शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

विश्वास गमावलेल्या सरकारची देणी देऊ नका, शरद पवार यांचे शेतक-यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 06:01 IST

बळीराजा संकटात असताना सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतमलाला किंमत दिली नाही, त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या या सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारून, यापुढे सरकारची कुठलीही देणी देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

नागपूर : बळीराजा संकटात असताना सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतमलाला किंमत दिली नाही, त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या या सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारून, यापुढे सरकारची कुठलीही देणी देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दमदाटी करून, तुरुंगात टाकून आवाज दाबाल, तर तुम्हाला उखडून फेकण्याची ताकद बळीराजात आहे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), समाजवादी पक्ष, माकप यांनी मंगळवारी राज्य सरकारविरोधात हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या जन आक्रोश व हल्लाबोल मोर्चाने उपराजधानी दणाणून गेली. खा. पवार यांनी भाजपावर हल्ला चढविला. संधी मिळेल, तेव्हा ते उलथून फेकायचे आहे. परिवर्तन होईपर्यंत हल्लाबोल थांबवायचा नाही, असे सांगण्यासही ते विसरले नाही.ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी खा. विजय दर्डा, खा. सुप्रिया सुळे आदी मोर्चाला उपस्थित होते.आरोप करताना लाज वाटायला हवी होतीपाकिस्तानच्या मदतीने गुजरातच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असून, दिल्लीत पाकिस्तानच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही उपस्थित होते, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाचा पवारांनी जोरदार समाचार घेतला.ते म्हणाले, मनमोहन यांच्यासारख्या देशभक्त आणि प्रामाणिक नेत्याचा पाकिस्तानशी संबंध जोडताना भाजपाला लाज वाटली पाहिजे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या मनात असले घाणेरडे विचार कसे येऊ शकतात? देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बाहेरील ताकदीला स्थान न देण्याची देशाची परंपरा मोडण्याचा प्रयत्न स्वत: पंतप्रधानांकडून होत आहे, याचे दु:ख वाटते, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnagpurनागपूर