शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे मेडिकल करू नका!

By admin | Updated: July 27, 2015 04:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशित कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण हा विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातून येणारा गरीब

नितीन गडकरी : डोके व मान कर्करोगावर परिषदनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशित कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण हा विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातून येणारा गरीब मनुष्य असतो. येथे आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे. हे हॉस्पिटल चांगले काम करीत आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करून याचे ‘मेडिकल’ होऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने जागतिक डोके व मान कर्करोगाच्या दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्र्ड’चे चेअरमन खा.विजय दर्डा, खा. अविनाश पांडे, आ. सुनील केदार, आ. सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त व कॅन्सर रिलीफ सोसायटीचे अध्यक्ष अनुप कुमार, उपाध्यक्ष बसंतलाल शॉ, सचिव अशोक क्रिपलानी आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचा विकास साधायचा असेल तर याचे नव्याने बांधकाम होणे आवश्यक आहे. बांधकामाच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेले हफीज काँट्रेक्टर यांच्याकडून प्रस्तावित इमारतीचे बांधकाम प्लॅन करून घ्या. टप्प्याटप्प्याने बांधकाम करा. हॉस्पिटलच्या बांधकामासाठी आणि यंत्रसामग्रीसाठी निधीची कमतरता पडणार नाही. मात्र याचा पाठपुरावा करून हॉस्पिटलनेही पुढाकार घेणे तेवढेच आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. शिक्षणात जीवघेण्या रोगांची माहिती द्यावीखा. दर्डा म्हणाले, देशात मधुमेह, हृदयविकार आणि कॅन्सर हे जीवघेणे आजार वाढत आहे. या आजाराच्या माहितीचा अंतर्भाव शिक्षणात केला तर त्यांच्यात जागृती होऊन व्यसनांचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील. ते व्यसनांपासून दूर राहतील व आजाराला प्रतिबंध बसेल.देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ३०० आरोग्य केंद्र आहेत. परंतु यातील ४० टक्के केंद्रामध्ये सोयी उपलब्ध नाहीत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ६०० अद्ययावत केंद्रांची गरज असून राष्ट्रस्तरावर कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करायला हवी, असेही ते म्हणाले. या हॉस्पिटलसाठी आवश्यक बाबी पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. संचालन किशोर गलांडे यांनी केले तर आभार अशोक क्रिपलानी यांनी केले. कार्यक्रमाला आँकोलॉजी अ‍ॅण्ड रिसर्चचे संचालक डॉ. पूरविश पारेख, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, प्रसिद्ध सर्जन डॉ. मदन कापरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजय काटे, सचिव डॉ. सरिता उगेमुगे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मनपा सभापती सारिका नांदुरकर, डॉ. बी. के. शर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाईचा माणूस, माणसाची बाई करण्यास पालकमंत्री समर्थ४यावेळी गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले. कुठलेही काम तडीस नेण्यास पालकमंत्री बावनकुळे यांचा हातखंडा आहे. अगदी बाईचा माणूस, माणसाची बाई करण्यास देखील ते समर्थ आहे असे गडकरी यांनी म्हणताच सभागृहात हंशा पिकला. या हॉस्पिटलच्या विकासासाठी आ.केदार, आ.कोहळे आणि पालकमंत्री बावनकुळे यांनी लक्ष घालण्याच्या सूचनाही गडकरी यांनी केल्या. कॅन्सरच्या मृत्यूची संख्या वाढली सहा टक्क्याने ४खा. दर्डा म्हणाले, कॅन्सरला खूप जवळून पाहिले आहे. कर्करोगाच्या वेदना काय असतात, त्या अनुभवल्या आहेत. यावर सर्वांनी मिळून काम करायला हवे. कारण याची आकडेवारी फार भयावह आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल आणि कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार २०१२ व २०१४ मध्ये कॅन्सरमुळे मरणाऱ्यांची संख्या सहा टक्क्याने वाढली आहे. २०१४ मध्ये ४ लाख ९१ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच रोज साधारण १३०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू कॅन्सरमुळे होत आहे. २०१५ मध्ये साडेनऊ ते दहा लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, जगातील ३० टक्के कॅन्सरचे रुग्ण एकट्या भारतात आहेत. यातही ३० टक्के रुग्ण हे डोके व मानेच्या कॅन्सरचे आहे तर ३० टक्के रुग्ण हे तोंडाच्या कॅन्सरचे आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे बदलती जीवनशैली तसेच व्यसनांमुळे युवा वर्गात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.