शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

नगरसेवक निवडणूकपूर्व अवैध बांधकामामुळे अपात्र ठरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 22:26 IST

councilor issue High courtनगरसेवकाला अपात्र ठरविण्यासाठी त्याने निवडणुकीपूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा विचार केला जाऊ शकतो का? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील द्विसदस्यीयपीठाने निर्धारित केला आहे. हा प्रश्न योग्य खुलासा होण्यासाठी तीन सदस्यीय पूर्णपीठाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाने निश्चित केला प्रश्न, पूर्णपीठासमक्ष होईल सुनावणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : नगरसेवकाला अपात्र ठरविण्यासाठी त्याने निवडणुकीपूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा विचार केला जाऊ शकतो का? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील द्विसदस्यीयपीठाने निर्धारित केला आहे. हा प्रश्न योग्य खुलासा होण्यासाठी तीन सदस्यीय पूर्णपीठाकडे पाठविण्यात आला आहे.

यासह आणखी दोन प्रश्न पूर्णपीठाकडे पाठविण्यात आले आहेत. एखाद्या नगरसेवकाने निवडून आल्यानंतर किंवा त्यापूर्वी नवीन मालमत्ता संपादित केली असेल आणि त्या मालमत्तेत आधीच अनधिकृत बांधकाम केले गेले असेल, तर त्या अनधिकृत बांधकामाच्या आधारेदेखील नगरसेवकाला अपात्र ठरवले जाऊ शकते का? हा न्यायालयाचा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न महानगरपालिका आयुक्तांच्या अधिकाराशी संबंधित आहे. महानगरपालिका आयुक्त हे नगरसेवकाच्या अपात्रतेचा संदर्भ स्वत: दिवाणी न्यायाधीशाकडे पाठवू शकतात की, त्यांनी संबंधित संदर्भ योग्य निर्णयासाठी मनपा सर्वसाधारण मंडळाकडे सादर करायला पाहिजे, असे या प्रश्नात नमूद करण्यात आले आहे. या मुद्यांविषयी एडविन ब्रिट्टो, मल्लेश शेट्टी यासह विविध प्रकरणातील निर्णयात न्यायालयाने वेगवेगळी भूमिका मांडली आहे. परिणामी, हे तीन प्रश्न योग्य खुलासा होण्यासाठी पूर्णपीठाकडे पाठविण्यात आले आहेत.

या प्रकरणात प्रश्न निश्चित

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी तिलोत्तमा किनखेडे यांच्या याचिकेमध्ये सदर प्रश्न निश्चित केले. वॉर्ड १४-डी मधून प्रगती पाटील यांनी किनखेडे यांना हरवून विजय मिळविला. त्यानंतर किनखेडे यांनी पाटील यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर आक्षेप घेऊन त्यांना अपात्र ठरविण्यासाठी ३ मे २०१७ रोजी महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार केली. मनपा आयुक्तांना पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी २ जुलै २०१९ रोजी हे प्रकरण योग्य निर्णयासाठी मनपाच्या सर्वसाधारण मंडळाकडे पाठविले. त्याविरुद्ध किनखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनपा आयुक्तांनी सदर प्रकरण स्वत: वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशाकडे सादर करायला पाहिजे. हे प्रकरण सर्वसाधारण मंडळाकडे पाठविण्याची गरज नाही, असे किनखेडे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर