शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

बर्निंग ट्रेनची शंका : ब्रेक बाईंडिंग, प्रवाशांमध्ये घबराट, रेल्वे मंत्रालयात ट्विट अन् ...

By नरेश डोंगरे | Updated: July 9, 2023 22:31 IST

संपर्क क्रांतीच्या प्रवाशांमध्ये दहशत : गाडी नागपूरला येतानाची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हवेशी मैत्री करत धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या एका कोचमधून धूर निघताना दिसल्याने प्रवासी घाबरतात. शंका-कुशंकाचे पेव फुटते. एक तरुण लगेच लगेच ट्वीट करून रेल्वे मंत्रालयाला माहिती कळवितो. तत्परता अशी की लगेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचतात आणि दोष दुर (दुरूस्ती) करून गाडीला पुन्हा गती दिली जाते. घटना आज सायंकाळची आहे.

यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनकडे निघालेली १२६४९ संपर्क क्रांती एक्सप्रेस हवेशी मैत्री करत वेगाने नागपूरकडे येत असते. सायंकाळी ४:३५ च्या सुमारास कोच नंबर एस-३ मध्ये बसलेल्या प्रवाशांना धूर निघताना दिसतो. सारेच घाबरतात. बर्निंग ट्रेनची शंका अन् कल्पनेचा बाजार मांडून काही जण प्रवाशांची घबराट अधिकच गडद करतात. मोहम्मद आसिम नामक एक तरुण लगेच ट्विट करून रेल्वे मंत्रालयाला ही माहिती कळवितो. त्याची त्याच तत्परतेने दखल घेतली जाते. आरपीएफची महिला कर्मचारी पूजा कोच अटेंड करते. सायंकाळी ४:४० वाजता गाडी माजरी स्थानकाजवळ थांबवली जाते. हा 'ब्रेक बाइंडिंग'चा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच कॅरेज अॅन्ड वॅगन डिपार्टमेंटचे पथकही पोहचते. १० ते १५ मिनिटात दुरूस्ती केली जाते आणि गाडी पुन्हा आधी पेक्षा जास्त वेगाने नागपूरकडे धावायला सुुरूवात करते.

काय आहे ब्रेक बाइंडिंग ?

ट्रेनमध्ये लोखंडी ब्रेक शू असतो. गती कमी करण्यासाठी लावण्यात आलेला ब्रेक काही वेळा ट्रेनच्या चाकासोबत जुळून राहतो आणि त्याच अवस्थेत ट्रेन धावत असल्याने घर्षण होते. परिणामी धूर निघतो. त्याला ब्रेक बाइंडिंग म्हणतात. दरम्यान, हा धूर पाहून सरळ साधे प्रवासी घाबरतात. वेगवेगळ्या शंका-कुशंकामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण होते. कुणी बर्निंग ट्रेनचीही शंका उठवतो. त्यामुळे प्रवासी जास्तच घाबरतात. मात्र, येथे घाबरण्यासारखे काहीही नसते.

अशी होते दुरूस्तीब्रेक बाइंडिंगला सामान्यांच्या भाषेत 'ब्रेक चक्क्याला चिपकने' म्हणतात. ब्रेक बाइंडिंग झाल्यास गाडी थांबवून ट्रेनचा प्रशिक्षित कर्मचारी, लोको पायलट अथवा गार्ड तेथे पोहचतो आणि वॅक्यूम रिलिज करून हा दोष दूर केला जातो. त्यानंतर ब्रेक आधीसारखा होतो आणि चक्काही फ्री होतो. हा दोष केवळ १० ते १५ मिनिटात ठिक केला जातो. रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मते ही एक सामान्य घडामोड असते, असे या संबंधाने माहिती देताना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य विजय ढवळे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे