शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

'नवीन मोटार वाहतूक कायदा महाराष्ट्रात लागू करू नका; कमाल दंड ५०० रुपयांच्या वर नको!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 22:01 IST

दहापट दंड आकारणे चुकीचे असून नवीन मोटार वाहतूक कायदा महाराष्ट्रात लागू करू नये. जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत दंड आकारावा, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देग्राहक पंचायतची मागणी : ५०० रुपयांपर्यंत दंड आकारावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मोटार वाहतूक कायद्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून देशात काही राज्यात करण्यात आली. या कायद्यान्वये अवाजवी दहापट दंड आकारणे चुकीचे असून नवीन कायदा महाराष्ट्रात लागू करू नये. जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत दंड आकारावा, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.कुठलाही कायदा करताना सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासात घेतलेले नाही. नवीन कायद्यात दहापट दंडाची तरतूद केली आहे. ही शिक्षा लोकशाहीत अव्यावहारिक असून हा जिझिया कर आकारण्यासारखे आहे. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. दहापट दंड श्रीमंत लोक भरू शकतील, पण गरीब आणि सामान्य भरू शकणार नाही. त्यांनी आपली वाहने विकून दंड भरायचा का, असा सवाल ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे. या मोटारवाहनाचा गुन्हा हा काही फौजदारी गुन्ह्यासारखा दुसऱ्याला इजा करणारा किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवणारा नाही. सिटबेल्ट न लावणे आणि विना हेल्मेट मोटरसायकल चालविणाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. हेल्मेट सक्तीचे करणेच चुकीचे असून लोकशाहीच्या मूळ तत्त्वातच बसत नाही, असेही ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे.नवीन कायदा दुरुस्तीमध्ये एकच बाब समाधानाची आहे. मोटार अपघातातील पीडितांना नुकसान भरपाईबाबत मोबदला देण्यासाठी चांगला बदल कायद्यात करण्यात आला आहे. अपघातातील मृतांना किमान पाच लाख रुपये व गंभीर जखमींना किमान अडीच लाख रुपये वाहनमालक किंवा संबंधित विमा कंपनीतर्फे देणे बंधनकारक आहे. कायद्याचा हेतू मोटार अपघातावर नियंत्रण करणे असेल तर भरधाव व निष्काळजीपणाने वाहन चालविणे, यासाठीही कडक शिक्षा हवी. वाहन रस्त्यांवर उभे करणे आणि टेललॅम्प नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण फार जास्त आहे. यावर मात्र कोणत्याही कठोर शिक्षेची तरतूद नाही. चुकीच्या ओव्हरटेकमुळे अपघात होतात. यावर कठोर शिक्षा हवी. याकडे सरकारने लक्ष दिले नाही, असे पांडे यांनी सांगितले. ड्रायव्हिंग लायसन्स व वाहनाची मूळ कागदपत्रे सोबत नसणे हा गुन्हा ठरू नये. कागदपत्राची झेरॉक्स किंवा मोबाईलमध्ये कागदपत्रांचे फोटो स्वीकृत करावे, अशी मागणी ग्राहक पंचायतचे संजय धर्माधिकारी, डॉ. नारायण मेहेरे, डॉ. अजय गाडे, गणेश शिरोळे, प्रवीण शर्मा, दत्तात्रय कठाळे, अनिरुद्ध गुप्ते, अ‍ॅड. प्रेमचंद्र मिश्रीकोटकर, अ‍ॅड. श्रीपाद कुळकर्णी यांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMaharashtraमहाराष्ट्र