शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

जिल्हा बँकेचे कर्मचारी महागाई भत्ता व वार्षिक वेतनवाढीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 23:09 IST

कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यानंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आली. त्यानंतर बँकेने कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविली. त्यातच तरतूद नसतानाही मे २०१४ पासून महागाई भत्ता आणि जुलै २०१५ पासून वार्षिक वेतनवाढ देणे बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. कर्मचारी १ सप्टेंबरपासून आंदोलनाच्या पवित्र्यात असून, युनियनने मागण्या पूर्ण करण्यासाठी बँकेला ३१ आॅगस्टची मुदत दिली आहे.

ठळक मुद्दे१ सप्टेंबरपासून आंदोलनाच्या पवित्र्यात : प्राधिकृत मंडळ निर्णय घेण्यात अकार्यक्षम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यानंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आली. त्यानंतर बँकेने कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविली. त्यातच तरतूद नसतानाही मे २०१४ पासून महागाई भत्ता आणि जुलै २०१५ पासून वार्षिक वेतनवाढ देणे बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. कर्मचारी १ सप्टेंबरपासून आंदोलनाच्या पवित्र्यात असून, युनियनने मागण्या पूर्ण करण्यासाठी बँकेला ३१ आॅगस्टची मुदत दिली आहे.जिल्हाधिकाऱ्यांचा होकार, पण सदस्यांचा नकारआंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅप. बँक एम्प्लॉईज युनियनने १२ आॅगस्टला बँकेच्या सभागृहात सभा घेतली. यावेळी एकूण ३२५ कर्मचारी उपस्थित होते. महागाई भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ न देण्यास प्राधिकृत मंडळ जबाबदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करावी, असा शेरा लिहून दिल्यानंतरही मंडळ निर्णय घेण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल हे मंडळाचे अध्यक्ष तर जिल्हा उपनिबंधक कडू आणि अनिल पाटील हे सदस्य आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, पण दोन्ही सदस्यांनी नकार दिल्याची अधिकृत माहिती आहे.कराराचा चुकीचा अर्थआर्थिक घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने नागपूर बँकेचा आर्थिक परवाना रद्द केला होता. २०१२-१४ पर्यंत आर्थिक व्यवहार झाले नाहीत. २०१५ मध्ये बँकेला पुन्हा आर्थिक परवाना मिळाला. राज्य शासन, केंद्र शासन आणि नाबार्ड यांच्यात झालेल्या समन्वय करारानंतर बँकेला शासनाकडून १५६ कोटी रुपये मिळाले. हा करार ३१ मार्च २०१७ पर्र्यंत होता. त्यानंतर करार ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढविण्यात आला. या कराराचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. नवीन वेतनवाढ देता येणार नाही, असे करारात नमूद आहे. पण महागाई भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ देऊ नये, याचा करारात उल्लेख नाही. आता कराराचे औचित्य राहिलेले नाही. त्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास बँकेचे प्राधिकृृत मंडळ टाळाटाळ करीत असल्याचा आरोप युनियनने केला आहे.बुलडाणा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्यअशीच मागणी बुलडाणा जिल्हा बँकेची असताना बुलडाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि आताचे सहकार आयुक्त प्रवीण झाडे यांनी आपल्या अधिकारात कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना महागाई भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ दिली होती, हे विशेष.३०० कर्मचाऱ्यांना ४.५० कोटींचे घेणेमे २०१४ पासून कर्मचाऱ्यांना बँकेकडून महागाई भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या स्वरूपात सुमारे ४.५ कोटींचे घेणे आहे. यासंदर्भात बँकेने २० कोटींची तरतूद केली आहे. नागपुरातील पावसाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आ. परिणय फुके, आ. गिरीश व्यास आणि आ. सुधीर पारवे यांनी सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संधू यांच्याशी चर्चा केली होती. अधिवेशनानंतर मुंबईत दोन दिवसातच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी आमदारद्वयांना दिले होते. पण ३१ जुलै २०१८ ला ते निवृृत्त झाले. त्यानंतर या प्रकरणावर पुन्हा धूळ साचली. तत्पूर्वी, ८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१८ पासून महागाई भत्ता व वार्षिक वेतनवाढ देण्याचा निर्र्णय घेतला. पण सदस्य जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले आणि सदस्य अनिल पाटील यांनी आडकाठी आणून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. तो आता शासनाकडे धूळ खात पडला आहे. हा प्रश्न शासनाच्या अधिकारात नसल्यामुळे यावर कधीच निर्णय होणार नाही, असे युनियनचे मत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी सभेत करण्यात आली. यासंदर्भात बँकेच्या कायदे तज्ज्ञांनीही कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना शासन प्रतिसाद देत नाही, सहकार मंत्र्यांच्या फोनला बँक प्रशासन जुमानत नाही, मुख्यमंत्र्यांनी दिलेले लेखी आदेश शासनाचे अधिकारी पाळत नाहीत, कायदे तज्ज्ञांचे मत बँकेला मान्य नाही, अशापरिस्थितीत आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे मत कर्मचाऱ्यांनी बैठकीत मांडले.सभेत युनियनचे महासचिव चंद्रकांत रोठे, पदाधिकारी व कर्मचारी विनोद भोयर, चंद्रशेखर कोहळे, राजेश वानखेडे, दिलीप वालदे, जयंता आदमने, राहुल क्षीरसागर, मिलिंद बाावणे उपस्थित होते.

 

टॅग्स :bankबँकEmployeeकर्मचारी