शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सन्मानाने जगण्याचाही हक्क नाही का?

By admin | Updated: October 15, 2015 03:18 IST

आयुष्यभर विद्यार्थ्यांना संस्कार दिल्यानंतर निवृत्तीनंतरचे आयुष्य शांततेत व्यतित करणे, वर्षानुवर्षे संघर्ष करून जमा केलेल्या पैशांमधून घराला आकार देणे अन् स्वत:च्या हक्काच्या ‘पेन्शन’मधून

‘पेन्शन’साठी लढणाऱ्या शिक्षिकेचा आर्त सवाल : पांडे भगिनींच्या छळामुळे मानसिक नैराश्य आल्याचा आरोपयोगेश पांडे नागपूरआयुष्यभर विद्यार्थ्यांना संस्कार दिल्यानंतर निवृत्तीनंतरचे आयुष्य शांततेत व्यतित करणे, वर्षानुवर्षे संघर्ष करून जमा केलेल्या पैशांमधून घराला आकार देणे अन् स्वत:च्या हक्काच्या ‘पेन्शन’मधून समाजातील वंचितांना जमेल तेवढा मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करणे, एवढीच अपेक्षा होती. वाटले होते निवृत्त झाल्यावर जगण्यातला संघर्ष संपेल, पण वाट्याला आले ते केवळ नैराश्य अन् छळवणूक! स्वत:च्याच पैशांसाठी इतके झगडावे लागेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. हे शब्द आहेत स्वत:च्या ‘पेन्शन’साठी लढणाऱ्या सपना जयसिंघानी या निवृत्त शिक्षिकेचे. त्यांंच्या तक्रारीनंतर लाचलुचपत खात्याने शहराच्या माजी महापौर कल्पना पांडे व त्यांची बहीण भारती पांडे यांच्याविरुद्ध बुधवारी कारवाई करण्यात आली. या प्रकरणाबाबत ‘लोकमत’ने जयसिंघानी यांच्याशी संवाद साधला तेव्हा अक्षरश: अश्रू गाळत त्यांनी आपबिती सांगितली. गांधीबाग येथील छन्नूलाल नवीन विद्याभवन हायस्कूल येथून सपना जयसिंघानी या ३१ जुलै रोजी निवृत्त झाल्या. भारती पांडे या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका असून कल्पना पांडे व्यवस्थापनावर आहेत. निवृत्त होण्याच्या तीन ते चार दिवस अगोदरपासूनच ५० हजार रुपये देण्यात यावे, असा दबाव दोघींनीही टाकण्यास सुरुवात केली. अगदी वर्ग सुरू असतानाही त्यात व्यत्यय आणण्यात आला. निवृत्तीच्या दिवशीही यासंदर्भात विचारणा झाली व जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत ‘पेन्शन’च्या कागदपत्रांवर सही करणार नाही, अशी धमकी देण्यात आली. निवृत्तीवेतनासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया करण्यासही त्यांनी साफ नकार दिला व सातत्याने मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी शिवीगाळ करत कुटुंबीयांबद्दलदेखील अपशब्द काढण्यापर्यंत दोघींची मजल गेली. या धावपळीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम झाला व मानसिक नैराश्य आले, असा आरोप जयसिंघानी यांनी केला आहे. अखेर नातेवाईकांनी हिंमत दिल्यानंतर कल्पना व भारती पांडे यांच्याविरुद्ध तक्रार करण्याचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक आमदारालाही जुमानले नाही?शाळेच्या मुख्याध्यापिकेने निवृत्तीवेतनाच्या कागदपत्रांवर सही करावी म्हणून शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. गाणार यांनी भारती पांडे यांच्याशी संपर्क साधून प्रशासकीय कामात अडथळा आणू नका व त्यांचे काम करून द्या, असेदेखील सांगितले. परंतु त्यांच्या शब्दाचा मानही राखण्यात आला नाही, असा दावा जयसिंघानी यांनी केला. गाणार यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.संघ परिवारातही खळबळकल्पना पांडे या भाजपा तसेच संघ परिवाराशी जुळलेल्या आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या अधिवेशनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शहराच्या माजी महापौर ही ओळख असलेल्या कल्पना पांडे यांचे मोठे पद मिळविण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे संघ परिवारातदेखील खळबळ माजली असून जर त्या दोषी असतील तर त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, असा संघवर्तुळात मतप्रवाह आहे.अधिवेशनातील शब्द केवळ दिखावा?रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात मागील आठवड्यात अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी कल्पना पांडे यांनीच संचालन केले होते. शिक्षकांवरच संस्कार करण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी या अधिवेशनात व्यक्त केले होते. तर संघ परिवारातील सदस्यांसमोर त्यांनी शिक्षकांना न्याय मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले होते. परंतु स्वत:च्याच शाळेतील शिक्षिकेची अशी पिळवणूक करण्याबाबत त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अधिवेशनातील त्यांचे शब्द केवळ दिखावाच होते का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.