शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

प्रत्येक तापावर अ‍ॅन्टीबायोटिकची गरज नाही: डॉ. उदय बोधनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:54 IST

अ‍ॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषध हे मानवी संशोधनातील सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. परंतु वैद्यकीय सेवा प्रदान करताना काही डॉक्टर्स प्रतिजैविकांचा सर्रास वापर करतात. विशेषत: प्रत्येक तापावर प्रतिजैविक देतात. भविष्यात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे प्रत्येक तापावर प्रतिजैविकांची आवश्यकता नाही, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व परिषदेचे आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘पेडिकॉन’ परिषदेत डॉ. शांतिलाल सेठ व्याख्यान

आॅनलाईन लोकमतनागपूर : अ‍ॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषध हे मानवी संशोधनातील सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. परंतु वैद्यकीय सेवा प्रदान करताना काही डॉक्टर्स प्रतिजैविकांचा सर्रास वापर करतात. विशेषत: प्रत्येक तापावर प्रतिजैविक देतात. भविष्यात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे प्रत्येक तापावर प्रतिजैविकांची आवश्यकता नाही, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व परिषदेचे आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर यांनी येथे व्यक्त केले.‘पेडिकॉन-२०१८’ परिषदेत आयोजित सर्जन कमांडर डॉ. शांतिलाल शेठ यांच्या स्मृती व्याख्यानात ‘इव्हिडेन्स बेसड् पेडियाट्रिक प्रॅक्टिस’ या विषयावर डॉ. बोधनकर बोलत होते. डॉक्टरांनी प्रतिजैविक औषधे सांभाळून वापरताना रोगाचे निदान झाल्यावरच त्यांचा वापर करावा, असे सांगत डॉ. बोधनकर म्हणाले, आजारपणात सुरु वातीच्या काही दिवसात प्रतिजैविकांची गरज नसते. जीवाला धोका संभवल्यास डॉक्टरांनी अभ्यासानुसार त्याचा वापर करावा. यासाठी डॉक्टरांनी नेहमीच स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवावे. जोपर्यंत आपल्याला रोगाचे कारण मिळत नाही. तोपर्यंत कुठलेही प्रतिजैविक वापरू नये असा हितोपदेशही त्यांनी दिला. यावेळी ‘सीआयपीए’चे अध्यक्ष डॉ. संतोष सोअन्स, सचिव डॉ. रमेश कुमार उपस्थित होते. क्रोधावर जागृती महत्त्वाची : डॉ. स्वाती भावेआपण आक्र मक आणि दादागिरी करणाऱ्या मुलांना रागवतो. त्याच्या दादागिरीला बळी पडलेल्या मुलांप्रति सहानुभूती दाखिवतो. त्याचा परिणाम असा की, तो मुलगा आणखी मुलांवर दादागिरी करतो. अशा परिस्थितीमध्ये केवळ बळी पडलेल्या विद्यार्थ्यासोबतच दादागिरी करणाऱ्या मुलालादेखील समजून घेणे आवश्यक आहे. त्याचेही समुपदेशन व्हायला हवे, असे मत ‘एएसीसीआय’च्या कार्यकारी संचालक डॉ. स्वाती भावे यांनी व्यक्त केले. क्र ोध व्यवस्थापन या विषयावर त्या बोलत होत्या.चिडका आहे, असे कौतुकानेही बोलू नकाभीती आणि राग या दोन मूलभूत भावना आहेत. पालकही घरामध्ये आमचा मुलगा फार चिडका आहे, असे कौतुकाने बोलतात. पालकांनी हे बोलणे आवर्जून टाळले पाहिजे, असा संदेश यावेळी डॉ. स्वाती भावे यांनी पालकांना दिला.क्रोध अनेक आजाराची जननीक्रोध हा रक्तदाब ते अनेक दुर्धर रोगांपर्यंत अनेक आजारांची जननी आहे. त्या अनुषंगाने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना राग व्यवस्थापनाचे धडे मिळायला हवेत. सिनेमा, प्रसारमाध्यमे या रागाला खतपाणी घालण्याचे काम करतात. घरचे व शाळेचे वातावरणदेखील कारणीभूत ठरते, असेही डॉ. भावे म्हणाल्या.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर