शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:37 IST

सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई असूनही नागरिकांनी त्रास सहन केला. दोन दिवसाच्या पावसात मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाला. लोकांच्या घरात पाणी शिरले. नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. आयुक्त फोन उचलत नाही. प्रभागातील अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.कोरोनाचे कारण पुढे करून २० जूनला होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याची माहिती सोमवारी निगम सचिवांनी महापौर कार्यालयाला पाठविलेल्या पत्रातून दिली. यामुळे मनपातील सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मागील चार महिन्यात सभागृह झाले नाही. प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. नागरिकांच्या समस्या सोडविता येत नाही. राज्यातील काही महापालिकांच्या सभा झाल्या. मग नागपूर मनपाची सभा का नाही. प्रशासनाला असाच कारभार करावयाचा असेल तर मनपा बरखास्त करून नगरसेवकांना घरी बसवावे, अशा शब्दात नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.प्रशासनाची भूमिका लोकशाहीला घातकमनपाची सर्वसाधारण सभा फेब्रुवारी महिन्यात झाली. गेल्या चार महिन्यात सर्वसाधारण सभा झालेली नाही. प्रभागातील विकास कामे, पावसाळ्यातील उपाययोजना, पुढील वर्षाचा अर्थसंकल्प, अर्धवट कामे मार्गी लागावीत, नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता याव्यात, यासाठी २० जूनला सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. कोरोना संसर्गाचा विचार करता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवण्यासाठी सुरेश भट सभागृहात ही सभा घेतली जाणार आहे. असे असूनही मनपा प्रशासनाची सभा रद्द करण्याची भूमिका लोकशाहीला घातक आहे.संदीप जाधव, सत्तापक्ष नेता, मनपा...तर मनपाच बरखास्त करा!शासन दिशानिर्देशांचे पालन करून मनपाची सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. असे असतानाही मनपा प्रशासनाकडून सभा रद्द होत असेल, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना कोणतीही कामे करता येत नसतील तर मनपाच बरखास्त करा, मनपा आयुक्तांची भूमिका लोकशाहीला घातक आहे.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, मनपानागरिकांच्या समस्या कशा सोडवणार?प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या तक्रारी नगरसेवक प्रशासनाकडे मनपा प्रशासनाकडे मांडतात. परंतु मागील चार महिन्यापासून नगरसेवकांचे फोन उचलले जात नाही. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. दुसरीकडे नागरिकांच्या रोषाला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यात सभागृह रद्द होत असेल तर नगरसेवक तक्रारी कुणाकडे करणार?दुनेश्वर पेठे, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका