शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बाहेर न पडता घरीच साधना करा; अ.भा. सकल जैन समाजाचे श्रावकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 03:31 IST

स्थानके उघडण्यास परवानगी मिळाली तर भाविकांना रोखणे शक्य होणार नाही, अशी भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली.

नागपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जैन संप्रदायाच्या श्रावक-श्राविकांनी कुठेही बाहेर न पडता घरीच आराधना करावी, असे आवाहन अ.भा. सकल जैैन समाजाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या तातडीच्या डिजिटल बैठकीत करण्यात आले आहे. स्थानके उघडण्यास परवानगी मिळाली तर भाविकांना रोखणे शक्य होणार नाही, अशी भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली.चातुर्मासानिमित्त जैन मंदिरे व स्थानके उघडण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी जैन समाजाच्या काही बांधवांतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची सध्याची स्थिती आणि वातावरण पाहू जाता अशी परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.न्यायालयाच्या या निर्णयानंतर समाजाची तातडीची बैठक होऊन उपरोक्त निर्णय घेण्यात आला. जैन समाज हा अनुशासनप्रिय आहे. अहिंसा, क्षमा, अनुशासन या भगवान महावीरांनी घालून दिलेल्या तत्त्वांचे हा समाज तंतोतंत पालन करतो. कोरोना संसर्ग जसजसा वाढतो आहे, त्या अनुषंगाने सरकारनेही जनतेसाठी काही नियम तयार केले आहेत. जैन समाजाने कोर्टाच्या निर्णयासोबतच सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचेही स्वागत केले आहे. एरव्ही चातुर्मासासाठी जैन साधू, संत, साध्वी देशात पायी भ्रमण करीत असतात पण यावेळी ते नियमांच्या अधीन राहून कुठेही पायी गेलेले नाहीत. आहे तेथूनच ते जप, तप, साधना करीत आहेत. एवढेच नव्हेतर समाजाच्या सर्व श्रावक, श्राविकांनी आपल्या घरूनच साधना करावी, असे आवाहनही गुरुमहाराजांनी समस्त जैन बांधवांना केले आहे. या बैठकीला सकल जैन समाजाचे सर्वश्री निखिल कुसुमगर, नरेश पाटणी, संतोष पेंढारी, अनिल पारख, मनीष मेहता, अतुल कोटेचा, दिलीप रांका, उज्ज्वल पगारिया, नितीन खारा, सुरेंद्र लोढा, माधुरी बोरा आदी उपस्थित होते.पर्वाधिराज पर्युषण पर्व घरीच करा साजरे-विजय दर्डासकल जैन समाजाचेपर्वाधिराज पर्युषण पर्व १५ ते ३१ आॅगस्ट या काळात संपन्न होत आहे. यावर्षी देशाच्या अनेक भागात आचार्य तसेच साधू, साध्वींच्या सान्निध्यात सर्व श्रावक-श्राविका सरकारच्या नियमांनुसार जप, तप, उपवास व धर्म आराधना करीत आहेत. समाजाच्या सर्व धार्मिक संस्थांनी यावर्षी पर्युषण पर्व काळात प्रशासनाचे नियम लक्षात ठेवूनच आपल्या परंपरेनुसार धार्मिक आराधना करावी. धार्मिक स्थळावर न जाता आपल्या परिवारासोबत घरीच साधना करावी, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले आहे. ते म्हणाले, पर्युषण पर्वानंतर आयोजित होणाऱ्या सामूहिक क्षमायाचना, स्वामी वात्सल्य आदी कार्यक्रम यावर्षी कोविड-१९ चे संक्रमण पाहू जाता आयोजित करता कामा नये. विराजमान साधू-साध्वींच्या संयमी जीवनात अधिकाधिक सौहार्दपूर्ण (साता) वातावरण राहील याची काळजी समस्त श्रावकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.