शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

डी.के. देशमुख यांच्यावरील अवमानना कारवाई रद्द

By admin | Updated: September 15, 2015 06:06 IST

आदेशाच्या अनादर प्रकरणात वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करून क्षमा मागण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या

नागपूर : आदेशाच्या अनादर प्रकरणात वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करून क्षमा मागण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी प्रवेश नियंत्रण समिती (वैद्यकीय आणि उच्च व तंत्र शिक्षण) अध्यक्ष व सेवानिवृत्त न्यायमूर्ती डी.के. देशमुख (मुंबई उच्च न्यायालय) आणि समितीच्या सदस्यांवरील अवमानना कारवाई रद्द केली.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारंजा लाड येथील विद्यार्थिनी प्रांजली इहरेला अमरावती येथील सिपना महाविद्यालयातील ‘एम. ई. (डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स)’ अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात आला होता. उच्च व तंत्र शिक्षण संचालकांनी प्रवेशाला मान्यता प्रदान केली होती. परंतु प्रवेश नियंत्रण समितीने १५ आॅगस्टनंतर प्रवेश देता येणार नसल्याचे कारण सांगून प्रवेशाचा प्रस्ताव फेटाळला होता. परिणामी प्रांजलीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने समितीला कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. पुरेसा वेळ देऊनही या आदेशाचे पालन झाले नाही म्हणून न्यायालयाने समिती अध्यक्ष व सदस्यांना अवमानना नोटीस बजावली होती. ही नोटीस मागे घेण्यात आली आहे. तसेच प्रांजलीचा प्रवेश सुरक्षित झाल्यामुळे न्यायालयाने ही रिट याचिका निकाली काढली आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. तुषार ताथोड यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)अशी आहे पार्श्वभूमीप्रांजलीने सिपना महाविद्यालयातून ‘बी. ई. (इन्स्ट्रूमेन्टेशन)’ पदवी मिळविल्यानंतर ‘एम. ई.’ करण्यासाठी ‘गेट’ परीक्षा दिली. तिला नागपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘एम. ई. (एम्बेडेड सिस्टम अ‍ॅन्ड कॉम्प्युटिंग)’ शाखेत प्रवेश मिळाला. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘एम. ई. (एम्बेडेड सिस्टम अ‍ॅन्ड कॉम्प्युटिंग)’ अभ्यासक्रमासाठी ‘बी. ई. (इन्स्ट्रूमेन्टेशन)’ पदवी पात्रता निकष नसल्याचे कारण सांगून प्रांजलीचा परीक्षा अर्ज नामंजूर केला. परिणामी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्राथमिक सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने अन्य महाविद्यालयात जागा रिक्त असल्यास प्रवेश स्थानांतरित करण्यात येईल असे सांगितले होते. योगायोगाने सिपना महाविद्यालयातच ‘एम. ई. (डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स)’ अभ्यासक्रमाची जागा रिक्त मिळून आल्यामुळे प्रांजलीला स्थानांतरित करण्यात आले. असे असतानाही प्रवेश नियंत्रण समितीने प्रवेशाचा प्रस्ताव फेटाळला होता. परिणामी प्रांजलीने दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.