शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर घरी, रुग्ण वाऱ्यावर

By admin | Updated: May 9, 2017 01:40 IST

दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रणच राहिलेले नाही.

कामगार रुग्णालय आजारी : वेळेत येण्याच्या नियमालाच ठेंगा सुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रणच राहिलेले नाही. बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ९ वाजताची असताना वरिष्ठ डॉक्टर १० वाजता पूर्वी येत नाही. काही तर ११ वाजेपर्यंत येतात. रुग्ण मात्र लवकर नंबर लागून उपचार मिळतील या आशेवर सकाळी ७.३० वाजेपासून रांगेत लागलेले असतात. विशेष म्हणजे, कर्मचारी, तंत्रज्ञ यांनाही उशिरा येण्याची सवय लागल्याने अख्खे रुग्णालय वाऱ्यावर पडले आहे. ‘लोकमत’ चमूने सोमवारी सकाळी ९ वाजता या रुग्णालयाची पाहणी करीत बाह्यरुग्ण विभागात ‘स्टींग आॅपरेशन’ केले, असता नोंदणी कक्षाची वेळ सकाळी ८.३० वाजताची असताना तब्बल ९.४५ वाजता सुरू झाले. सकाळी १० वाजेपर्यंत डॉक्टरांचे सर्वच कक्ष रिकामे होते. त्यानंतर एक-एक डॉक्टर यायला सुरुवात झाली. कान, नाक, घसा विभागात तर १०.४५ वाजेपर्यंत डॉक्टरांचे आगमन झालेले नव्हते. विशेष म्हणजे, वैद्यकीय अधीक्षकांपासून सर्वांनाच याची माहिती आहे. परंतु वर्षानुवर्षे उशिरा येण्याची परंपरा सुरू असल्याने जणू काही सर्वांना याची सवय लागल्याचे आढळून आले. सव्वा तासानंतर उघडला नोंदणी कक्षविमा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या नोंदणी कक्षाची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० वाजताची आहे. कामगार व त्यांचे नातेवाईक त्या दिवसाची रोजी पडू नये किंवा अर्ध्या दिवसांची तरी रोजी मिळावी म्हणून सकाळी ७.३० वाजतापासून रांगेत लागले होते. सकाळी ९ वाजता ‘लोकमत’ची चमू या कक्षात पोहचल्यावर कक्षातील नोंदणी खिडकी बंद होती. रांगेत पहिल्या क्रमांकावर असलेले हृदयविकाराचे रुग्ण अधिरकुमार गजभिये हे बुटीबोरीवरून उपचारासाठी आले होते. ते सकाळी ७ वाजेपासून रांगेत होते. यावेळी १०० रुग्ण लवकर नोंदणी करून तातडीने उपचार होतील, या आशेने रांगेत उभे होते. तब्बल सव्वा तास उशिराने, ९ वाजून ४५ मिनिटांनी ही खिडकी सुरू झाली. यातच एकच महिला कर्मचारी रुग्णाची नोंदणी करीत असल्याने रुग्ण ताटकळत उभे होते.डॉक्टर राऊंडला गेले आहेत...रुग्णालयाच्या ओपीडीच्या प्रत्येक विभागाला ‘लोकमत’चमूने भेट दिली असता डॉक्टर हजर नव्हते. मात्र, उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या संख्येत प्रत्येक मिनिटाला वाढच होत होती. डॉक्टरांच्या कक्षाबाहेर बसलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, पहिल्यांदा आले आहेत का, तुम्हाला माहीत नाही का, डॉक्टर एवढ्या लवकर येत नाही. ते राऊंडला गेले आहेत’ असे रागवून सांगत, रांगेत उभे रहायला सांगत होते. सफाई कर्मचारीच काढतात रुग्णांचे रक्तविमा रुग्णालयात डॉक्टरच नव्हे तर अटेन्डंट व तंत्रज्ञांच्याही जागा रिक्त असल्याने सफाई कर्मचारी रुग्णांचे रक्त काढून ते तपासणीसाठी पाठवितात. यात रुग्णाच्या जीवावर बेतल्यास जबाबदार कोण हा प्रश्न आहे. रक्त तपासणी विभागात ‘लोकमत’चमू गेली असता निखिल नावाचा सफाई कर्मचारी रुग्णाचे रक्त काढत असल्याचे दिसून आले.ईएनटी विभाग बेभरवशावरकान, नाक, घसा (ईएनटी) विभागाच्या कक्षात १० वाजून ४५ मिनिटे झाली असतानाही संबंधित डॉक्टर पोहचले नव्हते. येथे रुग्णांची लांबचलांब रांग लागलेली होती. यात वयोवृद्ध रुग्णांची संख्या जास्त होती. येथील रुग्णांना डॉक्टर कधी येतील असा प्रश्न केल्यावर त्यांनी ११ वाजताच्या नंतरच येतात, असे उत्तर दिले. ओपीडीत १० वाजले तरी डॉक्टर गैरहजरबाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) डॉक्टरांची येण्याची वेळ सकाळी ९ वाजताची आहे. आज सोमवार असल्याने औषध वैद्यकशास्त्र विभाग (मेडिसीन), शल्यक्रिया विभाग (सर्जरी), बालरोग विभाग, मनोचिकित्सा विभाग व ईएनटी विभागाची ओपीडी होती. परंतु १० वाजेलेतरी डॉक्टर जागेवर नव्हते. रुग्णालयाच्या अस्थिरोग, सर्जरी, छातीरोग विभागाचा वॉर्डाचा दिवस असताना तिथेही संबंधित डॉक्टर पोहचले नव्हते. तर बालरोग विभागाच्या किंवा नेत्ररोग विभागाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झालेली नव्हती. रुग्णालयात केवळ पॅथालॉजिस्ट डॉ. मीनल खरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना चौधरी हे आपल्या कामात व्यस्त असताना दिसून आले.