शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

विश्व वंदनीय शिवरायांना हिंदुत्वाच्या चौकटीत बांधू नका : पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:05 IST

शिवाजी महाराजांना आज काही लोक हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठातर्फे शिवाजी जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘शिवमुद्रे’त नमूद असल्याप्रमाणे जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांना ‘जगाला वंदनीय ठरेल असे स्वराज्य निर्माण करा’ असे आवाहन केले होते. महाराजांनीही तोच आदर्श ठेवत स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या स्वराज्यात सर्व धर्मीयांना समान स्थान होते. स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च होता. सर्वांना समान आर्थिक वाटा मिळेल असे त्यांचे धोरण होते. त्यांचे राज्य खऱ्या अर्थाने जगाला आदर्श ठरावे असे होते. मात्र आज काही लोक त्यांना हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवाजी महाराज आणि वर्तमान स्थिती’ विषयावर आयोजित व्याख्यानात वक्ता म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. अ‍ॅड. खेडेकर यांनी शिवरायांच्या त्यावेळच्या कर्तृत्वाचे दाखले देत आज ते असते तर त्यांनी ही परिस्थिती कशी हाताळली असती, हा आशावाद मांडला. वर्तमान परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ‘क्षमता असेल तो टिकेल’ हा डार्विनचा सिद्धांत आज लागू पडतो. सूत्र आणि शास्त्र हे यशाचे तंत्र झाले आहे. भारतीयांची परिस्थिती त्यापेक्षा बिकट आहे. धार्मिक वादविवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीचा प्रश्न बिकट झाला आहे. शिवाजी महाराज असते तर या समस्या नसत्या.आज शिक्षणाच्या नावाने पदवी घेऊन चालत नाही तर ‘अप्लाईड नॉलेज’ व संशोधनाच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. महाराज असते तर त्यांनी शिक्षणाची अशी व्यवस्था निर्माण केली असती. त्यांच्या राज्यात व्यसनावर बंदी असती. माध्यमांमध्ये सतत येणाऱ्या बलत्काराच्या बातम्यांनी भीतीचे वातावरण निर्माण करून महिलांना पुन्हा घराच्या भिंतीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च मानणाऱ्या शिवरायांच्या राज्यात स्त्रिया कोणत्याही वेळी बिनदिक्कतपणे वावरू शकल्या असत्या. त्यांनी आपल्या मावळ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यामुळे ते असते तर अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठा असती.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८