शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

न्यायालयाची वाट पाहू नका, कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 05:45 IST

नागपुरात झालेल्या हुंकार सभेत मोहन भागवत यांची मागणी

नागपूर : कोणताही देश हा केवळ कायद्यावर नव्हे तर जनतेच्या भावनांवरही चालतो. सध्या राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयासाठी प्राधान्यक्रम नसल्याचे दिसत आहे. न्यायालयाकडून याबाबतचा निर्णय सातत्याने पुढे ढकलला जात असून न्याय देण्यात विलंब होत आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, संसदेत कायदा करावा व अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली.

रविवारी विश्व हिंदू परिषदेतर्फे ‘हुंकार सभा’ झाली. सभेत वासुदेवानंद सरस्वती शंकराचार्य, साध्वी ऋतंभरा, नाथपीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार आदींनी राम मंदिर उभारणीची एकमुखी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय देण्यात दिरंगाई होत असल्याचे सांगत न्यायालयाच्या भूमिकेवर नाराजीही व्यक्त केली.

मोहन भागवत म्हणाले, अयोध्येत राम मंदिर नाही हे पाहून मनाला वेदना होतात. राम मंदिराबाबत हिंदू समाजाची बाजू सत्य आणि न्यायाची आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी टाळून सत्य टाळले जात आहे. न्याय उशिरा मिळणे म्हणजेच तो एकप्रकारे नाकारणेच होय, अशी नाराजी व्यक्त करीत मंदिर बनले तर सर्व वाद मिटतील, असा दावाही त्यांनी केला. पेच कायदेशीर मार्गाने सुटेल, यासाठी बराच धीर धरला. आता मात्र, राममंदिर आंदोलनालचा हा निर्णायक टप्पा आहे. आता धैर्याचे काम नाही. जनआंदोलनाची गरज आहे. त्यासाठी जनतेत जाऊन जनजागरण करा. कायद्याची मागणी करा. मंदिराचे काम सुरू झाल्यावरच थांबा. राजकारणाचा विचार करू नका. सरकारवर दबाव निर्माण करा. सरकार झुकेल, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMohan Bhagwatमोहन भागवत