शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

सत्ताधाऱ्यांची विचारधारा न मानणारे देशद्रोही का?

By admin | Updated: March 4, 2016 03:06 IST

देशातील विद्यमान सरकार ज्या विचारधारेवर चालत आहे ती विचारधारा मानणारे देशवासीच फक्त राष्ट्रभक्त तर ही विचारधारा न मानणारे देशद्रोही आहे ...

हरिभाऊ केदार : स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची निदर्शने नागपूर : देशातील विद्यमान सरकार ज्या विचारधारेवर चालत आहे ती विचारधारा मानणारे देशवासीच फक्त राष्ट्रभक्त तर ही विचारधारा न मानणारे देशद्रोही आहे का, असा सवाल नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु हरिभाऊ केदार यांनी गुरुवारी केला. केंद्र सरकारची दडपशाही व जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया यांना राष्ट्रद्रोहाच्या कथित आरोपाखाली अटक केल्याच्या निषेधात नागपुरातील शहीद चौकात गुरुवारी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक व गांधी विचारांना समर्पित विचारवंतांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून तीन तास धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या मूक धरणे आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कन्हैया सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधी विचारधारेचा असल्यानेच त्यांच्या विरोधात कथित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यााचा निषेध करण्यासाठी तीन दिवस मूक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आंदोलनात ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक व सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे, दत्तात्रय बर्गी, नारायणराव चांदूरकर, यादवराव देवगडे, हरिभाऊ केदार, मा.म. गडकरी, उमेश चौबे, माजीमंत्री हरिभाऊ नाईक, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री नितीन राऊ त, डॉ. चित्रा तूर, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रतिनाथ मिश्रा, काँग्रेस सेवादलाचे केशवराव शेंडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, रामगोविंद खोब्रागडे, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, नीरज चौबे, राजू व्यास, युवक काँग्रेसचे शहर अधयक्ष बंटी शेळके, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, रत्नमाला फोफरे, ममता गेडाम, प्रभाकर खापरे, कमलेश समर्थ, धनश्याम पनपालिया, अनिल पांडे, दीपक वानखेडे, विशाल लारोकार, विनोद उलीपवार, माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, आकाश तायवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)