शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मिळणार मुदतवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात डॉ. मिश्रा यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिले नसून, यासाठी त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार ...

ठळक मुद्देस्नातकोत्तर पदविका वाङ्मय चौर्यकर्मप्रकरण : आज परीक्षा मंडळाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात डॉ. मिश्रा यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिले नसून, यासाठी त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार असून त्यानंतरच फैसला की मुदतवाढ, हे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.डॉ. मिश्रा यांनी १९८७ साली गांधी विचारधारा अभ्यासक्रमात शोधप्रबंध सादर करताना गैरप्रकार केल्याचा आरोप तत्कालीन विधिसभा सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी लावला होता. हा आरोप १९९१ मध्ये लावण्यात आला व तत्कालीन कुलगुरूंनी न्यायिक चौकशीचे आदेश दिले होते. न्या. रत्नपारखी समितीने १९९२ साली काही तथ्य विद्यापीठासमोर मांडले. त्यानुसार डॉ. मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर. व्ही. राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती. त्यानंतर ९ आॅक्टोबर १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत रत्नपारखी समितीच्या अहवालाला मान्य करण्यात आले. डॉ. मिश्रा यांनी या निर्णयाला दिवाणी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यायालयाने हा दावा खारीज केला होता. १९९२ च्या निर्णयानुसार आतापर्यंत डॉ. मिश्रा यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती.यासंदर्भात परीक्षा मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली होती व डॉ. मिश्रा यांना नोटीस बजाविण्यात आली. स्पष्टीकरण देण्याची अखेरची मुदत ५ जानेवारी होती. मात्र डॉ. मिश्रा यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतरदेखील मुदतवाढ देण्यात आली असली तरी अद्यापपर्यंत त्यांच्याकडून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दिवाणी न्यायालयात त्यांनी जुनी याचिका पुनरुज्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार आहे. विद्यापीठ त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार पुरेसा वेळ देईल. परीक्षा मंडळाच्या बैठकीत १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येऊ शकते, असे संकेत कुलगुरूंनी मागेच दिले होते, हे विशेष.

 

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर