शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

विश्वास गमावलेल्या सरकारची देणी देऊ नका, शरद पवार यांचे शेतक-यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 06:01 IST

बळीराजा संकटात असताना सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतमलाला किंमत दिली नाही, त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या या सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारून, यापुढे सरकारची कुठलीही देणी देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

नागपूर : बळीराजा संकटात असताना सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतमलाला किंमत दिली नाही, त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या या सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारून, यापुढे सरकारची कुठलीही देणी देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दमदाटी करून, तुरुंगात टाकून आवाज दाबाल, तर तुम्हाला उखडून फेकण्याची ताकद बळीराजात आहे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), समाजवादी पक्ष, माकप यांनी मंगळवारी राज्य सरकारविरोधात हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या जन आक्रोश व हल्लाबोल मोर्चाने उपराजधानी दणाणून गेली. खा. पवार यांनी भाजपावर हल्ला चढविला. संधी मिळेल, तेव्हा ते उलथून फेकायचे आहे. परिवर्तन होईपर्यंत हल्लाबोल थांबवायचा नाही, असे सांगण्यासही ते विसरले नाही.ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी खा. विजय दर्डा, खा. सुप्रिया सुळे आदी मोर्चाला उपस्थित होते.आरोप करताना लाज वाटायला हवी होतीपाकिस्तानच्या मदतीने गुजरातच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असून, दिल्लीत पाकिस्तानच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही उपस्थित होते, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाचा पवारांनी जोरदार समाचार घेतला.ते म्हणाले, मनमोहन यांच्यासारख्या देशभक्त आणि प्रामाणिक नेत्याचा पाकिस्तानशी संबंध जोडताना भाजपाला लाज वाटली पाहिजे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या मनात असले घाणेरडे विचार कसे येऊ शकतात? देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बाहेरील ताकदीला स्थान न देण्याची देशाची परंपरा मोडण्याचा प्रयत्न स्वत: पंतप्रधानांकडून होत आहे, याचे दु:ख वाटते, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnagpurनागपूर