शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 10:49 IST

आज देशात जे एकूण पर्यटक येतात त्यापैकी ९० टक्के पर्यटक हे बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यामुळे नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्याची नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची संकल्पना असून त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

ठळक मुद्देफुटाळा तलाव परिसरात होणार बुद्धिस्ट थीम पार्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुद्धिस्ट सर्किटच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारण्यात येईल. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची ही संकल्पना असून त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या कॉरिडोरमुळे संशोधक व अभ्यासकांसह पर्यटकांनाही याचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री म्हणून नितीन राऊ त गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत बोलत होते. पालकमंत्री राऊत म्हणाले, आज भारतीय संविधानाबद्दल देशभरात चर्चा आहे. पर्यायाने भारतीय संविधानाचे शिल्पकार यांच्याबाबतही लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित अनेक स्थळे महाराष्ट्रात आहे. तेव्हा या महामानवाशी संबंधित स्थळांचा विकास करून त्याचा कॉरिडोर तयार केल्यास संशोधक व अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरेल. तसेच यातून पर्यटनाचाही विकास होईल.आज देशात जे एकूण पर्यटक येतात त्यापैकी ९० टक्के पर्यटक हे बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यामुळे नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्याचीही आपली योजना आहे. ही योजना अतिशय जुनी असली तरी आता ती पूर्ण केली जाईल. यात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती, पॅगोडा, विपश्यना केंद्र अशा सुविधा यात असतील. यामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. रोजगार वाढेल. यासाठी फुटाळा तलावाजवळील बायोडायव्हर्सिटीची जागा निश्चित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. झिरो माईलचे सौंदर्यीकरण व यशवंत स्टेडियमच्या जागेवर भव्य वास्तु तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राहुल पांडे यांनी संचालन केले. यावेळी संजय दुबे, राजा करवाडे, अनिल नगरारे, प्रभाकर दुपारे आदी उपस्थित होते.

२४ बाय ७ केवळ देखावापालकमंत्री राऊत यांनी यावेळी शहरातील २४ बाय ७ पाणीपुरवठा हा केवळ देखावा असल्याचे सांगितले. शहरात २४ तास पाणी कुठेही मिळत नाही. पाण्यासाठी टँकर बोलवावे लागतात. भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन कोच्चीवरून टनेलद्वारा पाणी आणण्यासाठी सरकार मध्य प्रदेश सरकारशी चर्चा करेल, असेही सांगितले.

नागपुरातील आयएएस कोचिंग सेंटर अपग्रेड होणारनागपुरात आयएएस कोचिंग सेंटर आहे. हे सेंटर अतिशय चांगले आहे. परंतु यात एक वर्षाचाच कोर्स आहे. हे सेंटर अपग्रेड करण्यात येईल. येथील कोर्स दोन वर्षाचा करण्याचा विचार आहे. यासोबतच येथील वाचनालय व क्लासरुमसुद्धा अपग्रेड केले जातील. उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर राऊत यांनी सांगितले की, भूमिपुत्राना नोकरी मिळालीच पाहिजे परंतु आमचे युवक काही गोष्टींमध्ये मागे राहतात. अशा वेळी त्यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र स्थापित करण्याची योजना असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले.

विकास योजनांचे श्रेयपालकमंत्री राऊत यांनी यावेळी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांचे श्रेय घेतले. त्यांनी सांगितले की, लॉ युनिव्हर्सिटी, आयआयएमसाठी मी प्रयत्न केले. शासकीय इंजिनियरिंग कॉलेज हे उत्तर नागपुरात होणार होते. परंतु फडणवीस ते आपल्या मतदार संघात घेऊन गेले. शहरातील उड्डाण पुलांच्या उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. आयआरडीपीचे मॉडेल रोड त्यांच्याच आमदार निधीतून साकारण्यात आले. मेट्रो रेल्वेचा संकल्पनाही काँग्रेसचीच आहे. मेट्रो जर भूमिगत असती तर शहरातील सौंदर्य कायम असते.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत