शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा ‘फेरूल पॅटर्न’ राज्यभरात

By admin | Updated: March 24, 2016 02:36 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात समान पाणीपुरवठा करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्त्वावर प्रवाह

मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरनागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात समान पाणीपुरवठा करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्त्वावर प्रवाह नियंत्रण व्यवस्था (फेरुल) चा वापर केला होता. यासंदर्भात जि.प.च्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीत ठराव करून, तसा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला होता. जिल्ह्यात हा उपक्रम अतिशय यशस्वी ठरल्याने महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने नागपूर जिल्ह्याचा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात विभागाच्या उपसचिवांचे पत्र नागपूर जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे. परंतु गावातील घरे ही सखल, चढ-उतारावर वसलेली असल्यामुळे सर्वांना समदाबाने पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत होता. त्याचा परिणाम नळ जोडण्याची संस्था व पाणीपट्टी वसुलीवर होत होता. परिणामी पाणीपट्टीची थकबाकीही वाढत होती. नळपाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर परिणाम होऊन त्यानंतर वीज बिल थकीत राहणे, आदी कारणाने पाणी पुरवठा योजना बंद पडल्या होत्या. यासर्व भानगडी टाळण्यासाठी पाणी पुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेमध्ये ग्राहकांना नळ जोडणी देताना नळ जोडणीच्या ठिकाणी ‘एलबो’ एवझी फेरूल बसवून पाण्याचा प्रवाह १० ते १२ लिटर्स प्रति मिनिट इतका नियंत्रित करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागात समप्रमाणात व समदाबाने पाणी मिळायला लागले. यामुळे पाणी टंचाईच्या काळातही ग्रामीण भागात समदाबाने पाणी पुरवठा करण्यात जि.प.ला यश आले. या व्यवस्थेमुळे गावामध्ये व्हॉल्वद्वारे झोनिंग करण्याची आवश्यकताही भासली नाही. नागपूर जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत ७ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये फेरूल लावण्यासंदर्भातील ठराव घेण्यात आला होता. तसा प्रस्ताव राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविण्यात आला होता. नागपूर जिल्ह्यात यशस्वी ठरलेला फेरुलचा प्रयोग बघून विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यात नागपूरचा फेरूल पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेला शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय सर्व सदस्यांपुढे जाहीर करण्यात आल्याने, सदस्यांनी आनंद व्यक्त केला.