शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मिळणार मुदतवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात डॉ. मिश्रा यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिले नसून, यासाठी त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार ...

ठळक मुद्देस्नातकोत्तर पदविका वाङ्मय चौर्यकर्मप्रकरण : आज परीक्षा मंडळाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात डॉ. मिश्रा यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिले नसून, यासाठी त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार असून त्यानंतरच फैसला की मुदतवाढ, हे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.डॉ. मिश्रा यांनी १९८७ साली गांधी विचारधारा अभ्यासक्रमात शोधप्रबंध सादर करताना गैरप्रकार केल्याचा आरोप तत्कालीन विधिसभा सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी लावला होता. हा आरोप १९९१ मध्ये लावण्यात आला व तत्कालीन कुलगुरूंनी न्यायिक चौकशीचे आदेश दिले होते. न्या. रत्नपारखी समितीने १९९२ साली काही तथ्य विद्यापीठासमोर मांडले. त्यानुसार डॉ. मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर. व्ही. राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती. त्यानंतर ९ आॅक्टोबर १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत रत्नपारखी समितीच्या अहवालाला मान्य करण्यात आले. डॉ. मिश्रा यांनी या निर्णयाला दिवाणी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यायालयाने हा दावा खारीज केला होता. १९९२ च्या निर्णयानुसार आतापर्यंत डॉ. मिश्रा यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती.यासंदर्भात परीक्षा मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली होती व डॉ. मिश्रा यांना नोटीस बजाविण्यात आली. स्पष्टीकरण देण्याची अखेरची मुदत ५ जानेवारी होती. मात्र डॉ. मिश्रा यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतरदेखील मुदतवाढ देण्यात आली असली तरी अद्यापपर्यंत त्यांच्याकडून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दिवाणी न्यायालयात त्यांनी जुनी याचिका पुनरुज्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार आहे. विद्यापीठ त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार पुरेसा वेळ देईल. परीक्षा मंडळाच्या बैठकीत १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येऊ शकते, असे संकेत कुलगुरूंनी मागेच दिले होते, हे विशेष.

 

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर