शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल नको : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 11:27 IST

कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देजगाला समजेल त्याच भाषेत आपले महत्व समजवावे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगातील आर्थिक उतारचढाव फारसे परिणाम करू शकत नाही, असे आपले अर्थकारण राहिले आहे. सहकार व लहान उद्योगांमुळेच हे शक्य झाले आहे. देशाची आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत होणे गरजेचे आहे. परंतु अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल करून काहीही फायदा होणार नाही. कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

एकेकाळी ‘इम्पोर्टेड’ वस्तूंचे महत्त्व होते. आता निर्यातीचे महत्त्व वाढले आहे. देशाचे आर्थिक बळ निर्माण झाले पाहिजे. हे समाजातील उद्योजकतेतूनच शक्य आहे. भारताला जगाला आपले ‘मार्केट’ बनवायचे नाही, तर एक कुटुंब बनवायचे आहे. तरीदेखील आपल्या उत्पादनांचे महत्त्व जगाला जी भाषा समजेल त्याच भाषेत समजवावे लागेल. गुणवत्तेसोबतच मार्केटिंगलादेखील महत्त्व आले असून, चांगल्या उत्पादनांचे ब्रॅण्ड बनायला हवे, असे सरसंघचालक म्हणाले.

छोट्या उद्योगांना बळकटी मिळावी

सहकारितेच्या मागे गुणवत्ता आवश्यक असते. त्यात स्वार्थाला जागा नसते. मात्र सहकारात स्वार्थ आला तर त्याचा स्वाहाकार होतो. सद्य:स्थितीत देशातील छोटे उद्योग व कारागीर यांना बळकटी मिळाली पाहिजे. सहकाराचे काम व्यवसाय करणे नव्हे तर देशाची उभारणी करण्याचे आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात मूठभर लोकांचेच खिसे भरत नाहीत

जगातील देश व्यापाराला नफ्याचे साधन मानतात. परदेशातील व्यापार, उद्योगात काही लोक कंपन्यांचे मालक असतात आणि इतर लोक त्या कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्या व्यवसायातून होणारा लाभ मूठभर लोकांच्या खिशात जातो. परंतु, भारतात असे अजिबात नाही. या भावनांमुळे येथे व्यापारधर्म हा शब्द रूढ झाला आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMohan Bhagwatमोहन भागवतEconomyअर्थव्यवस्था