगल्भ चिंतनाने आंबेडकरवादी मराठी साहित्याला समाजभिमुख केले.

नागपूर: सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाच्या ध्यास घेऊन दलित, शोषित, पीडित आणि वंचित माणसांचे जीवन आपल्या साहित्यकृतीतून अभिव्यक्त करणाऱ्या आंबेडकरनिष्ठ साहित्यिकांना आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर या संस्थेच्यावतीने दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर वाड्मयीन पुरस्कार दिले जातात. यंदा संस्थेच्या पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. आंबेडकरवादाचे निष्ठावंत भाष्यकार, विचारवंत आणि ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर यांना यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दादाकांत धनविजय आणि सचिव डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी दिली.

डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेने आणइ प्रगल्भ चिंतनाने आंबेडकरवादी मराठी साहित्याला समाजभिमुख केले. कविता, कादंबरी, वैचारिक समीक्षा असे विपूल लेखन डॉ. यशवंत मनोहर यांनी केले आहे. त्यांचा गौरव म्हणजे एकुणच आंबेडकरी साहित्य चळवळीचा सन्मान असल्याचे संस्थेने म्हटले आहे. यासोबतच राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये वसंत मून वैचारिक-संशोधन पुरस्कार मिलिंद किर्ती (नागपूर) यांच्या सहमतीची हुकुमशाही या पुस्तकाला, बाबुराव बागूल कादंबरी पुरस्कार, उल्हास निकम (मुक्ताईनगर) यांच्या अंगुलीमाल या कादंबरीस, दया पवार आआत्मकथन पुरस्कार राजू बाविस्कर (जळगाव) यांच्या काळ्यानिळ्या रेषा या आत्मकथनास, नामदेस ढसाळ काव्यपुरस्कार प्रशांत वंजारे (यवतमाळ) यांच्या आम्ही युद्धखोर आहोत या कवितासंग्रहास, अष्वघोष नाट्यपुरस्कार प्रतिमा इंगोले (पुणे) यांच्या तारूण्याची बखरया नाटकास आणि डॉ. भगवानदास हिंदी दलित साहित्य पुरस्कार कर्मशील भारती (दिल्ली) यांच्या क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले या पुस्तकास जाहीर झाला आहे. दहा हजार रूपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. तर प्रत्येकी पाच हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ९ मार्च रोजी विदर्भ हिंदी मोरभवन येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

टॅग्स :nagpurनागपूर