शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

प्रत्येक तापावर अ‍ॅन्टीबायोटिकची गरज नाही: डॉ. उदय बोधनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:54 IST

अ‍ॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषध हे मानवी संशोधनातील सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. परंतु वैद्यकीय सेवा प्रदान करताना काही डॉक्टर्स प्रतिजैविकांचा सर्रास वापर करतात. विशेषत: प्रत्येक तापावर प्रतिजैविक देतात. भविष्यात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे प्रत्येक तापावर प्रतिजैविकांची आवश्यकता नाही, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व परिषदेचे आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘पेडिकॉन’ परिषदेत डॉ. शांतिलाल सेठ व्याख्यान

आॅनलाईन लोकमतनागपूर : अ‍ॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषध हे मानवी संशोधनातील सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. परंतु वैद्यकीय सेवा प्रदान करताना काही डॉक्टर्स प्रतिजैविकांचा सर्रास वापर करतात. विशेषत: प्रत्येक तापावर प्रतिजैविक देतात. भविष्यात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे प्रत्येक तापावर प्रतिजैविकांची आवश्यकता नाही, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व परिषदेचे आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर यांनी येथे व्यक्त केले.‘पेडिकॉन-२०१८’ परिषदेत आयोजित सर्जन कमांडर डॉ. शांतिलाल शेठ यांच्या स्मृती व्याख्यानात ‘इव्हिडेन्स बेसड् पेडियाट्रिक प्रॅक्टिस’ या विषयावर डॉ. बोधनकर बोलत होते. डॉक्टरांनी प्रतिजैविक औषधे सांभाळून वापरताना रोगाचे निदान झाल्यावरच त्यांचा वापर करावा, असे सांगत डॉ. बोधनकर म्हणाले, आजारपणात सुरु वातीच्या काही दिवसात प्रतिजैविकांची गरज नसते. जीवाला धोका संभवल्यास डॉक्टरांनी अभ्यासानुसार त्याचा वापर करावा. यासाठी डॉक्टरांनी नेहमीच स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवावे. जोपर्यंत आपल्याला रोगाचे कारण मिळत नाही. तोपर्यंत कुठलेही प्रतिजैविक वापरू नये असा हितोपदेशही त्यांनी दिला. यावेळी ‘सीआयपीए’चे अध्यक्ष डॉ. संतोष सोअन्स, सचिव डॉ. रमेश कुमार उपस्थित होते. क्रोधावर जागृती महत्त्वाची : डॉ. स्वाती भावेआपण आक्र मक आणि दादागिरी करणाऱ्या मुलांना रागवतो. त्याच्या दादागिरीला बळी पडलेल्या मुलांप्रति सहानुभूती दाखिवतो. त्याचा परिणाम असा की, तो मुलगा आणखी मुलांवर दादागिरी करतो. अशा परिस्थितीमध्ये केवळ बळी पडलेल्या विद्यार्थ्यासोबतच दादागिरी करणाऱ्या मुलालादेखील समजून घेणे आवश्यक आहे. त्याचेही समुपदेशन व्हायला हवे, असे मत ‘एएसीसीआय’च्या कार्यकारी संचालक डॉ. स्वाती भावे यांनी व्यक्त केले. क्र ोध व्यवस्थापन या विषयावर त्या बोलत होत्या.चिडका आहे, असे कौतुकानेही बोलू नकाभीती आणि राग या दोन मूलभूत भावना आहेत. पालकही घरामध्ये आमचा मुलगा फार चिडका आहे, असे कौतुकाने बोलतात. पालकांनी हे बोलणे आवर्जून टाळले पाहिजे, असा संदेश यावेळी डॉ. स्वाती भावे यांनी पालकांना दिला.क्रोध अनेक आजाराची जननीक्रोध हा रक्तदाब ते अनेक दुर्धर रोगांपर्यंत अनेक आजारांची जननी आहे. त्या अनुषंगाने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना राग व्यवस्थापनाचे धडे मिळायला हवेत. सिनेमा, प्रसारमाध्यमे या रागाला खतपाणी घालण्याचे काम करतात. घरचे व शाळेचे वातावरणदेखील कारणीभूत ठरते, असेही डॉ. भावे म्हणाल्या.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर