शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

म्हणू नका आसवांत, स्वप्न माझे वाहून गेले!

By admin | Updated: June 19, 2014 01:02 IST

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू होता. शासनाची कामेही मोठ्या प्रमाणात होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याच्या पंपाचे काम सुरू असताना अचानक वरून मशीन पडली.

विपरीत स्थितीत मुलगा प्रतीक रिंढेने मिळविले यश नागपूर : इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू होता. शासनाची कामेही मोठ्या प्रमाणात होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याच्या पंपाचे काम सुरू असताना अचानक वरून मशीन पडली. पाय चिरत खाली आपटली. ती मशीन ३५० किलो वजनाची होती. फ्रॅक्चर झाले नाही पण पायाचे मांस गुडघ्यापासून कापले गेले. त्वरित मेडिकलमध्ये उपचारही झाले अन् टाके टाकण्यात आले. दुसऱ्या दिवशी मात्र पायात वेदनांनी काहूर मांडले, सारे अंगच वेदनांनी ठणकले. खाजगी रुग्णालयात गेल्यावर पायात गँगरीन होऊन ते शरीरात पसरत असल्याचे निष्पन्न झाले. जीव वाचवा किंवा पाय, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. जीव वाचविण्यासाठी पाय कापावा लागला. पण या परिस्थितीतही मुलगा प्रतीकने मात्र ९७.६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. त्याचे समाधान वाटते, असे अनिल रिंढे यांनी भावपूर्णतेने सांगितले. म्हणू नका आसवांत...स्वप्न माझे वाहून गेले। उदास पाण्यात सोडलेले ते दीपदान होते।। अशा भटांच्या ओळी आहे. त्याप्रमाणेच आयुष्यभराची एक वेदना मिळाल्यावर मुलाच्या यशाने अनिल आपले दु:ख विसरून गेले. प्रतीक अनिल रिंढे यांने दहावीच्या परीक्षेत हे यश मिळविले. प्रतीक म्हणाला, माझे प्रॅक्टीकल आणि परीक्षेच्या दिवसातच बाबांचा अपघात झाला. बाबा त्या काळात रुग्णालयात भरती होते पण मला घरच्यांनी त्यांना भेटूच दिले नाही. तू अभ्यासाकडेच लक्ष दे, असे सांगण्यात आले. त्यामुळे मी अभ्यासावरच लक्ष केंद्रित केले होते. काळजी करण्यासारखे नाही, बाबा लवकर घरी येतील, असेही आई म्हणाली. त्यामुळे काय झाले त्याची कल्पना मला आली नाही. बाबांशी फोनवर बोलणे व्हायचे, तेवढेच. बाबांना सुटी झाल्यावर ते घरी आले. पण तब्बल तीन दिवस मला कुणीच काही कळू दिले नाही. त्यानंतर रात्री अभ्यास झाल्यावर रात्री २ वाजता मला बाबांनी बोलाविले. माझ्या परीक्षेच्या दरम्यान मला बाबांचा पाय कापला गेला, हे कळले तर परीक्षेत व्यत्यय येऊ शकतो, याची जाण ठेवून मला बाबांनी रात्री २ वाजता अपघातात पाय कापावा लागल्याचे सांगितले अन् माझ्या पायाखालची वाळू सरकली. हा माझ्यासाठी अनपेक्षित दु:खद धक्का होता. बाबांनी मला जवळ घेतले आणि दोघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले. मी प्रचंड अस्वस्थ झालो. काय करावे तेच कळले नाही. पण बाबांनीच मला छातीशी कवटाळून धीर दिला. अभ्यासात लक्ष दे आणि माझा विचारही करू नको, असे सांगितले. हे फार कठीण होते पण परीक्षा तोंडावर होती. या भावनिक, मानसिक अवस्थेत अभ्यासात मनच लागत नव्हते पण अभ्यास केला. माझे यश पाहिल्यावर बाबांना समाधान वाटते, याचा मला आनंद आहे. प्रतीक पं. बच्छराज व्यास विद्यालयाचा विद्यार्थी आहे. यानंतर मला स्पेस सायन्समध्ये अभियंता व्हायचे आहे, असेही प्रतीकने सांगितले. (प्रतिनिधी)