शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

वृद्धाश्रमाची दारे वृद्धांसाठीच बंद

By admin | Updated: October 1, 2015 03:06 IST

आयुष्याची संध्याकाळ सुखमय व्हावी म्हणून मुलांच्या भविष्यासाठी मायबाप आयुष्यभर खस्ता खातात.

मंगेश व्यवहारे नागपूरआयुष्याची संध्याकाळ सुखमय व्हावी म्हणून मुलांच्या भविष्यासाठी मायबाप आयुष्यभर खस्ता खातात. मुले मोठी झाल्यानंतर हेच मायबाप त्यांना डोईजड वाटतात. यातूनच वृद्धांची वृद्धाश्रमाकडे वाटचाल होत आहे. परंतु वृद्धाश्रमानेही आता वृद्धांसाठी दारे बंद केली आहेत. कारण वृद्धाश्रमांना २००९ पासून सरकारने अनुदानच दिलेले नाही. त्यामुळे संस्थांना वृद्धाश्रम चालविणे कठीण झाल्याने नवीन वृद्धांना प्रवेशच नाकारले आहेत. वृद्धांचा वृद्धाश्रमाकडे वाढता कल लक्षात घेता, आधुनिकतेकडे वाटचाल करणारा समाज, आपली संस्कृती हरवत चालल्याचे दिसत आहे. ज्येष्ठांना आयुष्याच्या संध्याकाळी जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दरवर्षी ज्येष्ठ नागरिकदिन साजरा करताना संस्था, शासन मोठ्या पोटतिडिकीने त्यांच्यावर बोलतात. प्रत्यक्षात काही करण्याची वेळ येते तेव्हा कुठलीही संस्था, शासन त्यांच्याकडे डोळेझाक करतात. वृद्धांना घरातून हाकलणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना अडगळीत ठेवणे, आई-वडिलांना सोडून नोकरीच्या नावाने दुसऱ्या शहरात कुटुंबासह स्थानांतरित होणे या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमाकडे वळताना दिसत आहेत. ज्या वृद्धांनी आपल्याजवळ काही पुंजी ठेवली आहे, अशा वृद्धांना खाजगी अनाथालयात जागाही मिळते. परंतु ज्या वृद्धांचा मुलांचे संगोपन करताना संपूर्ण पैसा खर्च झाला आहे. अशा वृद्धांना अनुदानित वृद्धाश्रमाशिवाय पर्याय नाही. शहरात होम फॉर एजेड आणि पंचवटी हे शासन अनुदानित वृद्धाश्रम आहेत. दोन्ही वृद्धाश्रमामध्ये १३० वृद्धांच्या निवाऱ्याची सोय आहे. समाजकल्याणच्या माध्यमातून या वृद्धाश्रमांना अनुदान दिले जाते. परंतु २००९ पासून वृद्धाश्रमांना अनुदानच मिळाले नाही. त्यामुळे वृद्धांची देखभाल, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे या वृद्धाश्रमांना कठीण झाले आहे. यासंदर्भात वारंवार समाजकल्याण विभागाला तक्रारी देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आहे त्याच वृद्धांची काळजी घेणे कठीण जात असल्याने नवीन येणाऱ्या वृद्धांचा वृद्धाश्रमांनी प्रवेशच नाकारला आहे.हक्काच्या अनुदानापासून वंचितवृद्धापकाळामुळे त्यांचे आजार वाढले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्यापेक्षाही त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. वृद्धांसाठी विशेष रुग्णालय नसल्याने दररोज मेडिकलमध्ये चकरा माराव्या लागतात. लहान मुलांसारखी वृद्धांची काळजी घ्यावी लागते. वृद्धांची काळजी आणि सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागते. दानदाते केवळ अन्न देतात. त्याव्यतिरिक्त इतर खर्च वृद्धाश्रमाला अवघड जात आहे. त्यासाठी शासनाकडे पैशाची मागणी आम्ही करीत आहोत. शासन मात्र बजेटच नसल्याचे सांगून या वृद्धांना हक्काच्या अनुदानापासून वंचित ठेवत आहे. -सिस्टर दया, होम फॉर एजेडअतिशय बिकट अवस्था स्वत:च्या मायबापाला वृद्धाश्रमात आणताना, स्वत:ची ओळख लपवणारी मुले आहेत. कळवूनही रुग्णालयात पडलेल्या मायबापाला भेटायला कोणी येत नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारायला कुणी तयार नाही. वाळीत टाकल्यागत अवस्था वृद्धाश्रमातील वृद्धांची झाली आहे. अनेक वृद्ध वर्षानुवर्षे खितपत पडले आहेत. वृद्धांची जबाबदारी केवळ अनाथालयाचीच नाही तर शासन आणि समाजानेही त्यांची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. -डॉ. लता देशमुख, सचिव, मातृ सेवा संघ