शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुष्पहार नको, आणा पेन आणि वही

By admin | Updated: October 3, 2016 02:59 IST

शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे ही बाब ओळखून डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे.

अनुयायांना आवाहन : डॉ. आंबेडकर स्टुडंट्स फेडरेशनचा पुढाकार नागपूर : शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे ही बाब ओळखून डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. शैक्षणिक उपक्रम राबवूनच बाबासाहेबांना खरी आदरांजली देता येईल. यासाठी येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर येताना पुष्पहार, फूल आणण्यापेक्षा अनुयायांनी एक वही व पेन घेऊन यावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनने केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांना विज्ञाननिष्ठ बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली होती आणि एका नवीन संस्कृती व नवीन युगाची सुरुवात करून दिली. या ऐतिहासिक क्रांतीची आठवण म्हणून दरवर्षी लाखो अनुयायी प्रेरणादायी दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी विजयादशमीला नागपूरला येतात. हा जनसागर पुष्प व पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब व बुद्धाला अभिवादन करतो. या समाजाने पुस्तकांचे महत्त्व जाणले आहे. त्यामुळे येथे येणारे लोक एक तरी पुस्तक घेऊन घरी जातात. जाताना पुस्तक घेऊन जातो त्याच पद्धतीने येतानाही शिक्षणाला मदत होईल असे साहित्य आणणे अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे यावर्षी दीक्षाभूमीवर येताना सोबत एक वही आणि एक पेन आणावा व तो दान करावा असे आवाहन फेडरेशनचे सिद्धांत यांनी केले आहे. आपल्या देशात आजही गरिबीमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. आंबेडकरी अनुयायांनी पेन आणि वही दान केली तर अशा गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून सहकार्य करता येईल. या एका वही आणि पेनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे सिद्धांत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)