शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक कधी होणार ?

By admin | Updated: November 17, 2015 04:27 IST

मुंबईतील इंदू मिलवरील स्मारकाचे भूमिपूजन झाले. लंडनमधील बाबासाहेबांच्या घराचे स्मारकात रूपांतर होऊन पंतप्रधानांच्या

आनंद डेकाटे ल्ल नागपूरमुंबईतील इंदू मिलवरील स्मारकाचे भूमिपूजन झाले. लंडनमधील बाबासाहेबांच्या घराचे स्मारकात रूपांतर होऊन पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे लोकार्पणही झाले. परंतु नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारकाचा प्रश्न आजही कायम आहे. तब्बल २३ वर्षांपूर्वी महापालिकेने सभागृहात मंजूर केलेला हा विषय अजूनही कागदी घोड्यांच्या बाहेर येऊ शकला नाही, हे विशेष. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १९९२ साली महापालिकेने शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. महापालिका सभागृहात त्याला एकमुखाने मंजुरी सुद्धा प्रदान केली होती. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे स्मारक होणार होते. मनपाने त्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने पटवर्धन मैदानाची जागा स्मारकासाठी निश्चित केली. एक कोटी रुपयांची तरतूदसुद्धा महापालिकेने केली होती. परंतु त्यानंतर त्यावर काहीच काम झाले नाही. तब्बल दहा वर्ष ती फाईल धूळखात पडली होती. अधूनमधून काही आंबेडकरी संघटनांकडून स्मारकाचा मुद्दा रेटला जात होता. मात्र त्यात फारसा जोर नसल्याने मनपा प्रशासनानेही त्याकडे कधी लक्ष दिले नाही. २००२ साली महापालिकेच्या पहिल्याच सभेत नव्यानेच निवडणून आलेल्या बहुजन समाज पार्टीच्या सदस्यांनी जन्मशताब्दी स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. मनपाचे पक्षनेते असलेले राहुल तेलंग यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत कामकाज बंद पाडले. तेव्हा महापौर विकास ठाकरे आणि मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर होते. फाईल शोधण्यात आली. यावर चर्चा झाली. पुन्हा एक समिती स्थापन झाली. टी. चंद्रशेखर यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला. स्मारकाबाबतचे डिझाईन तयार करून घेण्यात आले. तीन हजार लोक बसू शकतील, असे भव्य वातानुकूलित सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व महापुरुषांची ग्रंथसंपदा, त्यांच्यावरील संदर्भ ग्रंथ असलेले विशाल ग्रंथालय आणि विविध विषयांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थी संशोधकांसाठी स्वतंत्र असे संशोधनालय आदींची व्यवस्था करण्याचे नियोजित होते. स्मारकाच्या या संपूर्ण प्रकल्पावर एकूण २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. दरम्यान पटवर्धन मैदानावरील लीज संपली. त्याचे नूतनीकरण करण्यासंदर्भात महापालिकेने सरकारकडे अर्ज केला. त्यासंबंधी आवश्यक रक्कमही भरली परंतु कुठे माशी शिंकली माहीत नाही. यानंतर आंबेडकरी संघटनांमध्येही नाराजी पसरली. दरवर्षी हिवाळी अधिवेशनात यावर आवाज उठवला जाऊ लागला. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी चिटणीस पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेत सात दिवसांच्या आत हा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही काहीच झाले नाही. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनच दिले. मात्र कार्यवाही झाली नाही. दरम्यान आंबेडकरी संघटनांच्यावतीने सातत्याने आंदोलने सुरूआहेत. परंतु त्याला फारसे यश आलेले नाही.सत्तांतरामुळे अपेक्षा वाढल्या सध्या केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. मागील २३ वर्षांपासूनचा हा प्रश्न तत्कालीन सरकारला मार्गी लावता आला नाही. भाजपच्या काळात इंदू मिलचा प्रश्न मार्गी लागला. लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घराचे स्मारक करण्यात आले. त्यामुळे नागपुरातील डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाबाबत पुन्हा एकदा नव्याने अपेक्षा उंचावल्या आहेत.