शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

नावापुरते आंबेडकरवादी होऊ नका; रविश कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:25 IST

नावापुरते आंबेडकरवादी होऊ नका, तर त्यांचे आदर्श व विचारांवर जगा. आज आदर्शांसाठी परत एकदा संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ संपादक रविश कुमार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देस्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक लोक स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवतात, मात्र बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास नसतो. म्हणूनच समाजातील विविध दबाव व भयापोटी ते झुकतात. नावापुरते आंबेडकरवादी होऊ नका, तर त्यांचे आदर्श व विचारांवर जगा. आज आदर्शांसाठी परत एकदा संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ संपादक रविश कुमार यांनी व्यक्त केले. नागपुरात स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाला नागालँडचे पोलीस महानिरीक्षक संदीप तामगाडगे, नवी दिल्ली येथील जीएसटीचे उपायुक्त प्रशांत रोकडे, कुसुमताई तामगाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. वृत्तवाहिन्यांवर विश्वास न ठेवता स्वत: अभ्यास केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांनी दर्शक नव्हे तर नागरिक व्हावे, असे रविश कुमार म्हणाले. आपल्या देशात खासगी शाळांचे अवास्तव स्तोम माजले आहे. यातूनच कमकुवत नागरिक निर्माण होत आहेत. शिक्षण देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. यासाठी नागरिकांनी जागृत व्हायला हवे. राजकारणात अगोदर बंदुकांच्या आधारावर दहशत निर्माण करण्यात यायची. आता शिवराळ भाषेचे बाहुबली दिसून येतात, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.यावेळी राज्यातील गरीब कुटुंबातील ५० विद्यार्थिनींना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. अनिल बहादुरे यांनी प्रास्ताविक केले. तर सिद्धार्थ गायकवाड यांनी उपक्रमाची भूमिका मांडली.

पाच वर्षांपासून देशात अंधकारमय वातावरणमागील पाच वर्षांपासून देशात अंधकारमय वातावरण आहे. अनेक गोष्टी बोलत येत नाहीत व अभिव्यक्ती स्वातंत्र्य एका चौकटीत बंद झाल्या आहेत, असे म्हणत संदीप तामगाडगे यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र शासनावरच निशाणा साधला आहे. अनेकांना बोलण्याअगोदर विचार करावा लागत असल्याचे पाहतो आहे. मागील पाच वर्षांपासून अनेकांमध्ये एक प्रकारची घुसमट अनुभवयाला मिळते आहे. अनुसूचित जातीतील लोकांनी नोकरीमध्ये जाऊन स्वत:ला बांधून घेतले आहे. स्वत:च्या मनातील गोष्टीदेखील ते बोलू शकत नाही. या कार्यक्रमासाठी अनेक अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. मात्र त्यांनी भीतीपोटी येथे येणे टाळले असे तामगाडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Ravish Kumarरवीश कुमार