शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

घरगुती आणि विदेशी टूर रद्द; पर्यटनावर ९० टक्के परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 11:26 IST

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका नागपुरातील टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसू लागला आहे.

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका नागपुरातील टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसू लागला आहे. चीनसह, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, बँकॉक, युरोपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असून सध्या ३ हजारांपेक्षा जास्त तिकिटे रद्द झाली आहेत. कोरोनामुळे घरगुती आणि विदेशी पर्यटनावर ९० टक्के परिणाम झाला आहे. हीच स्थिती पुढे काही दिवस राहणार आहे. यावर्षी उन्हाळ्यात कुलर लावून घरी झोपण्याची पाळी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर आल्याची उपरोधिक टीका एका कंपनीच्या संचालकाने लोकमतशी बोलताना केली.नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातून विदेशात पर्यटनाला जाणाऱ्यांची वार्षिक संख्या जवळपास ७५ हजार आहे. सर्वाधिक टूर एप्रिल ते जुलैपर्यंत असतात. विदेशात सहलीचे आयोजन करणाऱ्या एका ट्रॅव्हल्स कंपनीने आर्थिक तोटा सहन करून १५ जुलैपर्यंतचे सहा टूर रद्द केले आहेत. या काळात कंपनी २०० पेक्षा जास्त पर्यटकांना विदेशात पाठविणार होती. लोकांशी चर्चा करून टूर रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. विदेशात सहलीचे आयोजन करणारे नागपुरात २५० पेक्षा जास्त एजंट आहेत. मोठ्या कंपन्यांची नागपुरात कार्यालये आहेत. या सर्वांनी देशांतर्गत आणि विदेशातील टूर रद्द केले आहेत. लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. सर्वांना जग पाहायचे आहे. सोबतच विदेशात जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. नागपुरात हजारोंच्या संख्येने पर्यटक विदेशात जातात. पण यावर्षी कोरोना व्हायरसमुळे पर्यटकांनी टूर रद्द केले आहेत. त्याचा फटका टूर ऑपरेटर्सला बसत आहे. अशावेळी तिकिटांचे पैसे परत करून विमान कंपन्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

३३ वर्षांत पहिल्यांदाच अशी स्थितीसर्वाधिक रोजगार देणारा हा उद्योग सध्या मंदीत आहे. ३३ वर्षांच्या कार्यकाळात पर्यटन क्षेत्रात पहिल्यांदाच अशी स्थिती पाहत आहे. आता सर्वच देश सतर्क झाले आहेत. आम्ही लोकांची चर्चा करून जुलैपर्यंतचे सहा विदेशी टूर रद्द केले आहेत. हीच स्थिती अन्य कंपन्यांची आहे. जोखिम असल्याने कुणीही प्रवास करण्यास तयार नाहीत. कोरोनाची भीती दूर झाल्यानंतर लोक पुन्हा प्रवास करतील, असा विश्वास टूर ऑपरेटरने व्यक्त केला.

परत मिळत नाही हवाई तिकिटांची रक्कमदेशविदेशातील टूर रद्द होत असताना विमान कंपन्यांनी टूर ऑपरेटर्सला सहकार्य करण्याची भावना ठेवावी. पण असे होताना दिसत नाही. प्रत्येक विमान कंपनीचे वेगवेगळे नियम आहेत. कुणी काही रक्कम कापून पैसे परत करतात तर काही तिकिटाचे पैसे परत करीत नाहीत. याचा फटका पर्यटकांना बसत असून तिकिटांच्या पैशावर पाणी सोडावे लागत आहे. टूर रद्द होत असल्याचे बघताच काही विमान कंपन्यांनी कुठलीही रक्कम न कापता ३१ मार्चपर्यंत बुकिंगची तारीख पुढे वाढविण्याचे आवाहन टूर ऑपरेटर्स आणि पर्यटकांना केले आहे. पण कोरोना विषाणूचा प्रभाव संपूर्ण जगात पसरत असल्याने कुणीही पर्यटक पुढील तारीख वाढविण्यास तयार नाहीत. शिवाय विदेशात जाण्याची त्यांची मानसिक तयारी नाही.

दुबईहून आलेले २४ जण सुखरूपदेशातील थंड हवेच्या ठिकाणांसह विदेशातील टूर रद्द होत आहेत. शारीरिक त्रास होऊ नये म्हणून अनेकजण नकार देत आहेत. त्यामुळे उद्योग धोक्यात आला आहे. १ ते ६ मार्चपर्यंत २४ जणांना दुबईत नेले होते. सर्वांची शारजाह आणि नागपूर विमानतळावर तपासणी करण्यात आली असून सर्व सुखरूप आहेत. भूतानने पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. कतार एअरवेजने १४ देशांच्या फेऱ्या बंद केल्याचे ऑपरेटर म्हणाला.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस