शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

गुंडांच्या दहशतीचे ना सावट ना भीती

By admin | Updated: November 12, 2014 00:56 IST

आता येथील आकाश स्वच्छ आहे. अंगण मोकळे आहे. ना गुंडाच्या दहशतीचे सावट ना अत्याचाराची भीती. आता इकडेही महिला-मुली मोकळेपणाने फिरू शकतात. छोटी मुलं रस्त्यावर खेळू शकतात.

कस्तुरबा नगर निवांत : आता येथील आकाश स्वच्छ आहेनागपूर : आता येथील आकाश स्वच्छ आहे. अंगण मोकळे आहे. ना गुंडाच्या दहशतीचे सावट ना अत्याचाराची भीती. आता इकडेही महिला-मुली मोकळेपणाने फिरू शकतात. छोटी मुलं रस्त्यावर खेळू शकतात. सायकल चालवू शकतात अन् पतंगही उडवू शकतात. तरुण बिनधास्त कुठेही उभे राहून गप्पा करू शकतात. १० वर्षांपूर्वी असे नव्हते. कुख्यात अक्कू आणि त्याचे गुंड साथीदार कुणालाही मारहाण करून त्याच्या खिशातील रक्कम हिसकावून घ्यायचे. रस्ताच काय, अंगणातून आणि अनेकदा घरात शिरून महिला मुलीला उचलून न्यायचे. तिच्यावर सामूहिक बलात्कार करायचे. विरोध केल्यास जीवघेणी मारहाण करायचे. वस्तीत विवस्त्र फिरवण्याची तर अक्कूला विकृतीच जडली होती. छोट्या मुलांना रस्त्यावर खेळण्याची, धावण्या-बागडण्याची मुभा नव्हती. सायकली हिसकावून मुलांना मारहाण केली जात होती. गप्पा करताना दिसलेल्या तरुणांना दारू आणायला, नेऊन द्यायला, प्यायला लावले जात होते. विरोध केल्यास भरवस्तीत बेदम मारहाण केली जात होती. एकूणच कस्तुरबानगरातील सर्वसामान्य नागरिकांचे कुख्यात अक्कूने जगणेच मुश्किल केले होते. त्याच्या या पापात जरीपटका ठाण्यातील काही पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याने गोरगरिबांचा आक्रोश निर्दयपणे चिरडला जात होता. एक दोन, पाच दहा नव्हे, तर अक्कू आणि त्याच्या साथीदारांनी तब्बल ४० महिला मुलींवर अत्याचार केले होते. अनेकींना त्यांच्या पालकांसमोरच अपमानित केले होते. त्यामुळे अक्कूविरोधात कस्तुरबानगरात असंतोष धगधगत होता. त्याचा अखेर भडका उडाला. १३ आॅगस्ट २००४ ला कुख्यात अक्कूला संतप्त जमावाने थेट न्यायमंदिराच्या कक्षातच ठेचले. त्याची हत्या झाल्यानंतर कस्तुरबानगरातील नागरिक बेभान झाले होते. प्रत्येकानेच या प्रकरणात स्वत:ला अटक करवून घेण्याची तयारी दाखवली होती. पोलिसांनी मात्र, २१ जणांना आरोपी केले होते. अक्कू हत्याकांडाचा निकालसोमवारी १० नोव्हेंबरला लागला. न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केले.वेगळ्या आनंदाची अनुभूतीदहा वर्षांपूर्वी मनावर अक्कूच्या दहशतीचा दगड होता. तो मारला गेल्यानंतर दहशत कमी झाली. मात्र, मुलगी उषा आणि जावई विलास भांडे यात आरोपी म्हणून अडकल्यामुळे एक वेगळेच दडपण होते. तब्बल दहा वर्षे या दडपणात जगलो. सोमवारी निकाल लागल्यापासून मोकळा श्वास घेतो आहे. वेगळ्या आनंदाची अनुभूती आहे.सारे कसे बिनधास्तकस्तुरबानगरात निकालाचा दिवस एखाद्या सणोत्सवासारखा साजरा करण्यात आला. संपूर्ण वस्तीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी गोळा केली. डीजे लावला. मिठाई बोलवली. रात्री १.३० ते २.०० वाजेपर्यंत कस्तुरबानगरात जल्लोष सुरू होता. आज निकालानंतरचा दुसरा दिवस. या भागातील बहुतांश मंडळी आपल्या रोजीरोटीवर निघून गेली. मात्र, लहान मुले छान पतंग उडवत होती. सायकल चालवत होती. मुली, तरुणी मोकळेपणाने फिरत होत्या. तरुणांचे थवे गप्पा करीत होते. सारे कसे बिनधास्त होते.आनंदाला पारावार नाहीयाच वस्तीत लहानाची मोठी झाली. मात्र, दहा वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवले की अंगावर काटाच उभा राहातो. अक्कू आणि त्याच्या साथीदारांची नजर कुणावरच पडू नये, यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करीत होतो. अखेर त्याची हत्या झाली अन् आम्ही सारेच आनंदलो. सोमवारी निकाल लागल्यापासून तर आनंदाला पारावारच उरला नाही.