शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

गुंडांच्या दहशतीचे ना सावट ना भीती

By admin | Updated: November 12, 2014 00:56 IST

आता येथील आकाश स्वच्छ आहे. अंगण मोकळे आहे. ना गुंडाच्या दहशतीचे सावट ना अत्याचाराची भीती. आता इकडेही महिला-मुली मोकळेपणाने फिरू शकतात. छोटी मुलं रस्त्यावर खेळू शकतात.

कस्तुरबा नगर निवांत : आता येथील आकाश स्वच्छ आहेनागपूर : आता येथील आकाश स्वच्छ आहे. अंगण मोकळे आहे. ना गुंडाच्या दहशतीचे सावट ना अत्याचाराची भीती. आता इकडेही महिला-मुली मोकळेपणाने फिरू शकतात. छोटी मुलं रस्त्यावर खेळू शकतात. सायकल चालवू शकतात अन् पतंगही उडवू शकतात. तरुण बिनधास्त कुठेही उभे राहून गप्पा करू शकतात. १० वर्षांपूर्वी असे नव्हते. कुख्यात अक्कू आणि त्याचे गुंड साथीदार कुणालाही मारहाण करून त्याच्या खिशातील रक्कम हिसकावून घ्यायचे. रस्ताच काय, अंगणातून आणि अनेकदा घरात शिरून महिला मुलीला उचलून न्यायचे. तिच्यावर सामूहिक बलात्कार करायचे. विरोध केल्यास जीवघेणी मारहाण करायचे. वस्तीत विवस्त्र फिरवण्याची तर अक्कूला विकृतीच जडली होती. छोट्या मुलांना रस्त्यावर खेळण्याची, धावण्या-बागडण्याची मुभा नव्हती. सायकली हिसकावून मुलांना मारहाण केली जात होती. गप्पा करताना दिसलेल्या तरुणांना दारू आणायला, नेऊन द्यायला, प्यायला लावले जात होते. विरोध केल्यास भरवस्तीत बेदम मारहाण केली जात होती. एकूणच कस्तुरबानगरातील सर्वसामान्य नागरिकांचे कुख्यात अक्कूने जगणेच मुश्किल केले होते. त्याच्या या पापात जरीपटका ठाण्यातील काही पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याने गोरगरिबांचा आक्रोश निर्दयपणे चिरडला जात होता. एक दोन, पाच दहा नव्हे, तर अक्कू आणि त्याच्या साथीदारांनी तब्बल ४० महिला मुलींवर अत्याचार केले होते. अनेकींना त्यांच्या पालकांसमोरच अपमानित केले होते. त्यामुळे अक्कूविरोधात कस्तुरबानगरात असंतोष धगधगत होता. त्याचा अखेर भडका उडाला. १३ आॅगस्ट २००४ ला कुख्यात अक्कूला संतप्त जमावाने थेट न्यायमंदिराच्या कक्षातच ठेचले. त्याची हत्या झाल्यानंतर कस्तुरबानगरातील नागरिक बेभान झाले होते. प्रत्येकानेच या प्रकरणात स्वत:ला अटक करवून घेण्याची तयारी दाखवली होती. पोलिसांनी मात्र, २१ जणांना आरोपी केले होते. अक्कू हत्याकांडाचा निकालसोमवारी १० नोव्हेंबरला लागला. न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केले.वेगळ्या आनंदाची अनुभूतीदहा वर्षांपूर्वी मनावर अक्कूच्या दहशतीचा दगड होता. तो मारला गेल्यानंतर दहशत कमी झाली. मात्र, मुलगी उषा आणि जावई विलास भांडे यात आरोपी म्हणून अडकल्यामुळे एक वेगळेच दडपण होते. तब्बल दहा वर्षे या दडपणात जगलो. सोमवारी निकाल लागल्यापासून मोकळा श्वास घेतो आहे. वेगळ्या आनंदाची अनुभूती आहे.सारे कसे बिनधास्तकस्तुरबानगरात निकालाचा दिवस एखाद्या सणोत्सवासारखा साजरा करण्यात आला. संपूर्ण वस्तीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी गोळा केली. डीजे लावला. मिठाई बोलवली. रात्री १.३० ते २.०० वाजेपर्यंत कस्तुरबानगरात जल्लोष सुरू होता. आज निकालानंतरचा दुसरा दिवस. या भागातील बहुतांश मंडळी आपल्या रोजीरोटीवर निघून गेली. मात्र, लहान मुले छान पतंग उडवत होती. सायकल चालवत होती. मुली, तरुणी मोकळेपणाने फिरत होत्या. तरुणांचे थवे गप्पा करीत होते. सारे कसे बिनधास्त होते.आनंदाला पारावार नाहीयाच वस्तीत लहानाची मोठी झाली. मात्र, दहा वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवले की अंगावर काटाच उभा राहातो. अक्कू आणि त्याच्या साथीदारांची नजर कुणावरच पडू नये, यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करीत होतो. अखेर त्याची हत्या झाली अन् आम्ही सारेच आनंदलो. सोमवारी निकाल लागल्यापासून तर आनंदाला पारावारच उरला नाही.