शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

संशय पुरावा ठरू शकत नाही

By admin | Updated: May 29, 2014 03:29 IST

संशयाला पुरावा म्हणून स्वीकारता येत नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई

नागपूर : संशयाला पुरावा म्हणून स्वीकारता येत नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात केला आहे. न्यायालयाने याप्रकरणात सरकारी पक्ष संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे आरोपीची शिक्षा रद्द केली आहे.

सुदाम मोतीराम रानमाळे (४४) असे आरोपीचे नाव असून तो काळेगाव, जि. हिंगोली येथील रहिवासी आहे. बुलडाणा सत्र न्यायालयाने २९ एप्रिल २0११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३0२ अंतर्गत आजन्म कारावास व १0 हजार रुपये दंड, कलम ३६३ व ३६४ अंतर्गत प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व १000 रुपये दंड, तर कलम २0१ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व १000 रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली होती.

याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील स्वीकारून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

आरोपी सुदामच्या पत्नीचे नाव काशीबाई असून त्यांना निर्मला नामक मुलगी आहे. काशीबाईची नातेवाईक रेखा व तिचा पती संजय नलिंदेच्या वडिलांनी दिलीप लोखंडेसोबत निर्मलाचे लग्न लावून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. सुदाम या लग्नामुळे आनंदी नव्हता. यामुळे सुदाम व रेखाच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता.

३0 मार्च २0१0 रोजी इयत्ता दुसरीत असलेली रेखाची ८ वर्षीय मुलगी रोहिणी शाळेत गेली होती. तिच्या शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंंत होती. यानंतर ती बराच वेळ घरी परतली नसल्याने संजय नलिंदेचा भाऊ राजेश शाळेत गेला. शाळेतील शिक्षक दत्तात्रय आखाडेने ४0 ते ४५ वर्षीय एक व्यक्ती सकाळी ९.३0 च्या सुमारास रोहिणीला सोबत घेऊन गेल्याचे सांगितले. हा व्यक्ती काळ्या रंगाचा आणि अंगात पांढरा सदरा व पायजमा घालून होता, अशी माहिती त्यांनी दिली. यावरून सुदामच रोहिणीला घेऊन गेल्याचा संशय आल्यानंतर संजय नलिंदेने दत्तात्रयला सुदामचे छायाचित्र दाखविले. दत्तात्रयने सुदामला ओळखले. यानंतर संजयने डोनगाव पोलीस ठाण्यात रोहिणी हरविल्याची तक्रार नोंदविली.

३१ मार्च रोजी काशीबाईने सुदाम परभणी रेल्वे स्टेशनवर भेटणार असल्याची माहिती दिली. सकाळी ११ वाजता सुदाम आला. तो दत्तात्रयला पाहून पळायला लागला, पण पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान सुदामने रोहिणीला वाशीम येथील अशोक जाधव नामक मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. पोलीस वाशीमला गेले असता अशोक चार-पाच दिवसांपासून घरी नसल्याचे कळले.

३ एप्रिल रोजी भारत काकडे नामक व्यक्तीने शेतातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना दिली. तो मृतदेह रोहिणीचा होता. शवविच्छेदन अहवालात रोहिणीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने १६ साक्षीदार तपासले होते.(प्रतिनिधी)