शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल नको : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 11:27 IST

कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देजगाला समजेल त्याच भाषेत आपले महत्व समजवावे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगातील आर्थिक उतारचढाव फारसे परिणाम करू शकत नाही, असे आपले अर्थकारण राहिले आहे. सहकार व लहान उद्योगांमुळेच हे शक्य झाले आहे. देशाची आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत होणे गरजेचे आहे. परंतु अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल करून काहीही फायदा होणार नाही. कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

एकेकाळी ‘इम्पोर्टेड’ वस्तूंचे महत्त्व होते. आता निर्यातीचे महत्त्व वाढले आहे. देशाचे आर्थिक बळ निर्माण झाले पाहिजे. हे समाजातील उद्योजकतेतूनच शक्य आहे. भारताला जगाला आपले ‘मार्केट’ बनवायचे नाही, तर एक कुटुंब बनवायचे आहे. तरीदेखील आपल्या उत्पादनांचे महत्त्व जगाला जी भाषा समजेल त्याच भाषेत समजवावे लागेल. गुणवत्तेसोबतच मार्केटिंगलादेखील महत्त्व आले असून, चांगल्या उत्पादनांचे ब्रॅण्ड बनायला हवे, असे सरसंघचालक म्हणाले.

छोट्या उद्योगांना बळकटी मिळावी

सहकारितेच्या मागे गुणवत्ता आवश्यक असते. त्यात स्वार्थाला जागा नसते. मात्र सहकारात स्वार्थ आला तर त्याचा स्वाहाकार होतो. सद्य:स्थितीत देशातील छोटे उद्योग व कारागीर यांना बळकटी मिळाली पाहिजे. सहकाराचे काम व्यवसाय करणे नव्हे तर देशाची उभारणी करण्याचे आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात मूठभर लोकांचेच खिसे भरत नाहीत

जगातील देश व्यापाराला नफ्याचे साधन मानतात. परदेशातील व्यापार, उद्योगात काही लोक कंपन्यांचे मालक असतात आणि इतर लोक त्या कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्या व्यवसायातून होणारा लाभ मूठभर लोकांच्या खिशात जातो. परंतु, भारतात असे अजिबात नाही. या भावनांमुळे येथे व्यापारधर्म हा शब्द रूढ झाला आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMohan Bhagwatमोहन भागवतEconomyअर्थव्यवस्था