शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

अपंगाचे साहित्य समाजातील दु:खाशी लढण्याची प्रेरणा देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:57 IST

नागपुरात १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय अंध व अपंगांचे समाजोत्थान साहित्य व कला संमेलन पार पडले. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक अनंत विष्णू ढोले यांची निवड करण्यात आली होती. दोन दिवसीय या संमेलनात अपंगाचे साहित्य, त्यांच्या कला यांचे सादरीकरण झाले. या संमेलनातून अपंगाच्या प्रगतीसाठी १९ ठराव घेण्यात आले. अपंगांचे साहित्य संमेलन असले तरी, सामान्यांनीही या संमेलनाला प्रचंड प्रतिसाद दिला. या संमेलनाच्या पाश्वभूमीवर संमेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले यांची विशेष मुलाखत....

ठळक मुद्देअपंग साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले यांची मुलाखत

मंगेश व्यवहारे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय अंध व अपंगांचे समाजोत्थान साहित्य व कला संमेलन पार पडले. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक अनंत विष्णू ढोले यांची निवड करण्यात आली होती. दोन दिवसीय या संमेलनात अपंगाचे साहित्य, त्यांच्या कला यांचे सादरीकरण झाले. या संमेलनातून अपंगाच्या प्रगतीसाठी १९ ठराव घेण्यात आले. अपंगांचे साहित्य संमेलन असले तरी, सामान्यांनीही या संमेलनाला प्रचंड प्रतिसाद दिला. या संमेलनाच्या पाश्वभूमीवर संमेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले यांची विशेष मुलाखत....प्रश्न : अपंगाचे संमेलन का गरजेचे आहे ?ढोले : अपंग व्यक्ती जसा समाजात, सरकार दरबारी उपेक्षित आहे तसाच तो साहित्य आणि कला क्षेत्रातही उपेक्षित आहे. सामान्यांच्या मंचावर, संमेलनामध्ये प्रतिभा असतानाही अपंगांना संधी मिळत नाही. मुळात अपंगांचे साहित्य हे समाजातील दु:खाशी लढण्याची प्रेरणा देणारे आहे. कारण अपंगत्व आल्याने घरदारं, कुटुंब उद्ध्वस्त होते. सगळ्यात जास्त त्रास त्या व्यक्तीला व त्याच्या जवळच्या नातलगांना होतो. शारीरिक वेदना काही काळाने सुसह्य होतात पण हतबलता जेव्हा मनाचा ताबा घेते तेव्हा व्यक्ती खऱ्या अर्थाने अपंग होते. मग या वेदनेच्या अभिव्यक्तीतून, दु:खाच्या सृजनातून ज्या कविता, कथा, नाटकं वाङ्मय रचले जाते ते अपंग साहित्य असते. स्वत:च्या मनाला रिझवता रिझवता, इतरांच्या मनाला जे रिझवायला लागते ती कला अपंगांची असते. अशा साहित्य कलेचे प्रदर्शन हे अपंगाच्या साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट असते. अपंगांच्या वेदना, दु:ख जर सामान्यांच्या संमेलनातून व्यक्त होण्याची संधी मिळत नसल्यामुळे अपंगाचे संमेलन गरजेचे आहे.प्रश्न : अपंगांच्या संमेलनातून सामान्यांना वेदनेची जाणीव कशी होणार?ढोले : मराठी साहित्यात अनेक साहित्य प्रवाह असून, ते सतत आपापली बौद्धिक व सामाजिक भूमिका मांडत आलेले आहेत. यात मुस्लीम साहित्य, पुरोगामी साहित्य, परिवर्तनवादी साहित्य अशा साहित्य प्रवाहातून जगण्याचे संदर्भ देत साहित्य फुलत आहे. पण अतिशय खडतर जीवनशैलीतून जगण्याची कला शिकविणारे, जगण्याचे मर्म सांगणारे वास्तववादी साहित्य फक्त अंध अपंगांनीच निर्माण केले आहे. याची ग्वाही पु.ल. देशपांडे यांनी जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दिली आहे. त्यामुळे तिसºया राज्यस्तरीय अपंग व अंध साहित्य व कला संमेलनात अपंगांचे साहित्य, त्यांच्या कला याची जाणीव सामान्यांना करून देण्यासाठी आमंत्रितांपासून निमंत्रितांपर्यंत सामान्यजण होते. आम्हाला आमच्या साहित्याला, कलेला अपंगांची पावती नको, सामान्यांचा आधार, प्रोत्साहन हवे आहे. पहिल्यांदा या साहित्य संमेलनातून याची जाणीव आम्ही सामान्यांना करून दिली आहे.प्रश्न : संमेलनात शासनाचा सहभाग असावा का?ढोले : अगदी, ही अपंगांसाठी आनंदाची बाब ठरेल. पण तसे होत नाही. सामाजिक न्याय विभाग अपंगांचे साहित्य संमेलन भरविते पण यावर्षी त्याला खीळ बसली. त्यामुळे अपंग क्षेत्रात कार्य करणाºया सामाजिक संस्थेला पुढाकार घ्यावा लागला. अपंगांच्या बाबतीत सहानुभूती ठेवणाºया काही दानशुरांची मदत मिळाली. संमेलन यशस्वी झाले. अपंगांचे संमेलन हे शारीरिक व मानसिक वेदनेतून निर्माण झालेल्या साहित्याचे आहे. अपंगांच्या जीवनातील हा अंधकार मिटावा, यासाठी सरकारला काही सुधारणा व कायदे करावे लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून या संमेलनातून १९ ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून सरकार दरबारी हे ठराव पोहचविण्याची जबाबदारी आमदार प्रकाश गजभिये यांनी घेतली. त्यामुळे आमच्या संमेलनात सरकार सहभागी नसले तरी, येथे व्यक्त झालेल्या वेदना, दु:ख सरकारपर्यंत नक्कीच पोहचणार आहे.प्रश्न : साहित्य संमेलनातून संमेलनाध्यक्ष म्हणून उद्दिष्ट साध्य झाले असे वाटते का?ढोले : अपंगांच्या आयुष्यात अनेक बदल घडायला हवे आहे. सर्व प्रकारच्या अपंगांना रोजगार, कुटुंब पालनपोषणाची हमी, अपंगांना विम्याचे संरक्षण, सभागृहापासून मॉलपर्यंत किंवा शासकीय कार्यालयामध्ये पोहचण्याची सोय नाही. वर्तमानपत्र, न्यायालयाच्या निर्णयातून मनावर फुंकर घालण्याचा आभास निर्माण होतो. पण अपंगांनी एक पाऊल पुढे सरकायचा प्रयत्न केला तरी अपंग अडून जातो. आम्ही कुठे अडतोय, हे सामान्यांना जाणवून द्यायचे आहे. त्यामुळे संमेलनात सामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी उद्घाटनापासून समारोपापर्यंत हा समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि तो यशस्वी ठरला असे मला वाटते आहे.

 

टॅग्स :interviewमुलाखतliteratureसाहित्य