शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मिळणार मुदतवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात डॉ. मिश्रा यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिले नसून, यासाठी त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार ...

ठळक मुद्देस्नातकोत्तर पदविका वाङ्मय चौर्यकर्मप्रकरण : आज परीक्षा मंडळाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात डॉ. मिश्रा यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिले नसून, यासाठी त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार असून त्यानंतरच फैसला की मुदतवाढ, हे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.डॉ. मिश्रा यांनी १९८७ साली गांधी विचारधारा अभ्यासक्रमात शोधप्रबंध सादर करताना गैरप्रकार केल्याचा आरोप तत्कालीन विधिसभा सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी लावला होता. हा आरोप १९९१ मध्ये लावण्यात आला व तत्कालीन कुलगुरूंनी न्यायिक चौकशीचे आदेश दिले होते. न्या. रत्नपारखी समितीने १९९२ साली काही तथ्य विद्यापीठासमोर मांडले. त्यानुसार डॉ. मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर. व्ही. राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती. त्यानंतर ९ आॅक्टोबर १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत रत्नपारखी समितीच्या अहवालाला मान्य करण्यात आले. डॉ. मिश्रा यांनी या निर्णयाला दिवाणी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यायालयाने हा दावा खारीज केला होता. १९९२ च्या निर्णयानुसार आतापर्यंत डॉ. मिश्रा यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती.यासंदर्भात परीक्षा मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली होती व डॉ. मिश्रा यांना नोटीस बजाविण्यात आली. स्पष्टीकरण देण्याची अखेरची मुदत ५ जानेवारी होती. मात्र डॉ. मिश्रा यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतरदेखील मुदतवाढ देण्यात आली असली तरी अद्यापपर्यंत त्यांच्याकडून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दिवाणी न्यायालयात त्यांनी जुनी याचिका पुनरुज्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार आहे. विद्यापीठ त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार पुरेसा वेळ देईल. परीक्षा मंडळाच्या बैठकीत १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येऊ शकते, असे संकेत कुलगुरूंनी मागेच दिले होते, हे विशेष.

 

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर