शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भूमाफियांना पाठीशी घालू नका

By admin | Updated: May 11, 2017 02:49 IST

जमिनीच्या वादासंबंधीच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या. कारवाईच्या संबंधाने अडचण होत असेल

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका : पोलीस ठाण्यांना सूचनावजा इशारा नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जमिनीच्या वादासंबंधीच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या. कारवाईच्या संबंधाने अडचण होत असेल तर संबंधित वरिष्ठ आणि तज्ज्ञांची मदत घ्या. मात्र, कारवाई करण्यास टाळाटाळ करून भूमाफियांना मदत होईल, अशी भूमिका घेऊ नका, असा खणखणीत सूचनावजा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शहरातील पोलिसांना देण्यात आला आहे. या भूमिकेमुळे भूमाफिया ग्वालबन्सीचे साम्राज्य उद्ध्वस्त करतानाच पोलिसांनी आता उपराजधानीतील अन्य भागातील भूमाफियांवरही नजर रोखल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भूमाफियांसोबतच त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांमध्येही खळबळ निर्माण झाली आहे. स्वप्नातील घर निर्माण करण्यासाठी अनेकांचे आयुष्य खर्ची पडते. आयुष्यभर राबराब राबल्यानंतर त्यातील मिळकतीतून अनेकजण भूखंड विकत घेतात. भविष्यात आर्थिक जुळवाजुळव झाल्यानंतर त्यावर घर बांधू, असे स्वप्न रंगवून भूखंड मालक पुढच्या जुळवाजुळवीचे प्रयत्न करतात. मात्र, त्यावर ग्वालबन्सीसारखे भूमाफिया आपल्या गुंडांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून रातोरात कब्जा करतात. तेथे कुंपण टाकून आपला मालकी हक्क दाखवणारा फलकही लावतात. कधीतरी एखादवेळी भूखंडाकडे चक्कर टाकायला आलेल्या भूखंड मालकाला ते पाहून जबर मानसिक धक्का बसतो. तो आधी त्या फलकावर लिहिलेल्या नावाच्या व्यक्तीशी संपर्क करतो. त्याच्याकडून अपमान आणि मनस्ताप मिळाल्यानंतर संबंधित भागातील पोलीस ठाण्यात जातो. मात्र, पोलीस अशा प्रकरणापैकी ९० टक्के प्रकरणात पीडित व्यक्तीकडून अतिक्रमण करणाऱ्याचे नाव, पत्ता विचारल्यानंतर त्याच्याशी संपर्क करतात अन् नंतर तक्रार घेऊन येणाऱ्यांना टरकावून लावतात. त्याच्या हाती एनसी (अदखलपात्र) पावती देऊन ‘हे प्रकरण आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. तुम्ही कोर्टात जा’ असा सल्ला देऊन पीडित व्यक्तीची बोळवण करतात. काही प्रकरणात कब्जा करणाऱ्याला (भूमाफियाला) बोलवून ‘समेट’ करण्याच्या नावाखाली पीडित व्यक्तीची मानसिक आणि आर्थिक कोंडी करण्याचेही प्रयत्न होतात. अशी हजारो प्रकरणे शहरात झाली असून, या प्रकरणातून ग्वालबन्सीसारखे अनेक भूमाफिया शहरात तयार झाले आहेत. या भूमाफियांमुळे अनेक जण अक्षरश: उद्ध्वस्त झाले असून, अनेकांनी जीवही दिले आहेत. ग्वालबन्सी प्रकरणातून त्याची प्रचितीही आली आहे.