शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

न्यायालयाची वाट पाहू नका, कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 05:45 IST

नागपुरात झालेल्या हुंकार सभेत मोहन भागवत यांची मागणी

नागपूर : कोणताही देश हा केवळ कायद्यावर नव्हे तर जनतेच्या भावनांवरही चालतो. सध्या राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयासाठी प्राधान्यक्रम नसल्याचे दिसत आहे. न्यायालयाकडून याबाबतचा निर्णय सातत्याने पुढे ढकलला जात असून न्याय देण्यात विलंब होत आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, संसदेत कायदा करावा व अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली.

रविवारी विश्व हिंदू परिषदेतर्फे ‘हुंकार सभा’ झाली. सभेत वासुदेवानंद सरस्वती शंकराचार्य, साध्वी ऋतंभरा, नाथपीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार आदींनी राम मंदिर उभारणीची एकमुखी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय देण्यात दिरंगाई होत असल्याचे सांगत न्यायालयाच्या भूमिकेवर नाराजीही व्यक्त केली.

मोहन भागवत म्हणाले, अयोध्येत राम मंदिर नाही हे पाहून मनाला वेदना होतात. राम मंदिराबाबत हिंदू समाजाची बाजू सत्य आणि न्यायाची आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी टाळून सत्य टाळले जात आहे. न्याय उशिरा मिळणे म्हणजेच तो एकप्रकारे नाकारणेच होय, अशी नाराजी व्यक्त करीत मंदिर बनले तर सर्व वाद मिटतील, असा दावाही त्यांनी केला. पेच कायदेशीर मार्गाने सुटेल, यासाठी बराच धीर धरला. आता मात्र, राममंदिर आंदोलनालचा हा निर्णायक टप्पा आहे. आता धैर्याचे काम नाही. जनआंदोलनाची गरज आहे. त्यासाठी जनतेत जाऊन जनजागरण करा. कायद्याची मागणी करा. मंदिराचे काम सुरू झाल्यावरच थांबा. राजकारणाचा विचार करू नका. सरकारवर दबाव निर्माण करा. सरकार झुकेल, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMohan Bhagwatमोहन भागवत