शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:37 IST

सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई असूनही नागरिकांनी त्रास सहन केला. दोन दिवसाच्या पावसात मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाला. लोकांच्या घरात पाणी शिरले. नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. आयुक्त फोन उचलत नाही. प्रभागातील अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.कोरोनाचे कारण पुढे करून २० जूनला होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याची माहिती सोमवारी निगम सचिवांनी महापौर कार्यालयाला पाठविलेल्या पत्रातून दिली. यामुळे मनपातील सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मागील चार महिन्यात सभागृह झाले नाही. प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. नागरिकांच्या समस्या सोडविता येत नाही. राज्यातील काही महापालिकांच्या सभा झाल्या. मग नागपूर मनपाची सभा का नाही. प्रशासनाला असाच कारभार करावयाचा असेल तर मनपा बरखास्त करून नगरसेवकांना घरी बसवावे, अशा शब्दात नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.प्रशासनाची भूमिका लोकशाहीला घातकमनपाची सर्वसाधारण सभा फेब्रुवारी महिन्यात झाली. गेल्या चार महिन्यात सर्वसाधारण सभा झालेली नाही. प्रभागातील विकास कामे, पावसाळ्यातील उपाययोजना, पुढील वर्षाचा अर्थसंकल्प, अर्धवट कामे मार्गी लागावीत, नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता याव्यात, यासाठी २० जूनला सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. कोरोना संसर्गाचा विचार करता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवण्यासाठी सुरेश भट सभागृहात ही सभा घेतली जाणार आहे. असे असूनही मनपा प्रशासनाची सभा रद्द करण्याची भूमिका लोकशाहीला घातक आहे.संदीप जाधव, सत्तापक्ष नेता, मनपा...तर मनपाच बरखास्त करा!शासन दिशानिर्देशांचे पालन करून मनपाची सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. असे असतानाही मनपा प्रशासनाकडून सभा रद्द होत असेल, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना कोणतीही कामे करता येत नसतील तर मनपाच बरखास्त करा, मनपा आयुक्तांची भूमिका लोकशाहीला घातक आहे.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, मनपानागरिकांच्या समस्या कशा सोडवणार?प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या तक्रारी नगरसेवक प्रशासनाकडे मनपा प्रशासनाकडे मांडतात. परंतु मागील चार महिन्यापासून नगरसेवकांचे फोन उचलले जात नाही. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. दुसरीकडे नागरिकांच्या रोषाला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यात सभागृह रद्द होत असेल तर नगरसेवक तक्रारी कुणाकडे करणार?दुनेश्वर पेठे, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका