शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या पां. वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचे थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 20:12 IST

Nagpur News ‘लोकमत’तर्फे देण्यात येणाऱ्या पत्रपंडित पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१७-१८,२०१८-१९ व २०२०-२१ चे बुधवारी थाटात वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देविविधता नष्ट करणारे राज्यकर्ते स्वत:च्या देशालाच कमकुवत करतात

 

नागपूर : जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषा,धर्म,संस्कृतींचे लोक राहतात व ही विविधताच त्या देशांची शक्ती आहे. परंतू ज्या राज्यकर्त्यांना ही विविधता दुर्बलता वाटते,ते त्या विविधतेच्या प्रतिकांना हटविण्याचे प्रयत्न करतात. मात्र ज्या नेत्यांनी या दिशेने पावले उचलली आहेत,त्यांनी आपल्या देशालाच कमकुवत केले आहे,याची इतिहासात नोेंद आहे. रशिया युद्धखोर आहेच,मात्र युक्रेनने विविधता नष्ट करण्याची चूक देखील जगाने दखल घेण्यासारखी आहे. सर्वच देशांनी विविधतेचा सन्मान करायला हवा,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी केले.

‘लोकमत’तर्फे देण्यात येणाऱ्या पत्रपंडित पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१७-१८,२०१८-१९ व २०२०-२१ चे बुधवारी थाटात वितरण करण्यात आले. यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खा. कृपाल तुमाने, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा,‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा,‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा,समूह संपादक विजय बाविस्कर,संपादक (सीएमडी) दिलीप तिखिले हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘युक्रेन-रशियाचे युद्ध व त्याचे भारतावरील परिणाम’ या विषयावर वरदराजन यांनी भाष्य केले. रशियाने-युक्रेनवर आक्रमणच केले असून, कायदेशीरदृष्ट्या अनैतिक युद्ध ते लढत आहेत. परंतू या युद्धासाठी रशियाप्रमाणे,युक्रेनदेखील जबाबदार आहे. रशियन मूळ नागरिकांचे वास्तव्य असलेल्या भागात युक्रेनने आश्वासनांचे पालन केले नाही. तेथील लोक युक्रेनमध्येच सन्मानाने जगू इच्छित होते. मात्र युक्रेनच्या राज्यकर्त्यांनी समजूतदारपणा दाखविला नाही. युक्रेनने आपलेपणाची भावना न दाखविल्यामुळे ते नागरिक बाहेरच्यांकडे आशेने पाहू लागले व याचीच परिणती युद्धात झाली. या युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती शीतयुद्धानंतरची सर्वांत भीषण स्थिती आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम दिसतील. अमेरिका व युरोपमधील संरक्षण व आर्थिक संबंध जास्त वृद्धिंगत होतील. सोबतच रशिया आर्थिक व सैन्यदृष्ट्या कमकुवत होईल. या युद्धामुळे जगभरात परत एकदा शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू होईल. यातून चीनला फायदा होईल व भविष्यात भारताला धोका निर्माण होईल,असे मत वरदराजन यांनी व्यक्त केले.

‘लोकमत’सारख्या वर्तमानपत्रांनी केवळ वृत्तच प्रकाशित केले नाही तर, प्रशासनालादेखील वेळोवेळी आरसा दाखवून समाजात सुधारणा घडविण्यासाठी पुढाकार घेतला. विविध समस्या सोडविण्यात व प्रशासनाला दिशा दाखविण्यात वर्तमानपत्रांचे मौलिक योगदान असते,असे प्रतिपादन प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. यावेळी राजेंद्र दर्डा यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले. बाळ कुलकर्णी यांनी संचालन केले तर, दिलीप तिखिले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर. विमला, माहिती आयुक्त राहुल पांडे, वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, द हितवादचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पुरोहित, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी देवेंद्र वानखेडे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण, वरिष्ठ पत्रकार अजय पांडे आदी उपस्थित होते.

मराठी पत्रकारिता कुणापुढे झुकत नाही : राऊत

यावेळी राऊत यांनी केंद्र सरकारला चिमटा काढला. रशिया-युक्रेनप्रमाणे आपल्या देशात प्रत्यक्ष युद्ध सुरू नसले तरी आमच्यासारख्यांना दररोज युद्धाचा अनुभव येत आहे. दिल्लीतील ‘पुतिन’ आमच्यावर रोज ईडी, सीबीआय, इत्यादी केंद्रीय यंत्रणारूपी ‘मिसाईल्स’चा मारा करीत आहेत. आम्ही त्यांच्या हल्ल्यापासून तरीदेखील वाचलो आहोत. देशात तटस्थ पत्रकारिता कुठेतरी भयाच्या छायेखाली आहे. परंतू ‘लोकमत’सारख्या वृत्तपत्रांनी देशाला नेहमीच दिशा दिली आहे. मराठी पत्रकारिता कुणापुढे वाकत नाही व ती झुकतदेखील नाही. हीच परंपरा पुढेदेखील निश्चितपणे कायम राहील,असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले.

सकारात्मक पत्रकारिता ही काळाची गरज : दर्डा

‘लोकमत’ने नेहमी जनसामान्य,शोषित, वंचितांचा आवाज उंच करणारी व त्यांना न्याय मिळवून देणारी पत्रकारिता केली आहे. सकारात्मक व समाजहिताची पत्रकारिता ही काळाची गरज आहे. व ती आणखी दर्जेदार झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. अगदी ग्रामीण पत्रकारांनादेखील मंच मिळावा यासाठी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रेरणेतून हे पुरस्कार सुरू झाले. संपादकांच्या नावाने पुरस्कार देणारे ‘लोकमत’ एकमेव वृत्तपत्र असून निर्भीड व समाजाभिमुख पत्रकारितेची परंपरा कायम राहील, असा विश्वास राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला.

हे ठरले ‘लोकमत’ पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी

म. य. दळवी शोध पत्रकारिता पुरस्कार (२०१७-१८)

१- मनोज शेलार, लोकमत-नंदुरबार

२- विठ्ठल खेळगी, दै. पुण्यनगरी,सोलापूर

३- दत्ता यादव, लोकमत, सातारा

पां. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धा (२०१७-१८)

१- श्रीनिवास नागे, लोकमत-सांगली

२- शांताराम गजे, मुक्त पत्रकार- अहमदनगर

३- सुरेश वांदिले, सेवानिवृत्त माहिती अधिकारी-मुंबई

म. य. दळवी शोध पत्रकारिता स्पर्धा पुरस्कार (२०१८-१९)

१-नरेश डोंगरे, लोकमत- नागपूर

२-प्रदीप राऊत, तरुण भारत- मुंबई

३-संजय पाटील, लोकमत- कऱ्हाड

पां. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धा पुरस्कार (२०१८-१९)

१- विलास पंढरी, सामना- पुणे

२- हनमंत पाटील, लोकमत- पिंपरी चिंचवड

३- प्रमोद जाधव, समाजकल्याण उपायुक्त- सिंधुदुर्ग

म. य. दळवी शोध पत्रकारिता स्पर्धा पुरस्कार (२०१९-२०)

१- सुधीर लंके, लोकमत- अहमदनगर

२- संतोष सूर्यवंशी, सकाळ- नाशिक

३- गणेश वासनिक, लोकमत- अमरावती

पां. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धा पुरस्कार (२०१९-२०)

१-ॲड. कांतीलाल तातेड, लोकसत्ता-नाशिक

२- प्रवीण घोडेस्वार, परिवर्तनाचा वाटसरू-नाशिक

३-प्रा. संजय ठिगळे, लोकमत-सांगली

परीक्षक : ज्येष्ठ पत्रकार कमलाकर धारप, सुधीर पाठक, विराग पाचपोर, शशिकांत भगत, बबनराव वाळके, चंद्रकांत ढाकूलकर.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट