शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

नगरसेवक निवडणूकपूर्व अवैध बांधकामामुळे अपात्र ठरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 22:26 IST

councilor issue High courtनगरसेवकाला अपात्र ठरविण्यासाठी त्याने निवडणुकीपूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा विचार केला जाऊ शकतो का? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील द्विसदस्यीयपीठाने निर्धारित केला आहे. हा प्रश्न योग्य खुलासा होण्यासाठी तीन सदस्यीय पूर्णपीठाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाने निश्चित केला प्रश्न, पूर्णपीठासमक्ष होईल सुनावणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : नगरसेवकाला अपात्र ठरविण्यासाठी त्याने निवडणुकीपूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा विचार केला जाऊ शकतो का? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील द्विसदस्यीयपीठाने निर्धारित केला आहे. हा प्रश्न योग्य खुलासा होण्यासाठी तीन सदस्यीय पूर्णपीठाकडे पाठविण्यात आला आहे.

यासह आणखी दोन प्रश्न पूर्णपीठाकडे पाठविण्यात आले आहेत. एखाद्या नगरसेवकाने निवडून आल्यानंतर किंवा त्यापूर्वी नवीन मालमत्ता संपादित केली असेल आणि त्या मालमत्तेत आधीच अनधिकृत बांधकाम केले गेले असेल, तर त्या अनधिकृत बांधकामाच्या आधारेदेखील नगरसेवकाला अपात्र ठरवले जाऊ शकते का? हा न्यायालयाचा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न महानगरपालिका आयुक्तांच्या अधिकाराशी संबंधित आहे. महानगरपालिका आयुक्त हे नगरसेवकाच्या अपात्रतेचा संदर्भ स्वत: दिवाणी न्यायाधीशाकडे पाठवू शकतात की, त्यांनी संबंधित संदर्भ योग्य निर्णयासाठी मनपा सर्वसाधारण मंडळाकडे सादर करायला पाहिजे, असे या प्रश्नात नमूद करण्यात आले आहे. या मुद्यांविषयी एडविन ब्रिट्टो, मल्लेश शेट्टी यासह विविध प्रकरणातील निर्णयात न्यायालयाने वेगवेगळी भूमिका मांडली आहे. परिणामी, हे तीन प्रश्न योग्य खुलासा होण्यासाठी पूर्णपीठाकडे पाठविण्यात आले आहेत.

या प्रकरणात प्रश्न निश्चित

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी तिलोत्तमा किनखेडे यांच्या याचिकेमध्ये सदर प्रश्न निश्चित केले. वॉर्ड १४-डी मधून प्रगती पाटील यांनी किनखेडे यांना हरवून विजय मिळविला. त्यानंतर किनखेडे यांनी पाटील यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर आक्षेप घेऊन त्यांना अपात्र ठरविण्यासाठी ३ मे २०१७ रोजी महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार केली. मनपा आयुक्तांना पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी २ जुलै २०१९ रोजी हे प्रकरण योग्य निर्णयासाठी मनपाच्या सर्वसाधारण मंडळाकडे पाठविले. त्याविरुद्ध किनखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनपा आयुक्तांनी सदर प्रकरण स्वत: वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशाकडे सादर करायला पाहिजे. हे प्रकरण सर्वसाधारण मंडळाकडे पाठविण्याची गरज नाही, असे किनखेडे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर