शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुले वाहतूक नियम पाळतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:23 IST

शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाला दुचाकीने जाणारी अल्पवयीन मुले वाहतूक नियम पाळतात काय, त्यांच्याकडे वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असते काय, ते ठरवून दिलेल्या इंजिन क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाक्या चालवितात काय इत्यादी बाबींची तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गेल्या शनिवारी झालेल्या बैठकीत दिलेत. त्या बैठकीचे इतिवृत्त सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.

ठळक मुद्देतपासणी होणार : पथक स्थापन करण्याचे निर्देश : हायकोर्टाच्या आदेशावरून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाला दुचाकीने जाणारी अल्पवयीन मुले वाहतूक नियम पाळतात काय, त्यांच्याकडे वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असते काय, ते ठरवून दिलेल्या इंजिन क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाक्या चालवितात काय इत्यादी बाबींची तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गेल्या शनिवारी झालेल्या बैठकीत दिलेत. त्या बैठकीचे इतिवृत्त सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने १० जानेवारी व २४ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अनुपकुमार यांनी उपरोक्त तपासणी करण्यासाठी पथके स्थापन करण्याचा आदेशही दिला आहे. शिकवणी वर्गांसाठी संबंधित क्षेत्राचे पोलीस निरीक्षक, परिवहन व मनपा वॉर्ड अधिकारी तर, शाळा व महाविद्यालयांसाठी संबंधित शाळा-महाविद्यालयांतील पर्यवेक्षक किंवा समकक्ष कर्मचारी, परिवहन व वाहतूक विभागातील अधिकारी यांचे पथक तयार करण्यास त्यांनी सांगितले. पथकांनी शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाला अचानक भेट देऊन उपरोक्त तपासणी करावी आणि येत्या १२ फेब्रुवारी रोजी आयोजित बैठकीत त्याचा अहवाल सादर करावा अशी सूचनाही त्यांनी केली.अल्पवयीन विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयामध्ये दुचाक्या आणण्यास मनाई करावी. विद्यार्थी दुचाकीने येत असल्यास त्यांच्याकडे दुचाकी चालविण्याची अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. अन्यथा मुख्याध्यापक व प्राचार्यांवर कारवाई करण्यात येईल असे परिपत्रक जारी करावे असे निर्देश अनुपकुमार यांनी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी व उच्च शिक्षण सहसंचालक योगेश आहेर यांना दिलेत.दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. वाहतूक पोलीस उपायुक्तांनी यासाठी विशेष पथक स्थापन करावे. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अल्प व दीर्घ मुदतीचा आराखडा तयार करण्यात यावा असेदेखील अनुपकुमार यांनी सांगितले.वाहतूक विभागाच्या सूचनावाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोरभवनातून चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, अमरावती, अकोला, मोर्शी व वरुड आणि गणेशपेठ येथून भंडारा, गोंदिया, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वडसा इत्यादी भागाकडे जाणाऱ्या बसेस सोडण्यात याव्यात. छिंदवाडा व जबलपूर मार्गाने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सना पिवळी नदीजवळच्या ट्रान्सपोर्ट प्लाझामध्ये थांबा द्यावा अशी सूचना वाहतूक विभागाने केली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीHigh Courtउच्च न्यायालय