शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बर्निंग ट्रेनची शंका : ब्रेक बाईंडिंग, प्रवाशांमध्ये घबराट, रेल्वे मंत्रालयात ट्विट अन् ...

By नरेश डोंगरे | Updated: July 9, 2023 22:31 IST

संपर्क क्रांतीच्या प्रवाशांमध्ये दहशत : गाडी नागपूरला येतानाची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हवेशी मैत्री करत धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या एका कोचमधून धूर निघताना दिसल्याने प्रवासी घाबरतात. शंका-कुशंकाचे पेव फुटते. एक तरुण लगेच लगेच ट्वीट करून रेल्वे मंत्रालयाला माहिती कळवितो. तत्परता अशी की लगेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचतात आणि दोष दुर (दुरूस्ती) करून गाडीला पुन्हा गती दिली जाते. घटना आज सायंकाळची आहे.

यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनकडे निघालेली १२६४९ संपर्क क्रांती एक्सप्रेस हवेशी मैत्री करत वेगाने नागपूरकडे येत असते. सायंकाळी ४:३५ च्या सुमारास कोच नंबर एस-३ मध्ये बसलेल्या प्रवाशांना धूर निघताना दिसतो. सारेच घाबरतात. बर्निंग ट्रेनची शंका अन् कल्पनेचा बाजार मांडून काही जण प्रवाशांची घबराट अधिकच गडद करतात. मोहम्मद आसिम नामक एक तरुण लगेच ट्विट करून रेल्वे मंत्रालयाला ही माहिती कळवितो. त्याची त्याच तत्परतेने दखल घेतली जाते. आरपीएफची महिला कर्मचारी पूजा कोच अटेंड करते. सायंकाळी ४:४० वाजता गाडी माजरी स्थानकाजवळ थांबवली जाते. हा 'ब्रेक बाइंडिंग'चा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच कॅरेज अॅन्ड वॅगन डिपार्टमेंटचे पथकही पोहचते. १० ते १५ मिनिटात दुरूस्ती केली जाते आणि गाडी पुन्हा आधी पेक्षा जास्त वेगाने नागपूरकडे धावायला सुुरूवात करते.

काय आहे ब्रेक बाइंडिंग ?

ट्रेनमध्ये लोखंडी ब्रेक शू असतो. गती कमी करण्यासाठी लावण्यात आलेला ब्रेक काही वेळा ट्रेनच्या चाकासोबत जुळून राहतो आणि त्याच अवस्थेत ट्रेन धावत असल्याने घर्षण होते. परिणामी धूर निघतो. त्याला ब्रेक बाइंडिंग म्हणतात. दरम्यान, हा धूर पाहून सरळ साधे प्रवासी घाबरतात. वेगवेगळ्या शंका-कुशंकामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण होते. कुणी बर्निंग ट्रेनचीही शंका उठवतो. त्यामुळे प्रवासी जास्तच घाबरतात. मात्र, येथे घाबरण्यासारखे काहीही नसते.

अशी होते दुरूस्तीब्रेक बाइंडिंगला सामान्यांच्या भाषेत 'ब्रेक चक्क्याला चिपकने' म्हणतात. ब्रेक बाइंडिंग झाल्यास गाडी थांबवून ट्रेनचा प्रशिक्षित कर्मचारी, लोको पायलट अथवा गार्ड तेथे पोहचतो आणि वॅक्यूम रिलिज करून हा दोष दूर केला जातो. त्यानंतर ब्रेक आधीसारखा होतो आणि चक्काही फ्री होतो. हा दोष केवळ १० ते १५ मिनिटात ठिक केला जातो. रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मते ही एक सामान्य घडामोड असते, असे या संबंधाने माहिती देताना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य विजय ढवळे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे