शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

पुष्पहार नको, आणा पेन आणि वही

By admin | Updated: October 3, 2016 02:59 IST

शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे ही बाब ओळखून डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे.

अनुयायांना आवाहन : डॉ. आंबेडकर स्टुडंट्स फेडरेशनचा पुढाकार नागपूर : शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे ही बाब ओळखून डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. शैक्षणिक उपक्रम राबवूनच बाबासाहेबांना खरी आदरांजली देता येईल. यासाठी येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर येताना पुष्पहार, फूल आणण्यापेक्षा अनुयायांनी एक वही व पेन घेऊन यावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनने केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांना विज्ञाननिष्ठ बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली होती आणि एका नवीन संस्कृती व नवीन युगाची सुरुवात करून दिली. या ऐतिहासिक क्रांतीची आठवण म्हणून दरवर्षी लाखो अनुयायी प्रेरणादायी दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी विजयादशमीला नागपूरला येतात. हा जनसागर पुष्प व पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब व बुद्धाला अभिवादन करतो. या समाजाने पुस्तकांचे महत्त्व जाणले आहे. त्यामुळे येथे येणारे लोक एक तरी पुस्तक घेऊन घरी जातात. जाताना पुस्तक घेऊन जातो त्याच पद्धतीने येतानाही शिक्षणाला मदत होईल असे साहित्य आणणे अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे यावर्षी दीक्षाभूमीवर येताना सोबत एक वही आणि एक पेन आणावा व तो दान करावा असे आवाहन फेडरेशनचे सिद्धांत यांनी केले आहे. आपल्या देशात आजही गरिबीमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. आंबेडकरी अनुयायांनी पेन आणि वही दान केली तर अशा गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून सहकार्य करता येईल. या एका वही आणि पेनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे सिद्धांत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)