शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

अभय योजनेत विवादित खटल्यांचा निपटारा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 11:30 IST

जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू होण्यापूर्वीे अर्थात ३० जून २०१७ पूर्वीच्या थकबाकीदारांसाठी राज्य शासनाने अभय योजना दोन टप्प्यात सुरू केली आहे.

ठळक मुद्देराज्य जीएसटी विभाग दोन टप्प्यात योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू होण्यापूर्वीे अर्थात ३० जून २०१७ पूर्वीच्या थकबाकीदारांसाठी राज्य शासनाने अभय योजना दोन टप्प्यात सुरू केली आहे. योजनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३१ जुलै आणि दुसरा टप्पा १ ते ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. दोन्ही टप्प्यात विविध करदात्यांना वेगवेगळ्या कायद्यांतर्गत थकबाकी भरायची आहे.पहिल्या टप्प्यात करदात्यांना जास्त फायदाराज्य जीएसटी विभागाच्या नागपूर झोनचे अतिरिक्त आयुक्त सुभाष मोराळे यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे थकीत असलेली थकबाकी कमी होण्यासह महसुलात वाढ व्हावी, हा योजनेचा उद्देश आहे. करदात्यांच्या थकबाकीमध्ये काही रक्कम भरून बाकी रक्कम माफ करण्यात येणार आहे. दोन टप्प्यात ३१ मार्च २०१० पर्यंत आणि १ एप्रिल २०१० ते ३० जून २०१७ या काळातील थकबाकीचा कालावधी राहणार आहे. पहिल्या टप्प्यात करदात्यांना जास्त फायदा होणार असल्याचे मोराळे यांनी स्पष्ट केले.काही प्रकरणांमध्ये करमाफीकलम ५ (१) नुसार ३१ मार्च २०१९ पूर्वी भरलेला कर प्रथम मूळ कराच्या विवादित व मान्य कराच्या प्रमाणानुसार थकबाकीतून वजा केला जाईल आणि उरलेल्या थकबाकीला सवलती मिळतील. ही सवलत जी प्रकरणे अपिलात प्रलंबित आहेत व त्यामध्ये थकबाकी आहे, अशांना मिळणार आहे. एखादे अपील केलेले नसले तरीही योजनेचा फायदा घेता येईल. यासाठी प्रकरण अपिलात असणे बंधनकारक नाही. विवरण पत्रकाप्रमाणे किंवा आॅडिट रिपोर्टप्रमाणे थकबाकी असली तरीही त्या थकबाकीसाठी योजना लागू आहे. थकबाकीदार ओरिजनल किंवा रिव्हाईज रिटर्न १६ ऑगस्ट २०१९ पर्यंत भरेल त्यालाही योजनेचा फायदा मिळणार असल्याचे कलम (५) (३) अंतर्गत अध्यादेशात स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर १६ ऑगस्टपर्यंत आदेश मंजूर झाला असेल आणि थकबाकी निर्माण झाली असल्यास त्यालाही योजनेचा फायदा मिळणार असल्याचे मोराळे यांनी सांगितले.ते म्हणाले, यापूर्वीच्या सर्व योजनांमध्ये व्याज, दंड, लेट फी माफ असायची, पण १ एप्रिल २०१९ पासून सुरू असलेल्या योजनेत काही प्रकरणांमध्ये करमाफी देण्यात आली आहे.सरकारला वस्तू व सेवा कराच्या पूर्वीच्या सर्वच देयता संपवायच्या असून नवीन कर कायदा यशस्वी होण्यासाठी या माफी योजनेची मदत होणार आहे. नागपूर झोनअंतर्गत संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे.माफी योजनेत ११ कायद्यांचा समावेशसध्या एकच कायदा असल्यामुळे जुन्या सर्वच कायद्याची थकबाकी संपविण्यासाठी माफी योजनेत ११ कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेनंतर जीएसटीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येईल. मागील थकबाकीची प्रकरणे संपुष्टात आल्याने जीएसटीचा महसूल वाढेल. माफी योजना जीएसटी लागू होण्यापूर्वीच्या कायद्यांसाठी आहे. करदात्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जीएसटी कार्यालयात हेल्प डेस्क आहे. व्यापारी आणि कर सल्लागार संघटनांसाठी वर्कशॉप घेण्यात आले आहेत. नोडल अधिकारी संपर्क साधून थकबाकीदारांना माहिती देत असून पत्रेही पाठविल्याचे मोराळे यांनी सांगितले. व्यापाऱ्यांना जुन्या थकबाकीपासून मुक्त होण्याची चांगली संधी असल्याचे अप्पर राज्य कर आयुक्त मोराळे म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकार