शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पुण्या-मुंबईत शिक्षण नको रे बाबा...; विदर्भातील महाविद्यालयांना ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 09:13 IST

मुंबई व पुण्याच्या व्यतिरिक्त देशाच्या इतर राज्यात ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता फारच कमी लोक बाहेर प्रवेश घेतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नागपूर व अमरावती विभागातील महाविद्यालयांचाच पर्याय असेल.

ठळक मुद्दे‘डीटीई’चा अंदाज

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या नागपूर व अमरावती विभागातील अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांना यंदा दिलासा मिळू शकतो. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील अनेक महाविद्यालयांत ‘अच्छे दिन’ येऊ शकतात. यंदा दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांची कमतरता राहणार नाही.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ‘कोरोना’चा प्रकोप लक्षात घेता ‘डीटीई’कडून हा अंदाज लावण्यात आला आहे. मुंबई व पुण्याच्या व्यतिरिक्त देशाच्या इतर राज्यात ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता फारच कमी लोक बाहेर प्रवेश घेतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नागपूर व अमरावती विभागातील महाविद्यालयांचाच पर्याय असेल. ‘आयआयटी’ व ‘एनआयटी’नंतर विद्यार्थी विदर्भातीलच ‘टॉप’ महाविद्यालयांत प्रवेशांवर भर देतील.विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे मागील सहा वर्षांपासून सातत्याने अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालये बंद होत आहेत. २०१७ मध्ये विभागात ६० अभियांत्रिकी महाविद्यालये होती व तेथे २४ हजार जागा होत्या. २०१९ मध्ये ही संख्या ४७ झाली व जागा १८ हजार २४० झाल्या. २०१९-२० मध्ये स्थिती बदलू शकली नाही. विभागातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’ व ‘डीटीई’सोबत विद्यापीठालादेखील महाविद्यालय व अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविले होते. यासंदर्भात विद्यापीठाच्या समितीने प्रस्ताव मंजूर केले आहेत.या महाविद्यालयांनी पाठविला होता प्रस्तावविद्यापीठाला प्रस्ताव पाठविणाºया महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग-वानाडोंगरी-नागपूर, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी-सावंगी मेघे-वर्धा, मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन यांनी महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव दिला होता तर जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने ‘एमटेक’सोबतच ‘बीटेक’चे काही अभ्यासक्रम बंद करणे तसेच काहींची प्रवेश क्षमता घटविण्याचा प्रस्ताव दिला होता. केडीके कॉलेज ऑफ इंजिनियरिंगतर्फेदेखील काही अभ्यासक्रम बंद करणे व प्रवेश क्षमता घटविण्याचा प्रस्ताव दिला होता. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने ‘एमटेक’चा एक अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव दिला. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगनेदेखील अभ्यासक्रम बंद करणे व प्रवेश क्षमता घटविण्याचा प्रस्ताव दिला होता. मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने प्रवेश क्षमता कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता.‘कोरोना’चा प्रभाव‘कोरोना’च्या संसर्गामुळे विद्यार्थी पुणे व मुंबई जाण्यासंदर्भात नक्कीच विचार करतील. अशा स्थितीत नागपूर व अमरावती विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्राथमिकता देण्याचा ते विचार करतील. विभागांमध्ये चांगल्या अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांची कमतरता नाही, असे मत ‘डीटीई’चे विभागीय सहसंचालक डॉ.राम निबुदे यांनी व्यक्त केल्

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र