शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणात सरकारवर संशयाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 07:52 IST

Nagpur News नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळ्याचा खटला चालवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी, मानवाधिकार व माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. आसिफ कुरेशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे राज्य सरकारवर संशयाचे काळे ढग गोळा झाले आहेत.

ठळक मुद्देअ‍ॅड.आसिफ कुरेशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

राकेश घानोडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : काँग्रेसचे नेते आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार हे मुख्य आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळ्याचा खटला चालवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी, मानवाधिकार व माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. आसिफ कुरेशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे राज्य सरकारवर संशयाचे काळे ढग गोळा झाले आहेत. राजकीय हितसंबंधामुळे या खटल्याबाबत सरकार पारदर्शक नसल्याचा आरोप केला जात आहे.

राज्याच्या विधी व न्याय विभागाने गेल्या १४ मे रोजी अ‍ॅड. कुरेशी यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे, तेव्हापासून सरकारच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. हा खटला २००२ पासून प्रलंबित असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार त्यावर अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी केली जात आहे. हा खटला चालवण्यासाठी आधी अनुभवी महिला वकील अ‍ॅड. ज्योती वजानी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नोव्हेंबर-२०१९ ते मार्च-२०२० पर्यंत ४९ सरकारी साक्षीदार तपासले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे खटल्याचे कामकाज बंद झाले. पुढे डिसेंबरमध्ये आणखी दोन सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. आता केवळ तीन-चार सरकारी साक्षीदार तपासायचे बाकी आहेत. खटला अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अ‍ॅड. कुरेशी यांच्या नियुक्तीमुळे येणाऱ्या काळात सरकारला विविध अडचणींना तोंड द्यावे लागेल, असे विधी जाणकारांचे म्हणणे आहे.

एकूण ११ आरोपींचा समावेश

हा १२५ कोटी रुपयांचा घोटाळा असून, व्याजासह रकमेचा आकडा १५० कोटी रुपयांवर गेला आहे. या प्रकरणात एकूण ११ आरोपी आहेत. त्यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष सुनील केदार यांच्यासह माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल संजय अग्रवाल, केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) व बँक कर्मचारी सुरेश पेशकर (नागपूर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४०६ (विश्वासघात), ४०९ (सरकारी नोकर आदींद्वारे विश्वासघात), ४६८ (बनावट दस्तावेज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तावेज खरे भासवणे) व १२०-ब (कट रचणे) अंतर्गत आरोप निश्चित झाले आहेत.

अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी राजीनामा का दिला?

अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी गेल्या ५ मार्च रोजी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. खटला अंतिम टप्प्यात असताना त्यांनी असा धक्कादायक निर्णय का घेतला हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. यावरूनही सरकारकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. यासंदर्भात वजानी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे सांगितले.

उच्च न्यायालयात दिले जाईल आव्हान

या घोटाळ्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शेतकरी ओमप्रकाश कामडी व इतरांची जनहित याचिका प्रलंबित आहे. या याचिकेचे कामकाज पहात असलेले अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी अ‍ॅड. कुरेशी यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, अशी माहिती दिली. या प्रकरणात सरकार पक्षपात करू पहात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :bankबँक