शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वनविकास अधिकाऱ्यांना कारागृहात पाठवायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:11 IST

वन विकासाकरिता १३४ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या वृक्षारोपणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संतप्त होऊन महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कारागृहात पाठवायचे काय, असा सवाल उपस्थित केला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा संतप्त सवाल : वृक्षारोपणात मोठा आर्थिक गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वन विकासाकरिता १३४ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या वृक्षारोपणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संतप्त होऊन महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कारागृहात पाठवायचे काय, असा सवाल उपस्थित केला.न्यायालयाने यासंदर्भात महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे सेवानिवृत्त लेखा साहायक मधुकर चोपडे यांच्या पत्रावरून जनहित याचिका दाखल केली आहे. १९८८ ते २००३ या काळात खामगाव वनप्रकल्प विभागात रोजगार हमी योजनेंतर्गत झाडे लावण्याची ३६१ कामे करण्यात आलीत. त्यासाठी बुलडाणा येथील उपवनसंरक्षकांनी १३४ कोटी रुपये दिले. या रकमेत किती झाडे लावण्यात आली, लावलेल्या झाडांची जातनिहाय संख्या, लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जिवंत आहेत, जिवंत झाडांची जातनिहाय संख्या, जिवंत झाडापासून शासनास किती रुपये महसूल प्राप्त झाला याची माहिती चोपडे यांनी मागितली होती. परंतु, त्यांना माहिती देण्यात आली नाही. गैरव्यवहार उघडकीस येऊ नये यासाठी यासंदर्भात खरी माहिती लपविण्यात येत असल्याचे चोपडे यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने आता या प्रकरणावर १८ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली असून त्यावेळी यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश महामंडळाला दिला. न्यायालय मित्र अ‍ॅड. रोहित मासुरकर यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयforest departmentवनविभाग