शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

राष्ट्रपित्याचे पूर्ण नावही माहीत नाही!

By admin | Updated: October 2, 2015 07:16 IST

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी नावाचे एक सोनेरी पान आहे. आपल्या लढ्याला

नागपूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी नावाचे एक सोनेरी पान आहे. आपल्या लढ्याला नैतिकतेची जोड देत या महात्म्याने स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला. म्हणूनच अवघ्या जगाला त्यांची दखल घ्यावी लागली. जगभरातल्या तत्वज्ञानात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला. परंतु, उद्याचे भविष्य असलेल्या पिढीला अजूनही गांधीजी समजले नाहीत, उमजलेही नाहीत. ३० टक्के विद्यार्थ्यांना तर महात्मा गांधी यांचे पूर्ण नावही माहीत नाही. ‘लोकमत’ने गांधी जयंतीनिमित्त केलेल्या सर्वेक्षणात हे धक्कादायक वास्तव पुढे आले.२ आॅक्टोबर हा गांधीजींंचा जन्मदिन. संपूर्ण देशात हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांनी दिलेली शिकवण ही भारतालाच नव्हे तर जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे, त्यांचे विचार जगभरात आत्मसात केले जात आहेत. परंतु उद्याचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना गांधी मात्र कळले नाहीत. सर्वेक्षणात वर्ग ५ ते १० आणि ११ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींबद्दल सात प्रश्न विचारण्यात आले होते. यात महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय?, त्यांचा जन्म कधी झाला, त्यांची हत्या कधी झाली, हत्या कुणी केली. गाधींजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वात प्रथम कुणी संबोधले. गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव काय आणि गांधीजींचे प्रसिद्ध भजन कोणते? या प्रश्नांचा समावेश होता. यात महात्मा गांधी यांचे मोहनदास करमचंद गांधी हे पूर्ण नाव तब्बल ७० टक्के विद्यार्थ्यांनी अतिशय अचूकपणे सांगितले, तर ३० टक्के विद्यार्थ्यांना गांधीजींचे पूर्ण नावही लिहिता आले नाही. २ आॅक्टोबर १८६९ ही महात्मा गांधी यांची जन्मतारीख ६४ टक्के विद्यार्थ्यांना अचूकपणे सांगता आली तर ३६ टक्के लोकांना ती माहीतच नव्हती. काही विद्यार्थ्यांनी केवळ वर्ष सांगितले. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक गोंधळ उडाला तो म्हणजे महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हणून कुणी संबोधित केले? या प्रश्नाचा. यामध्ये ११ टक्के विद्यार्थ्यांनी सुभाषचंद्र बोस, १८ टक्के विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, ११ टक्के विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ५ टक्के विद्यार्थ्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे नाव सांगितले. २५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की, लोकांनी त्यांना राष्ट्रपिता केले, तर ३० टक्के विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहितीच नाही. गांधीजींची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी झाल्याचे उत्तर २३ टक्के विद्यार्थ्यांनी दिले, तर ७७ टक्के विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहीतच नाही. तर ‘रघुपती राघव राजाराम’ हे गांधीजींचे प्रसिद्ध भजन असल्याचे ५१ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. ५ टक्के विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन’ हे उत्तर दिले. २५ टक्के विद्यार्थ्यांनी रघुपती राघव आणि वैष्णव जन असे दोन्ही उत्तर सांगितले तर १९ टक्के विद्यार्थ्यांना यासंदर्भात उत्तरच माहीत नाही. गांधीजींच्या हत्येबद्दल ६० टक्के विद्यार्थी संभ्रमात महात्मा गांधी यांची हत्या नाथुराम गोडसे याने केली, असे ४० टक्के विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले. परंतु ६० टक्के विद्यार्थी मात्र संभ्रमावस्थेत दिसून आले. यापैकी २० टक्के विद्यार्थ्यांनी गांधीजींची हत्या ही एका वेड्या माणसाने केल्याचे सांगितले. तर गांधीजींची हत्या ही इंग्रजांनी केल्याचे १५ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. २५ टक्के विद्यार्थ्यांना माहितीच नाही. गांधीजींची हत्या विरोधी पक्षाच्या नेत्याने केल्याचेही काही विद्यार्थ्यांचे उत्तर होते. आत्मचरित्र म्हणजे काय? ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे गांधीजींचे गाजलेले आत्मचरित्र; परंतु यासंदर्भात ९७ टक्के विद्यार्थ्यांना माहीतच नाही. अनेक विद्यार्थ्यांनी तर आत्मचरित्र म्हणजे काय? असा प्रश्न उपस्थित केला. काही विद्यार्थ्यांनी बापू, वैष्णव जन, गांधीबोध, स्वातंत्र्य भारत, गीताग्रहस्थ आणि गांधीसागर अशी उत्तरे दिली.