शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भूमाफियांना पाठीशी घालू नका

By admin | Updated: May 11, 2017 02:49 IST

जमिनीच्या वादासंबंधीच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या. कारवाईच्या संबंधाने अडचण होत असेल

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका : पोलीस ठाण्यांना सूचनावजा इशारा नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जमिनीच्या वादासंबंधीच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या. कारवाईच्या संबंधाने अडचण होत असेल तर संबंधित वरिष्ठ आणि तज्ज्ञांची मदत घ्या. मात्र, कारवाई करण्यास टाळाटाळ करून भूमाफियांना मदत होईल, अशी भूमिका घेऊ नका, असा खणखणीत सूचनावजा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शहरातील पोलिसांना देण्यात आला आहे. या भूमिकेमुळे भूमाफिया ग्वालबन्सीचे साम्राज्य उद्ध्वस्त करतानाच पोलिसांनी आता उपराजधानीतील अन्य भागातील भूमाफियांवरही नजर रोखल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भूमाफियांसोबतच त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांमध्येही खळबळ निर्माण झाली आहे. स्वप्नातील घर निर्माण करण्यासाठी अनेकांचे आयुष्य खर्ची पडते. आयुष्यभर राबराब राबल्यानंतर त्यातील मिळकतीतून अनेकजण भूखंड विकत घेतात. भविष्यात आर्थिक जुळवाजुळव झाल्यानंतर त्यावर घर बांधू, असे स्वप्न रंगवून भूखंड मालक पुढच्या जुळवाजुळवीचे प्रयत्न करतात. मात्र, त्यावर ग्वालबन्सीसारखे भूमाफिया आपल्या गुंडांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून रातोरात कब्जा करतात. तेथे कुंपण टाकून आपला मालकी हक्क दाखवणारा फलकही लावतात. कधीतरी एखादवेळी भूखंडाकडे चक्कर टाकायला आलेल्या भूखंड मालकाला ते पाहून जबर मानसिक धक्का बसतो. तो आधी त्या फलकावर लिहिलेल्या नावाच्या व्यक्तीशी संपर्क करतो. त्याच्याकडून अपमान आणि मनस्ताप मिळाल्यानंतर संबंधित भागातील पोलीस ठाण्यात जातो. मात्र, पोलीस अशा प्रकरणापैकी ९० टक्के प्रकरणात पीडित व्यक्तीकडून अतिक्रमण करणाऱ्याचे नाव, पत्ता विचारल्यानंतर त्याच्याशी संपर्क करतात अन् नंतर तक्रार घेऊन येणाऱ्यांना टरकावून लावतात. त्याच्या हाती एनसी (अदखलपात्र) पावती देऊन ‘हे प्रकरण आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. तुम्ही कोर्टात जा’ असा सल्ला देऊन पीडित व्यक्तीची बोळवण करतात. काही प्रकरणात कब्जा करणाऱ्याला (भूमाफियाला) बोलवून ‘समेट’ करण्याच्या नावाखाली पीडित व्यक्तीची मानसिक आणि आर्थिक कोंडी करण्याचेही प्रयत्न होतात. अशी हजारो प्रकरणे शहरात झाली असून, या प्रकरणातून ग्वालबन्सीसारखे अनेक भूमाफिया शहरात तयार झाले आहेत. या भूमाफियांमुळे अनेक जण अक्षरश: उद्ध्वस्त झाले असून, अनेकांनी जीवही दिले आहेत. ग्वालबन्सी प्रकरणातून त्याची प्रचितीही आली आहे.