शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

लग्नानंतर वर्षभरातच घटस्फोट मंजूर; अपवादात्मक वेदनांनी पीडित दाम्पत्याला कोर्टाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 13:20 IST

प्रकरणातील पती वर्धा, तर पत्नी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे १६ मार्च, २०२१ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर, तीव्र मतभेदांमुळे पत्नी दीड महिन्यातच माहेरी निघून गेली.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका दाम्पत्याला लग्नानंतर एक वर्षाच्या आत घटस्फोट मंजूर केला. अपवादात्मक वेदनांनी पीडित असल्यामुळे संबंधित दाम्पत्याला हा दिलासा देण्यात आला.

न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. हिंदू विवाह कायद्यातील कलम १३(बी) अनुसार एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून विभक्त राहत असलेल्या दाम्पत्यालाच सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी याचिका दाखल करता येते, तसेच कलम १४ अनुसार लग्नानंतर एक वर्षाच्या आत दाखल करण्यात आलेली घटस्फोट याचिका न्यायालयाला विचारात घेता येत नाही, परंतु संबंधित दाम्पत्य अपवादात्मक वेदनांनी पीडित असल्यास न्यायालय त्यांना दिलासा देऊ शकते. उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना या तरतुदीचा आधार घेतला.

पत्नी दीड महिन्यातच माहेरी परतली

प्रकरणातील पती वर्धा, तर पत्नी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे १६ मार्च, २०२१ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर, तीव्र मतभेदांमुळे पत्नी दीड महिन्यातच माहेरी निघून गेली. दरम्यान, त्यांनी सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेऊन २४ सप्टेंबर, २०२१ रोजी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिवाणी न्यायालयाने लग्नाच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत घटस्फोट दिला जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट करून, ती याचिका २८ सप्टेंबर, २०२१ रोजी फेटाळून लावली. परिणामी, या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

भावनात्मक नातेच निर्माण झाले नाही

या दाम्पत्याचे लग्नानंतर लगेच मतभेद टोकाला गेले. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक जवळीक साधली गेली नाही. परिणामी, त्यांच्या विवाहाला परिपूर्णता प्राप्त झाली नाही. याशिवाय काही अस्वीकार्य बाबींमुळे त्यांच्यात भावनिक नाते निर्माण झाले नाही. भविष्यात त्यांचे मनोमिलन होण्याची शक्यता नाही, त्याकरिता त्यांनी घटस्फोट घेतला.

- ॲड.राहुल धांडे, दाम्पत्याचे वकील.

टॅग्स :Courtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारDivorceघटस्फोट