शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल नको : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 11:27 IST

कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देजगाला समजेल त्याच भाषेत आपले महत्व समजवावे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगातील आर्थिक उतारचढाव फारसे परिणाम करू शकत नाही, असे आपले अर्थकारण राहिले आहे. सहकार व लहान उद्योगांमुळेच हे शक्य झाले आहे. देशाची आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत होणे गरजेचे आहे. परंतु अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल करून काहीही फायदा होणार नाही. कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

एकेकाळी ‘इम्पोर्टेड’ वस्तूंचे महत्त्व होते. आता निर्यातीचे महत्त्व वाढले आहे. देशाचे आर्थिक बळ निर्माण झाले पाहिजे. हे समाजातील उद्योजकतेतूनच शक्य आहे. भारताला जगाला आपले ‘मार्केट’ बनवायचे नाही, तर एक कुटुंब बनवायचे आहे. तरीदेखील आपल्या उत्पादनांचे महत्त्व जगाला जी भाषा समजेल त्याच भाषेत समजवावे लागेल. गुणवत्तेसोबतच मार्केटिंगलादेखील महत्त्व आले असून, चांगल्या उत्पादनांचे ब्रॅण्ड बनायला हवे, असे सरसंघचालक म्हणाले.

छोट्या उद्योगांना बळकटी मिळावी

सहकारितेच्या मागे गुणवत्ता आवश्यक असते. त्यात स्वार्थाला जागा नसते. मात्र सहकारात स्वार्थ आला तर त्याचा स्वाहाकार होतो. सद्य:स्थितीत देशातील छोटे उद्योग व कारागीर यांना बळकटी मिळाली पाहिजे. सहकाराचे काम व्यवसाय करणे नव्हे तर देशाची उभारणी करण्याचे आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात मूठभर लोकांचेच खिसे भरत नाहीत

जगातील देश व्यापाराला नफ्याचे साधन मानतात. परदेशातील व्यापार, उद्योगात काही लोक कंपन्यांचे मालक असतात आणि इतर लोक त्या कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्या व्यवसायातून होणारा लाभ मूठभर लोकांच्या खिशात जातो. परंतु, भारतात असे अजिबात नाही. या भावनांमुळे येथे व्यापारधर्म हा शब्द रूढ झाला आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMohan Bhagwatमोहन भागवतEconomyअर्थव्यवस्था