शहरं
Join us  
Trending Stories
1
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
2
अमेरिका-चीनशी स्पर्धा; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, PM मोदींचा मोठा निर्णय...
3
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
4
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
5
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
6
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
7
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
8
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
9
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
10
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
11
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
12
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
13
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
14
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
15
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
16
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
17
Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
18
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
19
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
20
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

प्रत्येक तापावर अ‍ॅन्टीबायोटिकची गरज नाही: डॉ. उदय बोधनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:54 IST

अ‍ॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषध हे मानवी संशोधनातील सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. परंतु वैद्यकीय सेवा प्रदान करताना काही डॉक्टर्स प्रतिजैविकांचा सर्रास वापर करतात. विशेषत: प्रत्येक तापावर प्रतिजैविक देतात. भविष्यात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे प्रत्येक तापावर प्रतिजैविकांची आवश्यकता नाही, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व परिषदेचे आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘पेडिकॉन’ परिषदेत डॉ. शांतिलाल सेठ व्याख्यान

आॅनलाईन लोकमतनागपूर : अ‍ॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषध हे मानवी संशोधनातील सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. परंतु वैद्यकीय सेवा प्रदान करताना काही डॉक्टर्स प्रतिजैविकांचा सर्रास वापर करतात. विशेषत: प्रत्येक तापावर प्रतिजैविक देतात. भविष्यात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे प्रत्येक तापावर प्रतिजैविकांची आवश्यकता नाही, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व परिषदेचे आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर यांनी येथे व्यक्त केले.‘पेडिकॉन-२०१८’ परिषदेत आयोजित सर्जन कमांडर डॉ. शांतिलाल शेठ यांच्या स्मृती व्याख्यानात ‘इव्हिडेन्स बेसड् पेडियाट्रिक प्रॅक्टिस’ या विषयावर डॉ. बोधनकर बोलत होते. डॉक्टरांनी प्रतिजैविक औषधे सांभाळून वापरताना रोगाचे निदान झाल्यावरच त्यांचा वापर करावा, असे सांगत डॉ. बोधनकर म्हणाले, आजारपणात सुरु वातीच्या काही दिवसात प्रतिजैविकांची गरज नसते. जीवाला धोका संभवल्यास डॉक्टरांनी अभ्यासानुसार त्याचा वापर करावा. यासाठी डॉक्टरांनी नेहमीच स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवावे. जोपर्यंत आपल्याला रोगाचे कारण मिळत नाही. तोपर्यंत कुठलेही प्रतिजैविक वापरू नये असा हितोपदेशही त्यांनी दिला. यावेळी ‘सीआयपीए’चे अध्यक्ष डॉ. संतोष सोअन्स, सचिव डॉ. रमेश कुमार उपस्थित होते. क्रोधावर जागृती महत्त्वाची : डॉ. स्वाती भावेआपण आक्र मक आणि दादागिरी करणाऱ्या मुलांना रागवतो. त्याच्या दादागिरीला बळी पडलेल्या मुलांप्रति सहानुभूती दाखिवतो. त्याचा परिणाम असा की, तो मुलगा आणखी मुलांवर दादागिरी करतो. अशा परिस्थितीमध्ये केवळ बळी पडलेल्या विद्यार्थ्यासोबतच दादागिरी करणाऱ्या मुलालादेखील समजून घेणे आवश्यक आहे. त्याचेही समुपदेशन व्हायला हवे, असे मत ‘एएसीसीआय’च्या कार्यकारी संचालक डॉ. स्वाती भावे यांनी व्यक्त केले. क्र ोध व्यवस्थापन या विषयावर त्या बोलत होत्या.चिडका आहे, असे कौतुकानेही बोलू नकाभीती आणि राग या दोन मूलभूत भावना आहेत. पालकही घरामध्ये आमचा मुलगा फार चिडका आहे, असे कौतुकाने बोलतात. पालकांनी हे बोलणे आवर्जून टाळले पाहिजे, असा संदेश यावेळी डॉ. स्वाती भावे यांनी पालकांना दिला.क्रोध अनेक आजाराची जननीक्रोध हा रक्तदाब ते अनेक दुर्धर रोगांपर्यंत अनेक आजारांची जननी आहे. त्या अनुषंगाने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना राग व्यवस्थापनाचे धडे मिळायला हवेत. सिनेमा, प्रसारमाध्यमे या रागाला खतपाणी घालण्याचे काम करतात. घरचे व शाळेचे वातावरणदेखील कारणीभूत ठरते, असेही डॉ. भावे म्हणाल्या.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर