शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

पुण्या-मुंबईत शिक्षण नको रे बाबा...; विदर्भातील महाविद्यालयांना ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 09:13 IST

मुंबई व पुण्याच्या व्यतिरिक्त देशाच्या इतर राज्यात ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता फारच कमी लोक बाहेर प्रवेश घेतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नागपूर व अमरावती विभागातील महाविद्यालयांचाच पर्याय असेल.

ठळक मुद्दे‘डीटीई’चा अंदाज

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या नागपूर व अमरावती विभागातील अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांना यंदा दिलासा मिळू शकतो. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील अनेक महाविद्यालयांत ‘अच्छे दिन’ येऊ शकतात. यंदा दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांची कमतरता राहणार नाही.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ‘कोरोना’चा प्रकोप लक्षात घेता ‘डीटीई’कडून हा अंदाज लावण्यात आला आहे. मुंबई व पुण्याच्या व्यतिरिक्त देशाच्या इतर राज्यात ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता फारच कमी लोक बाहेर प्रवेश घेतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नागपूर व अमरावती विभागातील महाविद्यालयांचाच पर्याय असेल. ‘आयआयटी’ व ‘एनआयटी’नंतर विद्यार्थी विदर्भातीलच ‘टॉप’ महाविद्यालयांत प्रवेशांवर भर देतील.विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे मागील सहा वर्षांपासून सातत्याने अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालये बंद होत आहेत. २०१७ मध्ये विभागात ६० अभियांत्रिकी महाविद्यालये होती व तेथे २४ हजार जागा होत्या. २०१९ मध्ये ही संख्या ४७ झाली व जागा १८ हजार २४० झाल्या. २०१९-२० मध्ये स्थिती बदलू शकली नाही. विभागातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’ व ‘डीटीई’सोबत विद्यापीठालादेखील महाविद्यालय व अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविले होते. यासंदर्भात विद्यापीठाच्या समितीने प्रस्ताव मंजूर केले आहेत.या महाविद्यालयांनी पाठविला होता प्रस्तावविद्यापीठाला प्रस्ताव पाठविणाºया महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग-वानाडोंगरी-नागपूर, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी-सावंगी मेघे-वर्धा, मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन यांनी महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव दिला होता तर जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने ‘एमटेक’सोबतच ‘बीटेक’चे काही अभ्यासक्रम बंद करणे तसेच काहींची प्रवेश क्षमता घटविण्याचा प्रस्ताव दिला होता. केडीके कॉलेज ऑफ इंजिनियरिंगतर्फेदेखील काही अभ्यासक्रम बंद करणे व प्रवेश क्षमता घटविण्याचा प्रस्ताव दिला होता. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने ‘एमटेक’चा एक अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव दिला. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगनेदेखील अभ्यासक्रम बंद करणे व प्रवेश क्षमता घटविण्याचा प्रस्ताव दिला होता. मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने प्रवेश क्षमता कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता.‘कोरोना’चा प्रभाव‘कोरोना’च्या संसर्गामुळे विद्यार्थी पुणे व मुंबई जाण्यासंदर्भात नक्कीच विचार करतील. अशा स्थितीत नागपूर व अमरावती विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्राथमिकता देण्याचा ते विचार करतील. विभागांमध्ये चांगल्या अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांची कमतरता नाही, असे मत ‘डीटीई’चे विभागीय सहसंचालक डॉ.राम निबुदे यांनी व्यक्त केल्

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र