शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाविकांना ताजा प्रसाद वाटप करा; गणेश मंडळांना एफडीएच्या सूचना

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 16, 2023 18:23 IST

गणेश मंडळांनी काय करावे?

नागपूर: गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वितरित करताना स्वच्छेतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे करावे. प्रसाद तयार करून वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी कराव्यात, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने मंडळांना दिल्या आहेत.गणेश मंडळांनी काय करावे?

- आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद भाविकांना वाटप करावा, शिळ्या अन्नपदार्थांचे वाटप करू नये.- प्रसाद काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा.- प्रसाद हाताळण्यांचे कपडे स्वच्छ असावेत. साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामाला सुरूवात करावी.- संसर्गजन्य आजार झालेल्यांनी प्रसाद तयार करू नये.- प्रसाद तयार करणाऱ्यांनी आणि वाटप करणाऱ्यांनी नाक, कान, डोके, केस खाजवणे, डोळे चोळणे, शिंकणे, थुंकणे, नाक शिंकरणे टाळावे.- वाटप करणाऱ्यांनी हात पुसण्यासाठी स्वच्छ कापडे वापरावे.- प्रसाद तयार करणाऱ्यांनी हातमोजे आणि अ‍ॅप्रन घालावे, केस संपूर्णपणे झाकण्यासाठी टोपी वापरावी. तोंडाला मास्क लावावा.- प्रसाद तयार करण्यासाठी, भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे.- पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण असावे.- निर्जंतुकीकरण करूनच पाणी पिण्यास द्यावे. भांड्यांचा वापर करण्यापूर्वी ती धुण्याच्या साबणाने, द्रावणाने स्वच्छ घासावीत.- भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा, तसेच भांडी स्वच्छ, कोरड्या जागेत ठेवावीत.

प्रसाद तयार करून भाविकांना वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर १०० रुपये शुल्क भरून नोंदणी करावी. मंडळांनी कच्च्या मालाची खरेदी परवानाधारक दुकानातूनच करावी आणि खरेदीचे बिल घ्यावे.अभय देशपांडे, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव